शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

५६३७ बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन ...

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या फळपिकांनाही फटका बसला. जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शासनाकडे २ कोटी १२ लाख ७३ हजार ८२६ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे पाच शेतकऱ्यांचे १.१० हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे, ३९४४ शेतकऱ्यांचे २२४३.५७ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले, तर १६८८ शेतक-यांच्या ४८१.२५ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच खरडून गेल्या आहेत.

०००००००००००००००००००००००

पंचनाम्यास विलंबाचा परिणाम

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जुलैच्या मध्यंतरापर्यंतच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली, परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही प्रशासनाला पंचनामे करण्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे अंतिम अहवाल तयार करून शासनाकडे मदतीची मागणी करण्यासही विलंब झाला.

०००००००००००००००००००००००

ऑगस्ट महिन्यात पाठविला प्रस्ताव

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले, तरी पंचनाम्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे प्रत्यक्ष ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या नुकसानाचे अंतिम अहवाल आपत्ती व्यवस्थापनास मिळण्यास विलंब झाला. तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.

०००००००००००००००००००००००

तीन तालुक्यांंत नुकसान

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका केवळ तीनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला. त्यात मंगरूळपीर तालुक्यातील ४,२६८, वाशिम तालुक्यातील २७, तर मानोरा तालुक्यातील १३४२ शेतकऱ्यांचे मिळून २७२५.९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, रिसोड आणि कारंजा या तीन तालुक्यांत मात्र निकषानुसार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही.

---------