शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:01 IST

वाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा ‘डेंजर झोन’मध्येपिण्याचे पाणी राखून ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.वाशिमच्या एकबूर्जी जलाशयातून दरवर्षी परिसरातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील पिकांकरिता सिंचनासाठी पाणी सोडले जाते. यासह संपूर्ण वाशिम शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मात्र समाधानकारक पावसाअभावी एकबूर्जी प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. लघुपाटबंधारे विभागाने २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमधील शिल्लक जलसाठय़ाच्या आकडेवारीमध्ये एकबुर्जीत आजरोजी केवळ १६.४६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने शहरात ८ दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेवून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील इतर मध्यम व लघू प्रकल्पांच्या जलाशय पातळीतही यंदा पावसाअभावी वाढ झालेली नाही. चालु आठवड्यात तीन ते चार दिवस पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ांवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १.१४ आणि २९.१४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते. तसेच १२३ लघुप्रकल्पांमधील जलसाठय़ाची स्थितीही चिंताजनक आहे. सद्य:स्थितीत वाशिम तालुक्यातील ३२ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी ६.५५ टक्के जलसाठा शिल्लक असून तब्बल २१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. मालेगाव तालुक्यातील २१ प्रकल्पांपैकी ८, रिसोड १८ पैकी १0, मंगरुळपीर १५ पैकी ६, मानोरा येथील २३ पैकी ६ आणि कारंजा तालुक्यातील १४ प्रकल्पांपैकी ३ मध्ये आजमितीस शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाशिमसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असून यापुढे मोठा तथा संततधार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. दरम्यान, टंचाईसदृष परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा प्रशासन, नगर पालिका, ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे प्रयत्न चालविले असल्याचे दिसून येत आहे. 

पाणीटंचाई निवारणार्थ २४ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’!अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये असणार्‍या प्रकल्पांची पाणीपातळी खालावली असून पिण्याकरिता पाणी राखून ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. गुरूवार, २४ ऑगस्टला याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ होत असून पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबूर्जी प्रकल्पात यंदा अपेक्षित प्रमाणात पाणीसाठवण झालीच नाही. सद्या प्रकल्पात केवळ १६.४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने नगर परिषदेमार्फत नियोजनाच्या दृष्टीकोणातून ८ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनीही नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. - राहुल तुपसांडेपाणीपुरवठा सभापती, नगर परिषद, वाशिम