शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:01 IST

वाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा ‘डेंजर झोन’मध्येपिण्याचे पाणी राखून ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.वाशिमच्या एकबूर्जी जलाशयातून दरवर्षी परिसरातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील पिकांकरिता सिंचनासाठी पाणी सोडले जाते. यासह संपूर्ण वाशिम शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मात्र समाधानकारक पावसाअभावी एकबूर्जी प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. लघुपाटबंधारे विभागाने २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमधील शिल्लक जलसाठय़ाच्या आकडेवारीमध्ये एकबुर्जीत आजरोजी केवळ १६.४६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने शहरात ८ दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेवून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील इतर मध्यम व लघू प्रकल्पांच्या जलाशय पातळीतही यंदा पावसाअभावी वाढ झालेली नाही. चालु आठवड्यात तीन ते चार दिवस पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ांवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १.१४ आणि २९.१४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते. तसेच १२३ लघुप्रकल्पांमधील जलसाठय़ाची स्थितीही चिंताजनक आहे. सद्य:स्थितीत वाशिम तालुक्यातील ३२ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी ६.५५ टक्के जलसाठा शिल्लक असून तब्बल २१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. मालेगाव तालुक्यातील २१ प्रकल्पांपैकी ८, रिसोड १८ पैकी १0, मंगरुळपीर १५ पैकी ६, मानोरा येथील २३ पैकी ६ आणि कारंजा तालुक्यातील १४ प्रकल्पांपैकी ३ मध्ये आजमितीस शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाशिमसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असून यापुढे मोठा तथा संततधार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. दरम्यान, टंचाईसदृष परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा प्रशासन, नगर पालिका, ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे प्रयत्न चालविले असल्याचे दिसून येत आहे. 

पाणीटंचाई निवारणार्थ २४ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’!अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये असणार्‍या प्रकल्पांची पाणीपातळी खालावली असून पिण्याकरिता पाणी राखून ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. गुरूवार, २४ ऑगस्टला याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ होत असून पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबूर्जी प्रकल्पात यंदा अपेक्षित प्रमाणात पाणीसाठवण झालीच नाही. सद्या प्रकल्पात केवळ १६.४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने नगर परिषदेमार्फत नियोजनाच्या दृष्टीकोणातून ८ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनीही नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. - राहुल तुपसांडेपाणीपुरवठा सभापती, नगर परिषद, वाशिम