शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांत ५२ टक्के जलसाठा

By admin | Updated: October 22, 2015 01:41 IST

१0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा ; ब्राम्हणवाडा प्रकल्प कोरडा.

वाशिम : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तीन मध्यम आणि १0७ लघु प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून, २१ ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. परतीचा पाऊस न बरसल्याने जलसाठय़ामध्ये ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. जिल्ह्यातील एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठय़ा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्ह्याची तहान भागविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांतील जलसाठय़ामध्ये वाढ होवू शकलेली नाही. एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात, सोनल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अडाण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या अल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर या प्रकल्पांमध्ये पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने एकदाही पाऊस झालेला नसून, दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठय़ामध्ये बाष्पीभवनामुळे झपाट्याने घट होत आहे. प्रकल्पांच्या जलसाठय़ाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, ५२ टक्के पाणीसाठा प्रकल्पांमध्ये आहे. मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लघु प्रकल्प कोरडा पडला आहे, तर जिल्ह्यातील १0७ लघु प्रकल्पांपैकी १0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांच्या आत जलसाठा जलाशयाच्या पातळी अहवालावरून दिसून येतो.