शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांत ५२ टक्के जलसाठा

By admin | Updated: October 22, 2015 01:41 IST

१0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा ; ब्राम्हणवाडा प्रकल्प कोरडा.

वाशिम : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तीन मध्यम आणि १0७ लघु प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून, २१ ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. परतीचा पाऊस न बरसल्याने जलसाठय़ामध्ये ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. जिल्ह्यातील एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठय़ा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्ह्याची तहान भागविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांतील जलसाठय़ामध्ये वाढ होवू शकलेली नाही. एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात, सोनल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अडाण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या अल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर या प्रकल्पांमध्ये पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने एकदाही पाऊस झालेला नसून, दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठय़ामध्ये बाष्पीभवनामुळे झपाट्याने घट होत आहे. प्रकल्पांच्या जलसाठय़ाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, ५२ टक्के पाणीसाठा प्रकल्पांमध्ये आहे. मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लघु प्रकल्प कोरडा पडला आहे, तर जिल्ह्यातील १0७ लघु प्रकल्पांपैकी १0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांच्या आत जलसाठा जलाशयाच्या पातळी अहवालावरून दिसून येतो.