शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांत ५२ टक्के जलसाठा

By admin | Updated: October 22, 2015 01:41 IST

१0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा ; ब्राम्हणवाडा प्रकल्प कोरडा.

वाशिम : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तीन मध्यम आणि १0७ लघु प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून, २१ ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. परतीचा पाऊस न बरसल्याने जलसाठय़ामध्ये ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. जिल्ह्यातील एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठय़ा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्ह्याची तहान भागविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांतील जलसाठय़ामध्ये वाढ होवू शकलेली नाही. एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात, सोनल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अडाण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या अल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर या प्रकल्पांमध्ये पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने एकदाही पाऊस झालेला नसून, दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठय़ामध्ये बाष्पीभवनामुळे झपाट्याने घट होत आहे. प्रकल्पांच्या जलसाठय़ाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, ५२ टक्के पाणीसाठा प्रकल्पांमध्ये आहे. मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लघु प्रकल्प कोरडा पडला आहे, तर जिल्ह्यातील १0७ लघु प्रकल्पांपैकी १0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांच्या आत जलसाठा जलाशयाच्या पातळी अहवालावरून दिसून येतो.