शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सात दिवसात मोजावी लागणार ४.६५ लाख क्विंटल तूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 02:03 IST

टोकनधारक शेतकरी संभ्रमात : पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जिल्हा प्रशासनही सापडले पेचात!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने २१ जुलैला जाहीर केलेल्या अफलातून शासन निर्णयानुसार, ३१ जुलै २०१७ पर्यंत टोकनधारक सर्व शेतकऱ्यांची तूर मोजून खरेदी करणे बंधनकारक केले असून त्याची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून (२४ जुलै) झाली आहे; मात्र जिल्ह्यातील टोकनधारक शेतकऱ्यांकडे पडून असलेली सुमारे ४ लाख क्विंटल तूर ७ ते ८ दिवसांत मोजून खरेदी करणे शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत जिल्हा प्रशासन, बाजार समित्या आणि शेतकरी हे तीनही घटक संभ्रमात सापडले आहेत.३१ मे २०१७ पर्यंत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिले असून, त्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे; मात्र ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नसून, टोकनधारक शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांचे ‘सात-बारा’वरील जमिनीचे क्षेत्र, त्यांचा तुरीचा पीक पेरा, अपेक्षित उत्पादन, चालूवर्षी त्याने यापूर्वी तूर विकली असल्यास किती क्विंटल व कोणत्या बाजार समितीत कधी विकली, याबाबतची हमीपत्रावर माहिती भरून घेतली जाणार आहे. टोकनवर नमूद तूर शेतकऱ्यांचीच आहे का, याबाबत खात्री करून घेण्यासाठी आवश्यक असल्यास संबंधित शेतकऱ्याच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करून घ्यावी. याप्रकारे प्रत्यक्ष पडताळणी करून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मते शिल्लक असलेली तूर खरोखरच शेतकऱ्यांची आहे आणि त्यांच्या मालकीची जमीन व पीकपेऱ्याच्या मर्यादेत असल्यासच प्रथम साठवणुकीची सोय करून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. एकूणच या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला असून, उण्यापुऱ्या सात दिवसांच्या अत्यल्प कालावधीत लाखो क्विंटल तूर मोजूर खरेदी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. व्यापाऱ्यांवरही फौजदारीची टांगती तलवार३१ मे २०१७ पर्यंत हजारो शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकन देण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान ज्या व्यापाऱ्यांनी शासनाची फसवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे टोकन घेतले असतील, त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी. चुकीचा प्रकार चौकशीदरम्यान आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्याविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी खटला दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.४३१ मे २०१७ पर्यंत हजारो शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकन देण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान ज्या व्यापाऱ्यांनी शासनाची फसवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे टोकन घेतले असतील, त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी. चुकीचा प्रकार चौकशीदरम्यान आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्याविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी खटला दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.