शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

सोयाबीन अनुदानासाठी ४६ हजारावर अर्ज

By admin | Updated: February 4, 2017 01:52 IST

हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याने अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.

वाशिम, दि. 0३- सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेच्या लाभासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत जिल्ह्यातील ४६ हजार ८३0 शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. दरम्यान, अर्ज सादर न करता आल्यामुळे हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याने अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्याची मागणी होत आहे. राज्यात तीन वर्षानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने सोयाबीन उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तसेच बाजार समित्यांमध्ये आवक वाढून भावात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. या निणर्यांतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ ऑक्टोबर २0१६ ते ३१ डिसेंबर २0१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांना क्विंटलला २00 रुपये अनुदान मिळणार आहे; तसेच प्रति शेतकरी जास्तीत जास्त २५ क्विंटल याप्रमाणे पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पणन संचालकांनी याबाबत सर्व बाजार समित्यांना परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीपट्टीसह आपला सातबारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह सोयाबीन विक्री केलेल्या संबंधित बाजार समितीकडे अर्ज करावयाचे होते. या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावयाचे आहेत. त्यानंतर तालुका सहायक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांना द्यावयाचे आहेत. बाजार समित्यांमध्ये आवक होऊन विक्री झालेल्या सोयाबीनलाच अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत कारंजा तालुक्यात सर्वाधिक १३ हजार ८५0 शेतकर्‍यांनी अनुदानासाठी अर्ज सादर केले आहेत. रिसोड तालुक्यातील १0 हजार ५00, वाशिम तालुक्यातील ७ हजार २३0, मंगरुळपीर तालुक्यातील १२ हजार १00, तर मालेगाव तालुक्यातील ३ हजार १५0 शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अनुदानासाठी अर्ज सादर केले आहेत. बाजार समित्यांबाहेरील विक्रीला लाभ नाही परराज्यातून आवक झालेल्या व व्यापार्‍यांच्या सोयाबीनसाठी ही योजना लागू राहणार नाही. थेट मिलला विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान नाही. पणन संचालनालयातर्फे थेट पणन परवानाधारक आणि खासगी बाजारांमध्येही सोयाबीनची विक्री होते. याशिवाय शेतकर्‍यांकडूनही थेट माल सोयाबीन मिलमध्येही विक्री केला जातो. शासनाच्या आदेशात अशा सोयाबीन विक्रीबाबत कोणताच उल्लेख नसल्याने संबंधित शेतकर्‍यांना अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. पडताळणीची प्रक्रिया दीर्घ!शासनाच्या निर्णयानुसार सोयाबीन विकणार्‍या शेतकर्‍यांना २00 रुपये अनुदानाचा लाभ देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या अर्जांची तपासणी करण्यात येत आहे. बाजार समित्यांना यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांना द्यावयाचे आहेत. सद्यस्थितीत बाजार समित्यांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे केवळ अर्ज पडताळणी प्रक्रियेलाच आणखी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचे दिसत आहे. सोयाबीन अनुदानासाठी पात्र शेतकर्‍यांचे अर्ज बाजार समित्यांमार्फत तालुका सहाय्यक निबंधकांकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर ते प्रस्ताव आमच्याकडे येतील. सद्यस्थितीत अर्ज पडताळणीची प्रक्रिया तालुकास्तरावर सुरू आहे. -ज्ञानेश्‍वर खाडेजिल्हा उपनिबंधक वाशिम