शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

४६ हरकती खारीज

By admin | Updated: February 18, 2015 02:00 IST

वाशिम जिल्हय़ातील १६५ ग्रामपंचायतींची निवडणूक.

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम):   वाशिम जिल्हय़ात मुदत संपलेल्या १६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रभाग रचना, आरक्षण यांच्यासह काही हरकती असल्यास त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हय़ातील ग्रामपंचायतच्यावतीने ७४ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ४६ हरकती खारीज करण्यात आल्या असून, २८ हरकती मान्य करण्यात आल्या असून, त्यात सुचवलेले बदल होणार आहेत. मालेगाव तालुक्यात मुदत झालेल्या ३१ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. त्यामधील ९ ग्रामपंचायतींमधील १४ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३ ग्रामपंचायतींमधील ६ हरकती अमान्य केल्या असून, ६ ग्रामपंचायतींमधील ८ हरकती मान्य केल्या आहेत. रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. रिसोड तालुक्यात ९ ग्रामपंचायतीतील ११ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये २ ग्रामपंचायतीतील २ हरकती खारीज, तर ७ ग्रामपंचायतीतील ९ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. वाशिम तालुक्यात २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, ८ ग्रामपंचायतींमध्ये २७ हरकती घेण्यात आल्या होत्या, त्यापैकी ७ ग्रामपंचायतींच्या २६ हरकती रद्द केल्या आहेत, तर केवळ एक ग्रामपंचायतमधील हरकत मान्य केली आहे. मंगरुळपीर तालुक्यात २५ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार असून, ८ ग्रा.पं.मध्ये ११ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ ग्रा.पं.मधील ६ हरकती रद्द केल्यात, तर २ ग्रापंमधील ५ हरकती मान्य केल्या आहेत. कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, त्यामध्ये २ ग्रामपंचायतींमधील २ हरकती होत्या. त्या दोन्ही हरकती मान्य करण्यात आल्यात. मानोरा तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. ५ ग्रामपंचायतींमधील ९ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यात ४ ग्रामपंचायतींमधील ६ हरकती रद्द केल्यानंतर २ ग्रा.पं.मधील ३ हकरती मान्य केल्या आहेत. संपूर्ण जिल्हय़ात १६५ ग्रामपंचायतीमध्ये ४१ ग्रामपंचायतीमधून ७४ हरकती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये २१ ग्रामपंचायतीमधून ४६ हरकती रद्द केल्या व २0 ग्रामपंचायतीमधून २८ हरकती मान्य केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीला बराच अवधी असला तरी गावांमध्ये आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू दिसून येत आहे.