शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

कृषी पंपांच्या ४00 जोडण्या रखडल्या!

By admin | Updated: December 4, 2015 02:47 IST

मालेगाव तालुक्यात धडक सिंचन योजनेचे १00 प्रस्ताव तयार.

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम) : शेतकर्‍यांना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याचा डंका पिटणार्‍या महावितरण यंत्रणेचे पितळ आता उघडे पडत आहे. दीर्घ कालावधीनंतरही मालेगाव तालुक्यातील ४00 शेतकर्‍यांच्या विहिरीवर कृषीपंपाचे मीटर बसू शकले नाही. गत काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलल्याने शेती उत्पादनात चढ-उतार येत आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देत आहेत. शासकीय योजना आणि वैयक्तिक स्वरुपात शेतात विहिरी खोदून शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे. कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात कोटेशन भरून शेतकर्‍यांना प्रस्ताव सादर करावा लागतो. मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी प्रस् ताव सादर केलेले आहेत. ३0 नोव्हेंबरपर्यंंत ४00 कृषीपंप जोडण्या रखडलेल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणी असूनही शेतकर्‍यांना सिंचन करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यावर्षी मालेगाव तालुक्यावर पाऊस रुसला. त्यामुळे खरीप हंगामात शे तकर्‍यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. मेडशी, रिधोरा, किन्हीजा व अन्य काही भागातील शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मूग व उडदाचे उत्पादन निच्चांकी पातळीवर आले. सोयाबीनवर भिस्त अस ताना सोयाबीनच्या उत्पादनातही कमालिची घट आली. एकरी ८ ते १0 िक्ंवटल उत्पादनाऐवजी यावर्षी एक ते तीन क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा उतारा आला. त्यामुळे शेतकर्‍यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. ही कसर रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनातून भरून काढण्यासाठी शेतकरी सिंचनावर भर देत आहे; मात्र कृषीपंप जोडणी मिळण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने पाणी असूनही सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ ४00 शेतकर्‍यांवर आली. थकीत बिलापोटी वीजजोडणी कापणार्‍या वीज वितरण कंपनीने आपल्या क र्तव्यातही तेवढेच तत्पर असणे शेतकर्‍यांना अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या किरकोळ प्रश्नांवरून रान उठविणार्‍या अनेक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनीदेखील चुप्पी साधल्याने 'बेगडीपण' चव्हाट्यावर येत आहे.