शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांच्या ४00 जोडण्या रखडल्या!

By admin | Updated: December 4, 2015 02:47 IST

मालेगाव तालुक्यात धडक सिंचन योजनेचे १00 प्रस्ताव तयार.

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम) : शेतकर्‍यांना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याचा डंका पिटणार्‍या महावितरण यंत्रणेचे पितळ आता उघडे पडत आहे. दीर्घ कालावधीनंतरही मालेगाव तालुक्यातील ४00 शेतकर्‍यांच्या विहिरीवर कृषीपंपाचे मीटर बसू शकले नाही. गत काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलल्याने शेती उत्पादनात चढ-उतार येत आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देत आहेत. शासकीय योजना आणि वैयक्तिक स्वरुपात शेतात विहिरी खोदून शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे. कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात कोटेशन भरून शेतकर्‍यांना प्रस्ताव सादर करावा लागतो. मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी प्रस् ताव सादर केलेले आहेत. ३0 नोव्हेंबरपर्यंंत ४00 कृषीपंप जोडण्या रखडलेल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणी असूनही शेतकर्‍यांना सिंचन करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यावर्षी मालेगाव तालुक्यावर पाऊस रुसला. त्यामुळे खरीप हंगामात शे तकर्‍यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. मेडशी, रिधोरा, किन्हीजा व अन्य काही भागातील शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मूग व उडदाचे उत्पादन निच्चांकी पातळीवर आले. सोयाबीनवर भिस्त अस ताना सोयाबीनच्या उत्पादनातही कमालिची घट आली. एकरी ८ ते १0 िक्ंवटल उत्पादनाऐवजी यावर्षी एक ते तीन क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा उतारा आला. त्यामुळे शेतकर्‍यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. ही कसर रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनातून भरून काढण्यासाठी शेतकरी सिंचनावर भर देत आहे; मात्र कृषीपंप जोडणी मिळण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने पाणी असूनही सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ ४00 शेतकर्‍यांवर आली. थकीत बिलापोटी वीजजोडणी कापणार्‍या वीज वितरण कंपनीने आपल्या क र्तव्यातही तेवढेच तत्पर असणे शेतकर्‍यांना अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या किरकोळ प्रश्नांवरून रान उठविणार्‍या अनेक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनीदेखील चुप्पी साधल्याने 'बेगडीपण' चव्हाट्यावर येत आहे.