शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लॉकडाऊनच्या शंभर दिवसांत ४०० कोटींची उलाढाल झाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST

साधारणत: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन ...

साधारणत: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. त्यामुळे जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने ४०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. तर लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या दीड, दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास ७०० ते ७५० कोटींचे नुकसान झाल्याचेही व्यापाºयांशी केलेल्या चर्चेवरून दिसून येते. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये आलेली शिथिलता आणि मिशन बिगेन अगेनमुळे अर्थ व्यवस्थेत सुधार होऊ लागला. दरम्यान, आता कोरोना संसर्ग वाढल्याने पुन्हा विविध व्यवसांयावर बव्हंशी निर्बंध आल्याने अडचणीत वाढत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेले ८ उद्योग आणि २१० रोजगार बंद पडले. लॉकडाऊननंतर त्यातील ७ उद्योग आणि १७० रोजगार सुरू झाले होते. आता त्यात आणखी वाढ झाली आहे.

------------

मे महिन्यानंतरच्या शिथिलतेने दिलासा

सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात दीड महिना प्रभावी अंमलबजावणी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने, व्यवसाय ठप्प पडले. त्यानंतर जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाल्याने बहुतांश व्यवसाय, दुकानांना ठराविक वेळेत सूट देण्यात आली. मे महिन्याच्या अखेरपासून तर शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, जिम्नॅशियम, सलून व ब्युटीपार्लर, बार, खासगी प्रवासी वाहतूक आदी मोजके व्यवसाय, धंदे वगळता उर्वरीत सर्व दुकाने, व्यवसायांचे दरवाजे खुले झाले. सलून व ब्युटीपार्लरला जून अखेरीस परवानगी मिळाली.

------------

लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेले उद्योग -०८

लॉॅकडाऊनपूर्वी सुरू असलेले रोजगार-२१०

----------

लॉकडाऊनंतर सुरू झालेले उद्योग-०७

लॉकडाऊनंतर सुरू झालेले रोजगार-१७०