शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

३९ जलस्त्रोत दूषित; आरोग्याला धोका

By admin | Updated: November 27, 2015 01:46 IST

पाणी नमुने तपासणी अहवाल; मानोरा तालुक्यात सर्वाधिक जलस्त्रोत.

संतोष वानखडे/वाशिम : जिल्ह्यातील ३९ जलस्त्रोत दूषित असल्याचे, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या पाणी नमुने तपासणीतून समोर आले. दूषित पाणीपुरवठा व ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याप्रकरणी मे महिन्यात तब्बल ९६ ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेने कारवाई केली होती. काळ लोटला, तसा कारवाईचा धाकही संपतोय, या मानसिकतेत काही कर्मचारी असल्याचे पाणी नमुने तपासणीने अधोरेखीत केले. ग्रामीण भागात सर्वांंना स्वच्छ, शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने ग्रामपंचायत प्रशासनावर सोपविली आहे. पाणीपुरवठय़ाच्या विहिरीत तसेच गावात पिण्यासाठी वापरात असलेल्या जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकणे क्रमप्राप्त असताना, काही ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर करीत नाहीत. गत मे महिन्यात जिल्ह्यातील ८0 जलस्त्रोत दूषित असल्याचे तसेच अनेक ग्रामपंचायतीने पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने तब्बल ९६ ग्रामसेवकांवर वेतनवाढ रोखने व अन्य प्रकारची कारवाई केली होती. या कारवाईनंतर दोन-तीन महिने शुद्ध पाणीपुरवठा व ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर झाला. त्यानंतर अनियमितता आली आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल १३४ जलस्त्रोत दूषित आढळून आले. ऑक्टोबरमध्ये या संख्येत घट आली. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने केलेल्या पाणी नमुने तपासणीतून एकूण ३९ जलस्त्रोत दूषित आढळून आले. एकूण ६१३ जलस्त्रोत तपासले होते. मानोरा तालुक्यात तपासलेल्या १३९ पैकी २२ जलस्त्रोत दूषित आढळून आले. याप्रमाणे मंगरुळपीर तालुक्यात आठ, रिसोड पाच, कारंजा तालुक्यात चार जलस्त्रोत दूषित आढळून आले.