शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

‘निर्मल भारत’ची ३९ टक्के उद्दिष्टपूर्ती!

By admin | Updated: October 31, 2014 00:28 IST

राज्यभरातील शौचालय बांधणीची स्थिती.

संतोष वानखडे / वाशिम

   स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी शिरावर घेऊन काम करणार्‍या निर्मल भारत अभियानाला २0१३-१४ मध्ये राज्यभरातील सहा लाख ८४ हजार ५५९ शौचालय बांधणीच्या उद्दिष्टापैकी, दोन लाख ६७ हजार ४२४ शौचालयांची बांधणी झाली आहे. एकूण उद्दीष्टाच्या ३९.0५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गोदरीमुक्त गावासाठी राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे अपेक्षीत आहे. याकामी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान योजनेला एप्रिल २0१२ पासून निर्मल भारत अभियान संबोधले जात आहे. या योजनेंतर्गत स्वतंत्र कौटुंबिक शौचालये बांधकामाकरिता दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहनपर मदत दिली जाते. आता दारिद्रय़ रेषेवरील अनुसुचित जाती, जमातीमधील कुटुंबे, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, घर असलेले भूमिहीन मजूर, नि:शक्त व्यक्ती, महिला कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना लागू केली आहे. २0१२-१३ या वर्षात निर्मल भारत अभियानांतर्गत दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी ९२ हजार १0३ स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आली. दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी ९७ हजार २0३ स्वतंत्र शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. ७२८ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, तर ५८00 अंगणवाडींना स्वतंत्र शौचालय उपलब्ध करून दिले आहे. २0१२-१३ मध्ये या चार प्रकारात एकूण एक लाख ९५ हजार ८३४ स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आली. २0१३-१४ या वर्षासाठी दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी दोन लाख २९ हजार २४३, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी चार लाख ५३ हजार ७९२ स्वतंत्र शौचालय निर्मिती तसेच १५२४ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी दोन लाख ६७ हजार ४२४ शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी ९३ हजार १५६, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी एक लाख ७४ हजार १0७, तसेच सार्वजनिक ठिकाणी १६१ शौचालयांची बांधणी निर्मल भारत अभियानाने केली आहे. उद्दिष्टपूर्तीच्या ५0 टक्क्यापर्यंतही निर्मल भारत अभियान पोहोचू शकले नाही. अर्थात गाव पातळीवरील व तालुका पातळीवरील सर्व विभागांचे उत्तम सहकार्य मिळाले असते, तर ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त उद्दिष्टपूर्ती झाली असती, असा अधिकार्‍यांकडून केला जात आहे.