शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

‘निर्मल भारत’ची ३९ टक्के उद्दिष्टपूर्ती!

By admin | Updated: October 31, 2014 00:28 IST

राज्यभरातील शौचालय बांधणीची स्थिती.

संतोष वानखडे / वाशिम

   स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी शिरावर घेऊन काम करणार्‍या निर्मल भारत अभियानाला २0१३-१४ मध्ये राज्यभरातील सहा लाख ८४ हजार ५५९ शौचालय बांधणीच्या उद्दिष्टापैकी, दोन लाख ६७ हजार ४२४ शौचालयांची बांधणी झाली आहे. एकूण उद्दीष्टाच्या ३९.0५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गोदरीमुक्त गावासाठी राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे अपेक्षीत आहे. याकामी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान योजनेला एप्रिल २0१२ पासून निर्मल भारत अभियान संबोधले जात आहे. या योजनेंतर्गत स्वतंत्र कौटुंबिक शौचालये बांधकामाकरिता दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहनपर मदत दिली जाते. आता दारिद्रय़ रेषेवरील अनुसुचित जाती, जमातीमधील कुटुंबे, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, घर असलेले भूमिहीन मजूर, नि:शक्त व्यक्ती, महिला कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना लागू केली आहे. २0१२-१३ या वर्षात निर्मल भारत अभियानांतर्गत दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी ९२ हजार १0३ स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आली. दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी ९७ हजार २0३ स्वतंत्र शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. ७२८ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, तर ५८00 अंगणवाडींना स्वतंत्र शौचालय उपलब्ध करून दिले आहे. २0१२-१३ मध्ये या चार प्रकारात एकूण एक लाख ९५ हजार ८३४ स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आली. २0१३-१४ या वर्षासाठी दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी दोन लाख २९ हजार २४३, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी चार लाख ५३ हजार ७९२ स्वतंत्र शौचालय निर्मिती तसेच १५२४ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी दोन लाख ६७ हजार ४२४ शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी ९३ हजार १५६, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी एक लाख ७४ हजार १0७, तसेच सार्वजनिक ठिकाणी १६१ शौचालयांची बांधणी निर्मल भारत अभियानाने केली आहे. उद्दिष्टपूर्तीच्या ५0 टक्क्यापर्यंतही निर्मल भारत अभियान पोहोचू शकले नाही. अर्थात गाव पातळीवरील व तालुका पातळीवरील सर्व विभागांचे उत्तम सहकार्य मिळाले असते, तर ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त उद्दिष्टपूर्ती झाली असती, असा अधिकार्‍यांकडून केला जात आहे.