शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

३.६८ लाख रोपांची होणार लागवड!

By admin | Updated: May 22, 2017 01:26 IST

४९१ ग्रामपंचायतींना दिले उद्दिष्ट : प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील प्रती ग्राम पंचायतला ७५० याप्रमाणे एकूण ४९१ ग्रामपंचायतींना तीन लाख ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने दिले आहे.५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. अन्य विभागांप्रमाणेच ग्राम पंचायतींनादेखील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे प्रत्येक ग्राम पंचायतने किमान ७५० रोपांची लागवड करावी, असे उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, एकूण उद्दिष्ट तीन लाख ६८ हजार २५० आहे. सर्वाधिक ग्राम पंचायती कारंजा तालुक्यात असून, या तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्यातील ८४ ग्राम पंचायतींना ६३ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींना ६२ हजार २५०, रिसोड तालुक्यातील ८० ग्राम पंचायतींना ६० हजार, मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींना ५७ हजार ७५० आणि मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींना ५७ हजार रोपांची लागवड करावी लागणार आहे. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे आतापासूनच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्राम पंचायत प्रशासनाला केल्या आहेत. या सुचनांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागले असल्याचे दिसून येते.‘नरेगा’ पथकाची पाहणीजिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिल्यानंतर वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापासूनच खड्डे खोदणे सुरू झाले की नाही यावर देखरेख म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे गटविकास अधिकारी रुपेश निमके यांच्या नेतृत्वात पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांचे नियंत्रण राहणार आहे. या पथकातर्फे ग्रामपंचायतींना अचानक भेटी दिल्या जात आहेत.यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले आहे. ग्रामपंचायतींच्या ताब्यात असलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. प्रती ग्रामपंचायत ७५० असे उद्दिष्ट असून, तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी आतापासून ग्रामपंचायतींनी कामाला सुरूवात करावी, अशा सूचना केल्या आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली.- गणेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.