शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

३.६८ लाख रोपांची होणार लागवड!

By admin | Updated: May 22, 2017 01:26 IST

४९१ ग्रामपंचायतींना दिले उद्दिष्ट : प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील प्रती ग्राम पंचायतला ७५० याप्रमाणे एकूण ४९१ ग्रामपंचायतींना तीन लाख ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने दिले आहे.५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. अन्य विभागांप्रमाणेच ग्राम पंचायतींनादेखील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे प्रत्येक ग्राम पंचायतने किमान ७५० रोपांची लागवड करावी, असे उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, एकूण उद्दिष्ट तीन लाख ६८ हजार २५० आहे. सर्वाधिक ग्राम पंचायती कारंजा तालुक्यात असून, या तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्यातील ८४ ग्राम पंचायतींना ६३ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींना ६२ हजार २५०, रिसोड तालुक्यातील ८० ग्राम पंचायतींना ६० हजार, मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींना ५७ हजार ७५० आणि मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींना ५७ हजार रोपांची लागवड करावी लागणार आहे. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे आतापासूनच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्राम पंचायत प्रशासनाला केल्या आहेत. या सुचनांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागले असल्याचे दिसून येते.‘नरेगा’ पथकाची पाहणीजिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिल्यानंतर वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापासूनच खड्डे खोदणे सुरू झाले की नाही यावर देखरेख म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे गटविकास अधिकारी रुपेश निमके यांच्या नेतृत्वात पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांचे नियंत्रण राहणार आहे. या पथकातर्फे ग्रामपंचायतींना अचानक भेटी दिल्या जात आहेत.यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले आहे. ग्रामपंचायतींच्या ताब्यात असलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. प्रती ग्रामपंचायत ७५० असे उद्दिष्ट असून, तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी आतापासून ग्रामपंचायतींनी कामाला सुरूवात करावी, अशा सूचना केल्या आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली.- गणेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.