शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

३५ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणीच नाही!

By admin | Updated: January 20, 2016 01:59 IST

मालेगाव तालुक्यातील शेतक-यांची दयनीय अवस्था, जमिनीत ओलावा नसल्यापे पेरणी रखडली.

मालेगाव : पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याचे परिणाम शेतकर्‍यांना रब्बी हंगामात भोगावे लागत आहेत. अल्प पाऊस आणि परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने मालेगाव तालुक्यातील ३५ टक्के जमिनीवर रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. एकूण ११ हजार ६५0 पैकी ७ हजार ६७८ हेक्टरवर पेरणी झाली. २0१५ च्या पावसाळ्यात सुरुवातीला जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला; मात्र मालेगाव तालुक्यातील शिरपूर, झोडगा, राजुरा परिसराचा अपवाद वगळता, उर्वरित भागात अल्प पाऊस झाला. त्यानंतरही पावसात नियमितता नव्हती. ऐन शेंगा भरण्याच्या वेळी पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली. खरीप हंगामातील कसर रब्बी हंगामातून काढण्याच्या दृष्टिकोनातून शेतकर्‍यांनी मशागत केली; मात्र, परतीच्या पावसाने दगा दिला. परिणामी, बर्‍याच कोरडवाहू शेतकर्‍यांना रबीची पेरणी करता आली नाही. मालेगाव तालुक्यात एकूण पेरणी ६५ टक्के झाली असून, ३५ टक्के क्षेत्र नापेर राहिले. जमिनीत ओलावा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. गव्हाचे सरासरी क्षेत्र ४२४0 हेक्टर असून, १४७६ हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १00 हेक्टर अपेक्षित असताना १५८ हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी मका पिकाची पेरणी होण्याचे अपेक्षित नसताना ७२ हेक्टरवर पेरणी झाली. हरभर्‍याचे सरासरी क्षेत्र ७ हजार २0 हेक्टर असून, ५ हजार ९६५ हेक्टरवर पेरणी झाली. करडईचे सरासरी क्षेत्र २७0 हेक्टर असून, कुठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. एकूण सरासरी ११ हजार ६५0 हेक्टर क्षेत्र असून, ७ हजार ६७८ हेक्टरवर पेरणी झाल्याने उर्वरित ३५ टक्के जमिनीवर पेरणी होऊ शकली नाही. जमिनीत ओलावा नसल्याने ३५ टक्के क्षेत्र नापेर राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसानच झाले आहे.