शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

३३ हजार कुटुंबियांशी प्रशासनाने साधला ‘संवाद’!

By admin | Updated: October 4, 2016 02:51 IST

‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ अभियानाचा समारोप ; प्रसार-प्रसिद्धीसाठीची चार वाहने झाली बंद.

वाशिम, दि. 3- स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 'भेटी-गाठी स्वच्छतेसाठी' या उपक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाशिम जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांशी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३0 हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्‍चित केले होते. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांच्या भेटी घेऊन शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. दरम्यान, मध्यंतरी जिल्हा स्वच्छता कक्षाकडे प्रचार-प्रसिद्धीसाठी केवळ एकच वाहन असल्याने या अभियानाची गती मंदावली होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधल्यानंतर चार वाहने मिळाली. त्यामुळे प्रचार-प्रसिद्धीला वेग आला. आता २ ऑक्टोबरला या अभियानाचा समारोप झाल्याने ही चार वाहनेदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा अभियानाची गती मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही.२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांकडे शौचालय बांधकामाचा आग्रह धरला. या अभियानादरम्यान जवळपास १८00 शौचालयांचे बांधकाम सुरू झाले. सन २0१६-१७ या वर्षात जिल्ह्यात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. वाशिम तालुक्यात ४0७६, मालेगाव तालुक्यात ४१३७, रिसोड तालुक्यात ४१४१, मंगरुळपीर तालुक्यात ५८८७, मानोरा ७९९६ व कारंजा तालुक्यात सर्वाधिक ९६२८ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हगणदरीमुक्त गाव मोहिमेत दिरंगाई करणार्‍या अधिकारी- कर्मचार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकार गणेश पाटील यांनी दिले आहेत. १२ हजार रुपयांचे अनुदान संबंधित पात्र लाभार्थीं देण्यात दिरंगाई झाली तर शिस्तभंगाची कारवाईदेखील केली जाणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. ह्यभेटी गाठी - स्वच्छतेसाठीह्ण या अभियानादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी ग्रामस्थांच्या दारी पोहोचले. परिणामी, गृहभेटी संवाद अभियानांतर्गतची उद्दिष्टपूर्ती झाली. आता चार वाहने बंद करण्यात आल्याने अभियानावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.