शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार कुटुंबियांशी प्रशासनाने साधला ‘संवाद’!

By admin | Updated: October 4, 2016 02:51 IST

‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ अभियानाचा समारोप ; प्रसार-प्रसिद्धीसाठीची चार वाहने झाली बंद.

वाशिम, दि. 3- स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 'भेटी-गाठी स्वच्छतेसाठी' या उपक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाशिम जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांशी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३0 हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्‍चित केले होते. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांच्या भेटी घेऊन शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. दरम्यान, मध्यंतरी जिल्हा स्वच्छता कक्षाकडे प्रचार-प्रसिद्धीसाठी केवळ एकच वाहन असल्याने या अभियानाची गती मंदावली होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधल्यानंतर चार वाहने मिळाली. त्यामुळे प्रचार-प्रसिद्धीला वेग आला. आता २ ऑक्टोबरला या अभियानाचा समारोप झाल्याने ही चार वाहनेदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा अभियानाची गती मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही.२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांकडे शौचालय बांधकामाचा आग्रह धरला. या अभियानादरम्यान जवळपास १८00 शौचालयांचे बांधकाम सुरू झाले. सन २0१६-१७ या वर्षात जिल्ह्यात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. वाशिम तालुक्यात ४0७६, मालेगाव तालुक्यात ४१३७, रिसोड तालुक्यात ४१४१, मंगरुळपीर तालुक्यात ५८८७, मानोरा ७९९६ व कारंजा तालुक्यात सर्वाधिक ९६२८ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हगणदरीमुक्त गाव मोहिमेत दिरंगाई करणार्‍या अधिकारी- कर्मचार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकार गणेश पाटील यांनी दिले आहेत. १२ हजार रुपयांचे अनुदान संबंधित पात्र लाभार्थीं देण्यात दिरंगाई झाली तर शिस्तभंगाची कारवाईदेखील केली जाणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. ह्यभेटी गाठी - स्वच्छतेसाठीह्ण या अभियानादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी ग्रामस्थांच्या दारी पोहोचले. परिणामी, गृहभेटी संवाद अभियानांतर्गतची उद्दिष्टपूर्ती झाली. आता चार वाहने बंद करण्यात आल्याने अभियानावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.