शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

जिल्ह्यातील ३0 प्रकल्प रखडले!

By admin | Updated: November 5, 2015 01:38 IST

वाशिम जिल्ह्यात केवळ ६८ हजार हेक्टरवर सिंचन.

वाशिम : शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारणारे जिल्ह्यातील ३0 सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या फेर्‍यातून अद्यापही बाहेर पडले नाहीत. परिणामी, सिंचन अनुशेषाचा आकडा फुगत असून, शेतकर्‍यांचा रबी हंगाम सिंचनाविना कोरडाच जात आहे. काळ बदलला, तसा शेती कसण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत आहे. या प्रयत्नांना शासनाकडूनही सिंचन प्रकल्पांच्या स्वरुपात मूर्त रुप दिले जात आहे. सिंचनाच्या माध्यमातून हिरवे स्वप्न साकारणार्‍या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर सद्यस्थितीत ३0 प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न गहन बनला आहे. जलसंपदा विभागाकडे २३ आणि अन्य महामंडळांकडे सात असे एकूण ३0 प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ठप्प आहेत. जिल्ह्यातील किनखेड, वडगाव, कुकसा, टनका, चाकातीर्थ, गोंडेगाव, जयपूर, कोकलगाव, उकळी, जुमडा, राजगाव, सोनगव्हाण, वाकद, ढिल्ली, वरूड, झोडगा, मिर्झापूर, कोयाळी, पांगराबंदी, आसेगाव, गणेशपूर, उमरी, वाडी रायताळ आणि पळसखेड या प्रमुख प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित आहे. जिल्ह्यात एक लाख २१ हजार ८९९ हेक्टरवर सिंचन होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ६८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ३0 सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे गेले तर शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात निकाली निघणार आहे; मात्र या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीच्या हालचालींना वेग नसल्याने किमान एक वर्षे तरी परिस्थिती ह्यजैसे थेह्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, सिंचनाअभावी रब्बी हंगाम कोरडाच जाण्याची भीती कोरडवाहू शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.