शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

जिल्ह्यातील ३0 प्रकल्प रखडले!

By admin | Updated: November 5, 2015 01:38 IST

वाशिम जिल्ह्यात केवळ ६८ हजार हेक्टरवर सिंचन.

वाशिम : शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारणारे जिल्ह्यातील ३0 सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या फेर्‍यातून अद्यापही बाहेर पडले नाहीत. परिणामी, सिंचन अनुशेषाचा आकडा फुगत असून, शेतकर्‍यांचा रबी हंगाम सिंचनाविना कोरडाच जात आहे. काळ बदलला, तसा शेती कसण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत आहे. या प्रयत्नांना शासनाकडूनही सिंचन प्रकल्पांच्या स्वरुपात मूर्त रुप दिले जात आहे. सिंचनाच्या माध्यमातून हिरवे स्वप्न साकारणार्‍या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर सद्यस्थितीत ३0 प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न गहन बनला आहे. जलसंपदा विभागाकडे २३ आणि अन्य महामंडळांकडे सात असे एकूण ३0 प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ठप्प आहेत. जिल्ह्यातील किनखेड, वडगाव, कुकसा, टनका, चाकातीर्थ, गोंडेगाव, जयपूर, कोकलगाव, उकळी, जुमडा, राजगाव, सोनगव्हाण, वाकद, ढिल्ली, वरूड, झोडगा, मिर्झापूर, कोयाळी, पांगराबंदी, आसेगाव, गणेशपूर, उमरी, वाडी रायताळ आणि पळसखेड या प्रमुख प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित आहे. जिल्ह्यात एक लाख २१ हजार ८९९ हेक्टरवर सिंचन होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ६८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ३0 सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे गेले तर शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात निकाली निघणार आहे; मात्र या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीच्या हालचालींना वेग नसल्याने किमान एक वर्षे तरी परिस्थिती ह्यजैसे थेह्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, सिंचनाअभावी रब्बी हंगाम कोरडाच जाण्याची भीती कोरडवाहू शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.