शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात २९४ रोहित्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात ...

वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्र अंधारात काढावी लागत आहे. शिवाय इतरही अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणकडून रोहित्र तातडीने दुरुस्त करण्याची धडपड दर दिवशी पाहायला मिळत आहे. गत १५ दिवसांत जिल्ह्यात २९४ रोहित्र बिघाडामुळे बंद पडले असून, त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.

वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा देण्यात कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमी अधिक दाबासह वादळी वारा आणि पावसामुळे रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रातील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या प्रकारात लक्षणीय वाढ होते. या काळात महिन्याला ७०० ते ८०० रोहित्र बिघाडाने बंद पडतात. पावसाळ्याच्या दिवसातही असे प्रकार बरेच ठिकाणी घडतात. त्यात गत १५ दिवसातच २९४ रोहित्र नादुरुस्त झाले असून, ग्रामस्थ व व्यावसायिकांची अडचण दूर करण्यासाठी महावितरणने त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

थकबाकीमुळे १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित

वाशिम जिल्ह्यात महावितरणची ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली असून, जिल्ह्यासाठी ७५.७९ कोटी वसुलीचे उद्दिष्ट या महिन्याच्या सुरुवातीला ठरवून देण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यामुळेच व्यावसायिक आणि वाणिज्य सह कृषी फिडरवरील नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्यानंतरच दुरुस्त करून बसविले जात आहेत. यामुळेच १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित आहे.

थकबाकी वसुलीस वेग

ज्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीपंप वीज ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मार्चमध्ये काेरोनामुळे लॉकडाऊन झाला. तेव्हापासून ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता वाशिम जिल्हा अनलॉक झाल्यानंतर थकबाकी वसुलीस महावितरणने वेग दिला आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेत पावसाळ्यात रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी असते. तथापि, गत १५ दिवसात २९४ रोहित्रात वादळी वारा, पावसामुळे बिघाड झाला. ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता त्यापैकी २७७ दुरुस्त ही करण्यात आले असून, रोहित्र दुरुस्त करून ऑइल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.

-आर. जी. तायडे

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम.