शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात २९४ रोहित्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात ...

वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्र अंधारात काढावी लागत आहे. शिवाय इतरही अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणकडून रोहित्र तातडीने दुरुस्त करण्याची धडपड दर दिवशी पाहायला मिळत आहे. गत १५ दिवसांत जिल्ह्यात २९४ रोहित्र बिघाडामुळे बंद पडले असून, त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.

वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा देण्यात कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमी अधिक दाबासह वादळी वारा आणि पावसामुळे रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रातील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या प्रकारात लक्षणीय वाढ होते. या काळात महिन्याला ७०० ते ८०० रोहित्र बिघाडाने बंद पडतात. पावसाळ्याच्या दिवसातही असे प्रकार बरेच ठिकाणी घडतात. त्यात गत १५ दिवसातच २९४ रोहित्र नादुरुस्त झाले असून, ग्रामस्थ व व्यावसायिकांची अडचण दूर करण्यासाठी महावितरणने त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

थकबाकीमुळे १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित

वाशिम जिल्ह्यात महावितरणची ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली असून, जिल्ह्यासाठी ७५.७९ कोटी वसुलीचे उद्दिष्ट या महिन्याच्या सुरुवातीला ठरवून देण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यामुळेच व्यावसायिक आणि वाणिज्य सह कृषी फिडरवरील नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्यानंतरच दुरुस्त करून बसविले जात आहेत. यामुळेच १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित आहे.

थकबाकी वसुलीस वेग

ज्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीपंप वीज ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मार्चमध्ये काेरोनामुळे लॉकडाऊन झाला. तेव्हापासून ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता वाशिम जिल्हा अनलॉक झाल्यानंतर थकबाकी वसुलीस महावितरणने वेग दिला आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेत पावसाळ्यात रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी असते. तथापि, गत १५ दिवसात २९४ रोहित्रात वादळी वारा, पावसामुळे बिघाड झाला. ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता त्यापैकी २७७ दुरुस्त ही करण्यात आले असून, रोहित्र दुरुस्त करून ऑइल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.

-आर. जी. तायडे

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम.