शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

१५ दिवसात २९४ रोहित्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात ...

वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्र अंधारात काढावी लागत आहे. शिवाय इतरही अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणकडून रोहित्र तातडीने दुरुस्त करण्याची धडपड दर दिवशी पाहायला मिळत आहे. गत १५ दिवसांत जिल्ह्यात २९४ रोहित्र बिघाडामुळे बंद पडले असून, त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.

वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा देण्यात कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमी अधिक दाबासह वादळी वारा आणि पावसामुळे रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रातील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या प्रकारात लक्षणीय वाढ होते. या काळात महिन्याला ७०० ते ८०० रोहित्र बिघाडाने बंद पडतात. पावसाळ्याच्या दिवसातही असे प्रकार बरेच ठिकाणी घडतात. त्यात गत १५ दिवसातच २९४ रोहित्र नादुरुस्त झाले असून, ग्रामस्थ व व्यावसायिकांची अडचण दूर करण्यासाठी महावितरणने त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

थकबाकीमुळे १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित

वाशिम जिल्ह्यात महावितरणची ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली असून, जिल्ह्यासाठी ७५.७९ कोटी वसुलीचे उद्दिष्ट या महिन्याच्या सुरुवातीला ठरवून देण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यामुळेच व्यावसायिक आणि वाणिज्य सह कृषी फिडरवरील नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्यानंतरच दुरुस्त करून बसविले जात आहेत. यामुळेच १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित आहे.

थकबाकी वसुलीस वेग

ज्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीपंप वीज ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मार्चमध्ये काेरोनामुळे लॉकडाऊन झाला. तेव्हापासून ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता वाशिम जिल्हा अनलॉक झाल्यानंतर थकबाकी वसुलीस महावितरणने वेग दिला आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेत पावसाळ्यात रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी असते. तथापि, गत १५ दिवसात २९४ रोहित्रात वादळी वारा, पावसामुळे बिघाड झाला. ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता त्यापैकी २७७ दुरुस्त ही करण्यात आले असून, रोहित्र दुरुस्त करून ऑइल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.

-आर. जी. तायडे

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम.