शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाची थकबाकी २७० कोटींवर!

By admin | Updated: June 13, 2017 01:18 IST

शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन: आर्थिक स्थितीची महावितरणला जाणीव

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून, ती आजमितीस तब्बल २७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे महावितरण हतबल झाले असून, थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू देयक तरी अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ४६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफूल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी न चुकता विजेचे देयक अदा करतात; मात्र बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी २७० कोटी रुपयांवर गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांंपैकी ४० हजार ५०० कृषी पंपधारकांकडे ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे वीज देयक थकीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नसून, शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी पंपांच्या थकबाकीची ही आकडेवारी मोठी वाटत असली तरी, ती एका वर्षातील नाही. त्यातच अनेक शेतकरी नियमित विजबिल भरणा करून वीज वितरणला सहकार्य करीत असल्याने कृषी पंपाच्या जोडणीलाही महावितरणकडून वेग देण्यात येत असल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होते.