शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

कृषी पंपाची थकबाकी २७० कोटींवर!

By admin | Updated: June 13, 2017 01:18 IST

शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन: आर्थिक स्थितीची महावितरणला जाणीव

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून, ती आजमितीस तब्बल २७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे महावितरण हतबल झाले असून, थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू देयक तरी अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ४६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफूल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी न चुकता विजेचे देयक अदा करतात; मात्र बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी २७० कोटी रुपयांवर गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांंपैकी ४० हजार ५०० कृषी पंपधारकांकडे ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे वीज देयक थकीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नसून, शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी पंपांच्या थकबाकीची ही आकडेवारी मोठी वाटत असली तरी, ती एका वर्षातील नाही. त्यातच अनेक शेतकरी नियमित विजबिल भरणा करून वीज वितरणला सहकार्य करीत असल्याने कृषी पंपाच्या जोडणीलाही महावितरणकडून वेग देण्यात येत असल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होते.