शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

रिसोडमधील २७ हजार विद्यार्थ्यांची होणार आधारशी जोडणी

By admin | Updated: June 29, 2015 01:20 IST

आधार जोडणी शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांंच्या शोध मोहिमेचा एक भाग.

विवेकानंद ठाकरे / रिसोड ( जि. वाशिम) : शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेचा एक भाग म्हणून राज्य शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याची आधारकार्डशी जोडणी सक्तीची केली आहे. चालू शैक्षणिक सत्रापासून प्रवेश प्रक्रियेदरम्यान आधारकार्ड घेण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रिसोड तालुक्यातील २७ हजार विद्यार्थ्यांंची आता आधारकार्डशी जोडणी होणार आहे. विद्यार्थ्यांंच्या आधारकार्डची लिंक थेट दाखल खारीज नोंद रजिस्टरमध्ये जोडली जाणार आहे. परिणामी आधारकार्ड प्रवेश घेताना क्रमप्राप्त करण्यात आले असल्याचे माहिती आहे. जिल्हय़ात त्या अनुषंगाने प्रशासनाने विद्यार्थ्यांंसाठी आधार केंद्रांतर्गत आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिक्षण विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार २0१४-१५ मध्ये रिसोड तालुक्यातील १९६ शाळांमध्ये ४७ हजार ६९१ विद्यार्थी होते. यापैकी केवळ १६ हजार ६९२ विद्यार्थ्यांंचे आधारकार्ड काढण्यात आलेले आहे. त्यामुळे आता २६ हजार ६३८ विद्यार्थ्यांंचे आधारकार्ड काढण्याचा अजेंडा रिसोड पंचायत समितीने हाती घेतला आहे. ऑगस्ट २0१५ पर्यंंत शंभर टक्के विद्यार्थ्यांंची आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागासमोर आहे. त्यामुळे पंचायत समितीने १00 टक्के विद्यार्थ्यांंची आधारशी जोडणी व्हावी यासाठी नियोजन जवळपास पूर्ण केले आहे. बोगस विद्यार्थी व पटसंख्या शोधण्याच्या दृष्टीने शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे शालेय पोषण आहार पुस्तके, अनुदान, आदी वाटपामध्ये पारदर्शका निर्माण व्हावी यासाठीही मोहीम महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे. आधार जोडणीमुळे शाळांमध्ये बोगस विद्यार्थी राहणार नाही.