शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

जिल्ह्यातील २६ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:42 IST

पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच ...

पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच होती. त्यात ३५ पेक्षा अधिक प्रकल्पांत २५ टक्केही जलसाठा झाला नव्हता. जून महिन्याच्या अखेरपासून पावसाने खंड दिल्याने प्रकल्पांच्या पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढवते की काय, अशी भीतीही वाटू लागली होती. दरम्यान, जिल्ह्यात १२ जुलैपासून पावसाने ठाणच मांडले. सतत पडत असलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी प्रकल्पांच्या पातळीला मोठा आधार मिळाला आणि अवघ्या १० दिवसांत प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरून वाढत ५२.३१ टक्क्यांवर पोहोचली. त्यात ३ मध्यम प्रकल्पांची सरासरी पातळी ६५.६० टक्के आहे. शिवाय २६ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले, तर १३ प्रकल्पांत ७५ ते ९९ टक्के, २३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर ३६ प्रकल्पात २५ ते ५० टक्के जलसाठा झाला आहे.

----------

२३ प्रकल्पांत ठणठणाटच

जिल्ह्यातील १३७ पैकी २६ प्रकल्प शंभर टक्के भरले, तर ५२ प्रकल्पांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला असला तरी ३८ प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. त्यात १२ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ३ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे, तर २३ प्रकल्पांत अद्यापही ठणठणाटच आहे. त्यामुळे संबंधित भागांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या गंभीर होऊ शकते.

----------

मानोरा तालुक्याची स्थिती दमदार

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असली तरी जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती सर्वात चांगली आहे. या तालुक्यातील १३ प्रकल्प शंभर टक्के भरले असून, तालुक्यातील २५ प्रकल्पांत सरासरी ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे.

--------------------------

वाशिम तालुक्याची स्थिती गंभीर

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असताना वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील १९ प्रकल्पांत मृतसाठाच आहे. तसेच २ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी, तर ५ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असून, या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे. तालुक्यातील ३६ प्रकल्पांत मिळून केवळ १८.४३ टक्के जलसाठा झाला आहे.

लघु प्रकल्पांतील तालुकानिहाय जलसाठा

तालुका - प्रकल्प - जलसाठा (टक्के)

वाशिम - ३६ - १८.४३

मालेगाव - २३ - ६५.३९

रिसोड - १९ - ३३.१८

मं.पीर. - १५ - ६३.०६

मानोरा - २५ - ८१.८९

कारंजा - १६ - ५३.७३

--------------------------

मध्यम प्रकल्पांची पातळी

प्रकल्प - पातळी (टक्के)

एक बुर्जी - ८९.६४

सोनल - ६१.४७

अडाण - ६२.३६