शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

अत्याचाराला १८३ महिला ‘बळी’

By admin | Updated: July 6, 2015 02:19 IST

२0१४ च्या तुलनेत २0१५ मध्ये अन्यायाचा आलेख उंचावला.

धनंजय कपाले /वाशिम : विविध प्रकारचे कायदे, समाजधुरीणांचे प्रयत्न, पोलीस यंत्रणेचा दराराही महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यात कमी पडत असल्याचे अत्याचारीत घटनांच्या नोंदीहून दिसून येते. एकीकडे महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे महिलांवर दिवसाढवळ्या अन्याय -अत्याचार होत आहेत. वाशिम जिल्हय़ात २0१४ च्या तुलनेत २0१५ या वर्षाच्या सहामाहीत विनयभंग, बलात्कार, छळ, पळवून नेणे आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तब्बल १८३ घटनांची नोंद आहे. गतवर्षी सहामाहीत हा आकडा १४३ असा होता. चार भिंतीच्या आड असणारे विश्‍व महिलांना हळूहळू खुले होत गेले. दुय्यम असणारा दर्जा आता अव्वलपर्यंंंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५0 टक्के आरक्षण, कायद्याचे संरक्षण, कोणत्याही क्षेत्रात प्राधान्य आदी सर्वकाही महिलांसाठी केले जात आहे. एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला यशाचे शिखर गाठत आहेत तर दुसरीकडे अन्याय-अत्याचाराचे घावही त्या सोसत आहेत. विनयभंग, बलात्कार, अपहरण या घटना तर युवती व महिलांचा जीवन जगण्याचा जणू हक्कच हिरावून घेत आहेत. येथे कायदा व पोलीस संरक्षणही कुचकामी ठरत असल्याचे, आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुलामगिरीच्या विश्‍वातून स्वातंत्र्यात पदार्पण केल्यानंतर महिलांना खर्‍या अर्थाने व्यासपीठ मिळू लागले. कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीचे सोने करीत महिलादेखील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत; मात्र त्यांच्या पंखातील बळ काढून घेण्याचेही प्रयत्न असामाजिक तत्त्वांकडून होत असल्याचे अन्याय-अत्याचाराच्या घटनांवरून स्पष्ट होते. आजही वाशिम शहराबरोबरच जिल्हय़ातील अनेक युवतींना रोडरोमियोंच्या टिंगलटवाळीला बळी पडावे लागत आहे. टारगट मुलांच्या टोळक्यांमुळे मानसिक यातना सहन करीत युवतींना वाटचाल करावी लागत आहे. जिल्हय़ात जानेवारी ते मे २0१५ या कालावधीत विनयभंगाच्या तब्बल ८३ घटना घडल्या आहेत. गतवर्षी याच कालावधीत ५९ युवती व महिलांना विनयभंगाच्या घटनांना बळी पडावे लागले होते. सासरच्या मंडळीकडून छळ होण्याच्या घटनेत किंचितशी वाढ झाली आहे. यावर्षी ५६ घटनांची नोंद असून, गतवर्षी हा आकडा ५४ असा होता. महिलांना पळवून नेण्याच्या घटनेत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. गतवर्षी १२ घटनांची नोंद होती. यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीत पळवून नेण्याच्या तब्बल २१ घटना घडल्या आहेत. सासरच्या छळाला कंटाळून यावर्षी सहा विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद पोलीस विभागाच्या दप्तरी आहे.