शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

अत्याचाराला १८३ महिला ‘बळी’

By admin | Updated: July 6, 2015 02:19 IST

२0१४ च्या तुलनेत २0१५ मध्ये अन्यायाचा आलेख उंचावला.

धनंजय कपाले /वाशिम : विविध प्रकारचे कायदे, समाजधुरीणांचे प्रयत्न, पोलीस यंत्रणेचा दराराही महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यात कमी पडत असल्याचे अत्याचारीत घटनांच्या नोंदीहून दिसून येते. एकीकडे महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे महिलांवर दिवसाढवळ्या अन्याय -अत्याचार होत आहेत. वाशिम जिल्हय़ात २0१४ च्या तुलनेत २0१५ या वर्षाच्या सहामाहीत विनयभंग, बलात्कार, छळ, पळवून नेणे आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तब्बल १८३ घटनांची नोंद आहे. गतवर्षी सहामाहीत हा आकडा १४३ असा होता. चार भिंतीच्या आड असणारे विश्‍व महिलांना हळूहळू खुले होत गेले. दुय्यम असणारा दर्जा आता अव्वलपर्यंंंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५0 टक्के आरक्षण, कायद्याचे संरक्षण, कोणत्याही क्षेत्रात प्राधान्य आदी सर्वकाही महिलांसाठी केले जात आहे. एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला यशाचे शिखर गाठत आहेत तर दुसरीकडे अन्याय-अत्याचाराचे घावही त्या सोसत आहेत. विनयभंग, बलात्कार, अपहरण या घटना तर युवती व महिलांचा जीवन जगण्याचा जणू हक्कच हिरावून घेत आहेत. येथे कायदा व पोलीस संरक्षणही कुचकामी ठरत असल्याचे, आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुलामगिरीच्या विश्‍वातून स्वातंत्र्यात पदार्पण केल्यानंतर महिलांना खर्‍या अर्थाने व्यासपीठ मिळू लागले. कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीचे सोने करीत महिलादेखील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत; मात्र त्यांच्या पंखातील बळ काढून घेण्याचेही प्रयत्न असामाजिक तत्त्वांकडून होत असल्याचे अन्याय-अत्याचाराच्या घटनांवरून स्पष्ट होते. आजही वाशिम शहराबरोबरच जिल्हय़ातील अनेक युवतींना रोडरोमियोंच्या टिंगलटवाळीला बळी पडावे लागत आहे. टारगट मुलांच्या टोळक्यांमुळे मानसिक यातना सहन करीत युवतींना वाटचाल करावी लागत आहे. जिल्हय़ात जानेवारी ते मे २0१५ या कालावधीत विनयभंगाच्या तब्बल ८३ घटना घडल्या आहेत. गतवर्षी याच कालावधीत ५९ युवती व महिलांना विनयभंगाच्या घटनांना बळी पडावे लागले होते. सासरच्या मंडळीकडून छळ होण्याच्या घटनेत किंचितशी वाढ झाली आहे. यावर्षी ५६ घटनांची नोंद असून, गतवर्षी हा आकडा ५४ असा होता. महिलांना पळवून नेण्याच्या घटनेत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. गतवर्षी १२ घटनांची नोंद होती. यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीत पळवून नेण्याच्या तब्बल २१ घटना घडल्या आहेत. सासरच्या छळाला कंटाळून यावर्षी सहा विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद पोलीस विभागाच्या दप्तरी आहे.