शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

१८ कार्यालयाचे प्रस्ताव तात्काळ पाठवा

By admin | Updated: December 11, 2014 00:21 IST

मुख्यमंत्र्यांचे अधिका-यांना निर्देश; वाशिम जिल्हयाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा.

वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला तब्बल १६ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला तरी मुख्यालयी अद्याप १८ कार्यालये नाहीत. या प्रशासकीय बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. बुधवारी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्हयाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना १८ कार्यालयाचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याचे निर्देश दिले.बुधवारी आढावा बैठकीत भंडारा जिल्ह्यापासून सुरूवात करण्यात आली. या आढाव्यामध्ये दुष्काळ, पाणी टंचाई याबाबत विस्तुत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्हयाचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी जिल्हयातील उपस्थित जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह विविध विभागातील अधिका-यांना जिल्हयात ज्या कार्यालयासाठी जागा नाही जे भाडयांच्या जागेत आहेत अशा कार्यालयांसाठी आपल्याकडे जागा उपलब्ध आहे . त्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवा असे निर्देश दिले. प्रस्ताव पाठविल्याबरोबर ते मंजुर करून घेवू असेही त्यांनी सांगितले.अकोला दरबारातून प्रशासनाचा गाडा हाकताना काही तालुक्यावर होणारा अन्याय, त्यातूनच विकासाचा वाढलेला अनुशेष, कारभार्‍यांची कार्यप्रणालीवरील सैल झालेली पकड आणि परिणामी सामान्य माणसांची होणारी होरपळ, याप्रश्नाची दखल यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली. यामुळे वाशिम जिल्ह्याची प्रशासकीय कामात गती येणार असल्याची आशा दिसत आहे.