शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

महाराष्ट्रदिनी १७ हजार नागरिक करणार श्रमदान

By admin | Updated: May 1, 2017 02:13 IST

‘आॅनलाइन’ नोंदणी : आमिर खानच्या आवाहनास प्रतिसाद

दादाराव गायकवाड - वाशिमपाणी फाउंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रदिनी १ मे रोजी ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी व्हा, गावात येऊन श्रमदानात आपले योगदान नोंदवा, आपला आवडता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शहर आणि गाव एकत्र मिळून काम करू या’ असे आवाहन अभिनेता अमिर खानने केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला असून, रविवारपर्यंत १७ हजार १८५ लोकांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली. कारंजा शहरातील २९७ पेक्षा जास्त नागरिकांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. कारंजा शहरातील नागरिकांचे श्रमदान जयपूर येथे होणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी जलसंधारणाच्या कामात श्रमदान करण्याच्या उद्देशाने शहरी भागातील नागरिकांची आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी राज्यातील १३ तालुक्यात सुविधा करण्यात आली. यामध्ये विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, अकोला जिल्ह्यातील अकोट, अमरावती जिल्ह्यातील वरूड, वर्धा जिल्हयातील आर्वी, तसेच राज्याच्या इतर भागातून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि आटपाटी, अंबाजोगाई जिल्ह्यातील केज, लातूर जिल्ह्यातील औसा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका या तालुक्याची १ मे रोजीच्या ‘चला गावी’ अभियानासाठी निवड करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून नागरी भागातील जनतेला जलसंधारणाच्या कामांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि आपला सहभाग नोंदविण्यासाठी एक यूआरएल लिंक जाहीर करून त्याद्वारे पाणी फाउंडेशनशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली. याला राज्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत गावात श्रमदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत गावकरी करणार आहेत. शहर आणि महानगरातील लोकांना दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घेण्यासाठीचा आणि श्रमदानाच्या माध्यमातून शहर आणि गावातील लोकांमध्ये संवाद साधून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आॅनलाइन श्रमदानासाठी पाणी फाउंडेशन मुंबई कार्यालयात नोंदणी केल्यामध्ये श्रमदानासाठी महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती जयपूर येथे येणार, पण तो कोण प्रतिष्ठीत आहे, की उघोगपती आहे की सिनेकलाकार आहे किंवा वर्ग १ चे अधिकारी आहेत हे गावकऱ्यांना माहित नसणार आहे. ते १ मे रोजी सकाळी ६ वाजता गावात येऊन ९ वाजेपर्र्यंत गावकऱ्यांनी नेमून दिलेल्या कामांत श्रमदान करणार आहेत. शहरी व ग्रामीण भागातील जनतेत सुसंवाद होऊन जलसंधारणाची कामे सोपी व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनी नागरी भागातील लोकांना ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील १३ तालुक्यांत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. - लॅन्सी फर्नांडिज, प्रशिक्षण प्रमुख, पाणी फाउंडेशन