शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रदिनी १७ हजार नागरिक करणार श्रमदान

By admin | Updated: May 1, 2017 02:13 IST

‘आॅनलाइन’ नोंदणी : आमिर खानच्या आवाहनास प्रतिसाद

दादाराव गायकवाड - वाशिमपाणी फाउंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रदिनी १ मे रोजी ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी व्हा, गावात येऊन श्रमदानात आपले योगदान नोंदवा, आपला आवडता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शहर आणि गाव एकत्र मिळून काम करू या’ असे आवाहन अभिनेता अमिर खानने केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला असून, रविवारपर्यंत १७ हजार १८५ लोकांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली. कारंजा शहरातील २९७ पेक्षा जास्त नागरिकांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. कारंजा शहरातील नागरिकांचे श्रमदान जयपूर येथे होणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी जलसंधारणाच्या कामात श्रमदान करण्याच्या उद्देशाने शहरी भागातील नागरिकांची आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी राज्यातील १३ तालुक्यात सुविधा करण्यात आली. यामध्ये विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, अकोला जिल्ह्यातील अकोट, अमरावती जिल्ह्यातील वरूड, वर्धा जिल्हयातील आर्वी, तसेच राज्याच्या इतर भागातून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि आटपाटी, अंबाजोगाई जिल्ह्यातील केज, लातूर जिल्ह्यातील औसा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका या तालुक्याची १ मे रोजीच्या ‘चला गावी’ अभियानासाठी निवड करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून नागरी भागातील जनतेला जलसंधारणाच्या कामांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि आपला सहभाग नोंदविण्यासाठी एक यूआरएल लिंक जाहीर करून त्याद्वारे पाणी फाउंडेशनशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली. याला राज्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत गावात श्रमदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत गावकरी करणार आहेत. शहर आणि महानगरातील लोकांना दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घेण्यासाठीचा आणि श्रमदानाच्या माध्यमातून शहर आणि गावातील लोकांमध्ये संवाद साधून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आॅनलाइन श्रमदानासाठी पाणी फाउंडेशन मुंबई कार्यालयात नोंदणी केल्यामध्ये श्रमदानासाठी महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती जयपूर येथे येणार, पण तो कोण प्रतिष्ठीत आहे, की उघोगपती आहे की सिनेकलाकार आहे किंवा वर्ग १ चे अधिकारी आहेत हे गावकऱ्यांना माहित नसणार आहे. ते १ मे रोजी सकाळी ६ वाजता गावात येऊन ९ वाजेपर्र्यंत गावकऱ्यांनी नेमून दिलेल्या कामांत श्रमदान करणार आहेत. शहरी व ग्रामीण भागातील जनतेत सुसंवाद होऊन जलसंधारणाची कामे सोपी व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनी नागरी भागातील लोकांना ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील १३ तालुक्यांत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. - लॅन्सी फर्नांडिज, प्रशिक्षण प्रमुख, पाणी फाउंडेशन