शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रदिनी १७ हजार नागरिक करणार श्रमदान

By admin | Updated: May 1, 2017 02:13 IST

‘आॅनलाइन’ नोंदणी : आमिर खानच्या आवाहनास प्रतिसाद

दादाराव गायकवाड - वाशिमपाणी फाउंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रदिनी १ मे रोजी ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी व्हा, गावात येऊन श्रमदानात आपले योगदान नोंदवा, आपला आवडता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शहर आणि गाव एकत्र मिळून काम करू या’ असे आवाहन अभिनेता अमिर खानने केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला असून, रविवारपर्यंत १७ हजार १८५ लोकांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली. कारंजा शहरातील २९७ पेक्षा जास्त नागरिकांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. कारंजा शहरातील नागरिकांचे श्रमदान जयपूर येथे होणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी जलसंधारणाच्या कामात श्रमदान करण्याच्या उद्देशाने शहरी भागातील नागरिकांची आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी राज्यातील १३ तालुक्यात सुविधा करण्यात आली. यामध्ये विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, अकोला जिल्ह्यातील अकोट, अमरावती जिल्ह्यातील वरूड, वर्धा जिल्हयातील आर्वी, तसेच राज्याच्या इतर भागातून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि आटपाटी, अंबाजोगाई जिल्ह्यातील केज, लातूर जिल्ह्यातील औसा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका या तालुक्याची १ मे रोजीच्या ‘चला गावी’ अभियानासाठी निवड करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून नागरी भागातील जनतेला जलसंधारणाच्या कामांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि आपला सहभाग नोंदविण्यासाठी एक यूआरएल लिंक जाहीर करून त्याद्वारे पाणी फाउंडेशनशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली. याला राज्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत गावात श्रमदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत गावकरी करणार आहेत. शहर आणि महानगरातील लोकांना दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घेण्यासाठीचा आणि श्रमदानाच्या माध्यमातून शहर आणि गावातील लोकांमध्ये संवाद साधून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आॅनलाइन श्रमदानासाठी पाणी फाउंडेशन मुंबई कार्यालयात नोंदणी केल्यामध्ये श्रमदानासाठी महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती जयपूर येथे येणार, पण तो कोण प्रतिष्ठीत आहे, की उघोगपती आहे की सिनेकलाकार आहे किंवा वर्ग १ चे अधिकारी आहेत हे गावकऱ्यांना माहित नसणार आहे. ते १ मे रोजी सकाळी ६ वाजता गावात येऊन ९ वाजेपर्र्यंत गावकऱ्यांनी नेमून दिलेल्या कामांत श्रमदान करणार आहेत. शहरी व ग्रामीण भागातील जनतेत सुसंवाद होऊन जलसंधारणाची कामे सोपी व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनी नागरी भागातील लोकांना ‘चला गावी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील १३ तालुक्यांत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. - लॅन्सी फर्नांडिज, प्रशिक्षण प्रमुख, पाणी फाउंडेशन