शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी!

By admin | Updated: May 18, 2017 01:39 IST

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन : जिल्ह्यातील शिरपूर-खंडाळा वीज उपकेंद्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याने जिल्ह्यातील वीजविषयक प्रलंबित बहुतांशी प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर-खंडाळा येथील ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी बुधवारी ते बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शबानाबी मो. इमदाद, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगला गवई, शिरपूरच्या सरपंच सुनीता अंभोरे, राजू पाटील राजे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता विनोद बेथारिया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.ना. बावनकुळे पुढे म्हणाले, की ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला मजबुती देण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन वर्षांत वीज यंत्रणा सक्षम करण्यासोबतच राज्यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. याकरिता आतापर्यंत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यासाठी नवीन तीन लाख अर्ज प्राप्त झाले असून, याकरिता आणखी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांना वीज जोडणीबरोबरच वीज बचत करणारे कृषी पंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बचतीबरोबरच शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ मिळावा, याकरिता आणखी १० हजार सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत एक हजार कृषी पंपांच्या गटाला पीपीपी तत्त्वावर स्वतंत्र्य सौर वाहिनी निर्माण करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत दिवसाची १२ तास वीज उपलब्ध करून देणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सागितले.पैनगंगा बॅरेज परिसरातील कृषी पंपांना वीज जोडण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, याकरिताही लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. सध्याचे युग हे आधुनिकीकरणाचे असून, यामध्ये वीज खात्याची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी महावितरणने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या सुविधेसाठी मोबाइल अ‍ॅप निर्माण केले. त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही ना. बावनकुळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता भादीकर यांनी केले. संचालन प्रभाकर लहाने यांनी केले. कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी आभार मानले.बावनकुळे हे ‘ऊर्जाशील’ मंत्री- खासदार गवळीजिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडण्याचा पंधरा वर्षातील अनुशेष अडीच वर्षात पूर्ण झाला असल्याचे सांगून, वीज यंत्रणेत सुधार झाल्याचे खासदार भावना गवळी यांनी यावेळी सांगितले. याबद्दल त्यांनी ऊर्जा मंत्री ना. बावनकुळे यांची ‘ऊर्जाशील’ मंत्री म्हणून कौतुक केले. आ. पाटणी म्हणाले, ना. बावनकुळे यांच्यामुळे जिल्ह्यातील विजेच्या अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागल्या असून, अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्र व रोहित्र उभारणी झाली आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडण्याच्या कामास गती मिळाली असून, आगामी काळातही वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणखी निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आ. झनक यांनी शिरपूर-खंडाळा उपकेंद्राच्या निर्मितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना योग्य दाबाने व अखंडित वीज मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.