शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

१५ गावांना पाणीटंचाईच्या झळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर ३ गावात टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी एका गावात टँकर सुरू झाले आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात ब-यापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी १५ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. जवळपास १२ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर पाच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिस-या आठवड्यातही तालुक्यातील ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. आता तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील पांगरी कुटे, शेलगाव बोदाडे, ब्राह्मणवाडा खुर्द, मानका, कोलही, वारंगी, बोर्डी, जऊळका, वरदरी बुद्रुक, वरदरी खुर्द, राजुरा, गिव्हा कुटे, भेरा, खैरखेडा, पिंपळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावात शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतु, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरुस्ती, विहीर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

०००

बॉक्स

बारा ठिकाणी विहीर अधिग्रहण

तालुक्यातील १२ गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावक-यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.

०००

कोट बॉक्स

आमच्याकडे जे प्रस्ताव आले, ते मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहेत. अजून जे प्रस्ताव प्राप्त होतील, ते पाठवून पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल.

श्रीनिवास पदमनवार

गटविकास अधिकारी, पं. स. मालेगाव