शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

१५ गावांना पाणीटंचाईच्या झळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर ३ गावात टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी एका गावात टँकर सुरू झाले आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात ब-यापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी १५ पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. जवळपास १२ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर पाच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिस-या आठवड्यातही तालुक्यातील ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. आता तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील पांगरी कुटे, शेलगाव बोदाडे, ब्राह्मणवाडा खुर्द, मानका, कोलही, वारंगी, बोर्डी, जऊळका, वरदरी बुद्रुक, वरदरी खुर्द, राजुरा, गिव्हा कुटे, भेरा, खैरखेडा, पिंपळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय काही गावात शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतु, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरुस्ती, विहीर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

०००

बॉक्स

बारा ठिकाणी विहीर अधिग्रहण

तालुक्यातील १२ गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावक-यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.

०००

कोट बॉक्स

आमच्याकडे जे प्रस्ताव आले, ते मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहेत. अजून जे प्रस्ताव प्राप्त होतील, ते पाठवून पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल.

श्रीनिवास पदमनवार

गटविकास अधिकारी, पं. स. मालेगाव