शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे १५ हजार शेतक-यांचे नुकसान

By admin | Updated: April 2, 2015 02:25 IST

वाशिम जिल्ह्यात ३२ हजार हेक्टर नुकसानाचा प्राथमिक अंदाज; मात्र प्रत्यक्ष नुकसान दाखविले केवळ पाच हजार हेक्टर.

वाशिम : मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच शेतकर्‍यांवर आलेल्या संकटामुळे शेतकरी पार खचून गेला. जिल्हय़ात ९, १0 व ११ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील ८0 हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. अंतिम अहवालात मात्र गारपिटीमुळे ५ हजार १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये नुकसानग्रस्त १५७८५ शेतकर्‍यांचा समावेश आहे.जिल्हय़ात ९ व १0 मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाने सर्वेक्षण व पंचनामे करून ३२ हजाराच्यावर हेक्क्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाजही वर्तविला होता व तसा अहवालही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता; मात्र या नुकसानामध्ये ५0 टक्केच्यावर नुकसान झालेले क्षेत्र केवळ ५१३१ असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्यावतिने कळविण्यात आले आहे. शासनाने गारपीटग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांना अद्याप मदत जाहीर केली नसली तरी मदत मात्र ५0 टक्केच्यावर नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. इतर शेतकर्‍यांचे ५0 टक्केच्या आत नुकसान असल्याने मात्र मिळणार्‍या मदतीचा काहीही फायदा होणार नाही. जिल्हय़ात मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये गहू या पिकाचे वाशिम तालुक्यात १२0 हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यात २९00 हेक्टर, मानोरा तालुक्यात ३१९0 हेक्टर, कारंजा तालुक्यात २३९0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच हरभरा पिकाचे वाशिम तालुक्यात २५0 हेक्टर, मंगरूळपीर २५00 हेक्टर, मानोरा २५0१ हेक्टर व कारंजा तालुक्यात २५१0 हेक्टर पिकांचे नुकसान तर फळ पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील ३00 हेक्टरवरील तर इतर पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील २00 व कारंजा तालुक्यातील ४३७ हेक्टरवरील असे एकूण जिल्हय़ात गव्हाचे ८६00, हरभरा ७७६१ , फळपिकाचे ३00 तर इतर ६३७ असे १७२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. तर ९ मार्च रोजी झालेल्या गारपीट भागाची पाहणी सुरू असतानाच ११ मार्च रोजी जिल्हय़ातील अनसिंगसह मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव, पिंपळगाव, शिवणी, चिंचोलीसह आसेगाव परिसरातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये जवळपास १५000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळ पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. जिल्हय़ात ९ व १0 मार्च रोजी १७२९८ हेक्टरवरील व ११ मार्च रोजी १५000 हेक्टरवरील असे एकूण ३२२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार केल्या गेला; मात्र यामधील ५0 टक्केच्यावर नुकसान झालेले क्षेत्र केवळ ५१३१.७0 हेक्टर इतकेच असल्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे; तसेच डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे ४२३८ तर फेब्रुवारी २0१५ मध्ये १२.६0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.