शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

गारपिटीमुळे १५ हजार शेतक-यांचे नुकसान

By admin | Updated: April 2, 2015 02:25 IST

वाशिम जिल्ह्यात ३२ हजार हेक्टर नुकसानाचा प्राथमिक अंदाज; मात्र प्रत्यक्ष नुकसान दाखविले केवळ पाच हजार हेक्टर.

वाशिम : मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच शेतकर्‍यांवर आलेल्या संकटामुळे शेतकरी पार खचून गेला. जिल्हय़ात ९, १0 व ११ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील ८0 हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. अंतिम अहवालात मात्र गारपिटीमुळे ५ हजार १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये नुकसानग्रस्त १५७८५ शेतकर्‍यांचा समावेश आहे.जिल्हय़ात ९ व १0 मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाने सर्वेक्षण व पंचनामे करून ३२ हजाराच्यावर हेक्क्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाजही वर्तविला होता व तसा अहवालही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता; मात्र या नुकसानामध्ये ५0 टक्केच्यावर नुकसान झालेले क्षेत्र केवळ ५१३१ असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्यावतिने कळविण्यात आले आहे. शासनाने गारपीटग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांना अद्याप मदत जाहीर केली नसली तरी मदत मात्र ५0 टक्केच्यावर नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. इतर शेतकर्‍यांचे ५0 टक्केच्या आत नुकसान असल्याने मात्र मिळणार्‍या मदतीचा काहीही फायदा होणार नाही. जिल्हय़ात मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रामध्ये गहू या पिकाचे वाशिम तालुक्यात १२0 हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यात २९00 हेक्टर, मानोरा तालुक्यात ३१९0 हेक्टर, कारंजा तालुक्यात २३९0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच हरभरा पिकाचे वाशिम तालुक्यात २५0 हेक्टर, मंगरूळपीर २५00 हेक्टर, मानोरा २५0१ हेक्टर व कारंजा तालुक्यात २५१0 हेक्टर पिकांचे नुकसान तर फळ पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील ३00 हेक्टरवरील तर इतर पिकामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील २00 व कारंजा तालुक्यातील ४३७ हेक्टरवरील असे एकूण जिल्हय़ात गव्हाचे ८६00, हरभरा ७७६१ , फळपिकाचे ३00 तर इतर ६३७ असे १७२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. तर ९ मार्च रोजी झालेल्या गारपीट भागाची पाहणी सुरू असतानाच ११ मार्च रोजी जिल्हय़ातील अनसिंगसह मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव, पिंपळगाव, शिवणी, चिंचोलीसह आसेगाव परिसरातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये जवळपास १५000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळ पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. जिल्हय़ात ९ व १0 मार्च रोजी १७२९८ हेक्टरवरील व ११ मार्च रोजी १५000 हेक्टरवरील असे एकूण ३२२९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार केल्या गेला; मात्र यामधील ५0 टक्केच्यावर नुकसान झालेले क्षेत्र केवळ ५१३१.७0 हेक्टर इतकेच असल्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे; तसेच डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे ४२३८ तर फेब्रुवारी २0१५ मध्ये १२.६0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.