शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

१५ दिवसांआड मिळतेय पिण्याचे पाणी!

By admin | Updated: May 4, 2017 01:20 IST

अमानवाडी येथील चित्र : महिलांची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती

मालेगाव : तालुक्यातील अमानवाडी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाच्यावतीने १५ दिवसांआड पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडल्याने ही समस्या उद्भवली आहे. अमानवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव असून, गावात पाणीपुरवठ्याची एकमात्र विहीर आहे. त्या विहिरीला थेंबभरही पाणी शिल्लक नाही. याशिवाय गावातील दोन्ही हातपंपही नादुरूस्त आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत आडवे बोअर घेतले; परंतु त्याला थोडेथोडकेच पाणी लागले. त्यामुळे प्रश्न निकाली निघाला नाही. गावातील सार्वजनिक विहिरीत निर्मलाबाई पांडे यांच्या अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून पाणी सोडले जाते. त्यासाठी शिवाजी गीते यांच्या पाइपलाइनचा उपयोग करण्यात आला आहे. गावातील महिला त्या विहिरीवरून पाणी भरतात. काही ग्रामस्थ अमाना रेल्वे स्टेशननजिक असलेल्या कूपनलिकेवरून पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. म्हणायला, गावात पाणीपुरवठा योजनेचे दोन जलकुंभ आहेत. मात्र, त्यापैकी एकाची दुरुस्ती करण्याची गरज उद्भवली आहे.दरवर्षीच्याच उन्हाळ्यात अमानवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यंदाही गावातील पाणी प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन यावर प्रभावी तोडगा काढून गावकऱ्यांची सोय करणे आवश्यक आहे. - गजानन गणोदे, अमानवाडीअमानवाडी गावात उद्भवलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीनजिक जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. असे झाल्यास जमिनीखालची पाणी पातळी वाढून गावाला पाणी मिळणे शक्य आहे. यायोगे पाणीप्रश्न निकाली निघणे शक्य असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.- नंदकिशोर जयस्वाल, सरपंच, अमानवाडी