शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

१५ दिवसांआड मिळतेय पिण्याचे पाणी!

By admin | Updated: May 4, 2017 01:20 IST

अमानवाडी येथील चित्र : महिलांची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती

मालेगाव : तालुक्यातील अमानवाडी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाच्यावतीने १५ दिवसांआड पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडल्याने ही समस्या उद्भवली आहे. अमानवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव असून, गावात पाणीपुरवठ्याची एकमात्र विहीर आहे. त्या विहिरीला थेंबभरही पाणी शिल्लक नाही. याशिवाय गावातील दोन्ही हातपंपही नादुरूस्त आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत आडवे बोअर घेतले; परंतु त्याला थोडेथोडकेच पाणी लागले. त्यामुळे प्रश्न निकाली निघाला नाही. गावातील सार्वजनिक विहिरीत निर्मलाबाई पांडे यांच्या अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून पाणी सोडले जाते. त्यासाठी शिवाजी गीते यांच्या पाइपलाइनचा उपयोग करण्यात आला आहे. गावातील महिला त्या विहिरीवरून पाणी भरतात. काही ग्रामस्थ अमाना रेल्वे स्टेशननजिक असलेल्या कूपनलिकेवरून पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. म्हणायला, गावात पाणीपुरवठा योजनेचे दोन जलकुंभ आहेत. मात्र, त्यापैकी एकाची दुरुस्ती करण्याची गरज उद्भवली आहे.दरवर्षीच्याच उन्हाळ्यात अमानवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. यंदाही गावातील पाणी प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन यावर प्रभावी तोडगा काढून गावकऱ्यांची सोय करणे आवश्यक आहे. - गजानन गणोदे, अमानवाडीअमानवाडी गावात उद्भवलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीनजिक जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. असे झाल्यास जमिनीखालची पाणी पातळी वाढून गावाला पाणी मिळणे शक्य आहे. यायोगे पाणीप्रश्न निकाली निघणे शक्य असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.- नंदकिशोर जयस्वाल, सरपंच, अमानवाडी