शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात १३४ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 15, 2015 01:42 IST

वाशिम जिल्हयातील चित्र.

वाशिम : अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी क्षेत्रावर गदा आली आहे. त्यामुळे कृषीचे अर्थचक्र बिघडले असून जिल्ह्यात १३४ शेतकर्यांनी दोन वर्षात आ त्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुके २00५ च्या निर्णयानुसार अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष बाकी आहे. जवळपास २३ प्रकल्पांची सुधारीत प्रशासकिय मान्यता रखडलेली आहे, असे असतानाच गेल्या दोन ते तीन वर्षापासून वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची वारंवारीता वाढली आहे. २0१३-२0१४ मध्ये जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. त्यातच २0१४ च्या उन्हाळ्य़ात जिल्ह्यातील काही भागात अभूतपूर्व गारपीट झाली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या हातचे रब्बीचे पीक गेले होते. या परिस्थितीतून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच २0१४-१५ मधील संपूर्ण खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट होते. अशा परिस्थितीत २0१५ च्या खरीप हंगामामध्येही गतवर्षीची पूनर्रावृत्ती होण्यी साधार भिती व्यक्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेतला असता दोन वर्षात १३४ शेतकर्यांनी बदलत्या नैसर्गिक परिस्थिती सह अन्य काहीकारणांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. त्यातच २00७ पासूनच्या मान्सूनच्या पावसाचा विचार कर ता चार वर्षे पावसाची सरासरी कमी आहे. परिणामस्वरुप शेतीमधील उत्पादकता कमी होत आहे. एखादवर्षी पीक चांगले आले तर एैन सोंगणीच्या हंगामात गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीने शे तकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एकंदरीत वाशिम जिल्ह्यातील कृषीवर आधारित अर्थचक्रच बाधीत झाले असल्याची चर्चा तज्ञांमध्ये आहे.

४३९ कुटूंबांना मदत

          जिल्ह्यात गत १४ ते १५ वर्षात एक हजार १८६ शेतकर्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. यापैकी प्रत्यक्षात आ त्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबापैकी ४३९ कुटूंबाना शासनाकडून मदत मिळाली. जवळपास ७३८ शे तकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरू शकलेल्या नाहीत तर सध्या ९ प्रकरणामध्ये चौकशी सुरू असून मृत पावलेल्या शेतकर्यांच्या या कुटूंबास मदतीची आस आहे.