शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावांचे टँकर प्रस्ताव लालफितशाहीत !

By admin | Updated: May 27, 2017 19:48 IST

गतवर्षी २२ गावांत टँकरने होता पाणीपुरवठा : यावर्षी एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा नाही, दिरंगाईचा फटका.

मंगरूळपीर : गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या २२ गावांपैकी जवळपास १९ गावांत यावर्षीही पाणीटंचाई जाणवत आहे. यापैकी १२ गावांनी टँकरचे प्रस्ताव सादर केल्यानंतरही अद्याप या प्रस्तावांना मंजुरात मिळालेली नाही. केवळ तीन गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे.उन्हाळ्याला सुरूवात झाली की टंचाईग्रस्त गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढते. मंगरूळपीर तालुक्यातही पाणीटंचाईने काही गावांना होरपळून जावे लागते. गतवर्षी तालुक्यातील इचोरी, भूर, कळंबा बोडखे, सोनखास, शहापूर खु., मोझरी, तऱ्हाळा, बिटोडा भोयर, कासोळा, झाडगाव, पांग्री महादेव, अरक, घोटा, पोघात, शिवणी रोड, रामगढ, नांदगाव, लही, मोहगव्हाण, बेलखेड, बालदेव, सायखेडा अशा २२ गावांत तिव्र पाणीेटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपरोक्त २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी तालुक्यातील एकाही गावात अद्यापपर्यंत टँकर सुरू झाले नाही. तथापि, टँकरची आवश्यकता असल्याबाबतचे प्रस्ताव, गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या १२ गावांनी दिलेले आहेत. मात्र, एकाही ठिकाणी टँकर सुरू झाले नाही. गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या कळंबा बोडखे, शहापूर खु., सोनखास, बालदेव, तऱ्हाळा, पांग्री महादेव, कासोळा, घोटा, मोझरी, वसंतवाडी, दाभा, सायखेडा आदी १२ गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, असे प्रस्ताव दिलेले आहेत. असे असतानाही प्रशासन टँकरने पाणीपुरवठा का करीत नाही? असा सवाल तेथील जनतेने उपस्थित केला आहे. पाणीटंचाई असतानाही, टँकर सुरू न केल्याने पाणीटंचाई दूर झाल्याबद््दल धूळफेक तर केली जात नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. गतवर्षी टँकर सुरू असलेल्या पोघात, भूर, शिवनी या तीन गावांत यावर्षीदेखील पाणीेटंचाई असल्याने येथे टँकर सुरू न करता विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. या तीन गावांत विहिर अधिग्रहण करून पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या जांब, बेलखेड, पांग्री महादेव, तऱ्हाळा, दाभा यासह सर्वच गावातील नागरिकांना यावर्षीदेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. कळंबा बोडखे येथील नागरिकांना दूरवरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. शहापूर खु., सोनखास गावात जलस्त्रोत नसल्याने आणि टँकरने पाणीपुरवठा नसल्याने घोटभर पाण्यासाठी नागरिकांना मैलभर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात यावर्षी मे महिना संपत आला तरी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. यावर्षी लाठी, चांभई, धानोरा, हिरंगी, भुर, जनुना, पारवा, पोटी,  शिवनी, मजलापुर, चेहेल, पोघात, धोत्रा, साळंबी, भडकुंभा, चिखली आदी गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षी २२ गावांतील टँकरवर ८७.७१ कोटींचा खर्च गतवर्षी मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी, भूर, कळंबा बोडखे, सोनखास, शहापूर खु., मोझरी, तऱ्हाळा, बिटोडा भोयर, कासोळा, झाडगाव, पांग्री महादेव, अरक, घोटा, पोघात, शिवणी रोड, रामगढ, नांदगाव, लही, मोहगव्हाण, बेलखेड, बालदेव, सायखेडा अशा २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर ८७ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे.यावर्षी १२ गावांचे टँकरसाठी प्रस्तावगतवर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या २२ गावांपैकी यावर्षी १२ गावांनी टँकरचे प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये कळंबा बोडखे, शहापूर खु., सोनखास, बालदेव, तऱ्हाळा, पांग्री महादेव, कासोळा, घोटा, मोझरी, वसंतवाडी, दाभा, सायखेडा या १२ गावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू न झाल्याने तेथे पाणीटंचाई जाणवत आहे.

शहापूर, सोनखास येथील पाणीटंचाई लक्षात घेवुन मागील महिन्यात टँकरसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची अद्यापपर्यंत दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेवुन लवकर टँकर सुरु करणे अपेक्षी आहे. - रेखा गजानन नाईक सरपंच, जांब गटग्रामपंचायतबेलखेड येथे गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी पाणीटंचाई भेडसावत आहे. गावातील काही जलस्त्रोतातील पाण्याचा वापर करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील एकाही विहिरीला मुबलक पाणी नसल्यामुळे विहिर अधिग्रहण करणे शक्य नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.- सुरेखा ठाकरे,सरपंच, बेलखेड ग्राम पंचायतने चिखलगाड येथील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेवुन याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास सादर केला आहे. परंतु अद्याप याबाबत आदेश प्राप्त नाहीत.- एस.एम.शिंदे, सचिव चिखलागडयावर्षी पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर सुरू आहे. राजू ठोंबरे, नागरिक, बेलखेड.