शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

रिसोड तालुक्यातील १२ प्रकल्पांनी गाठला तळ!

By admin | Updated: April 6, 2017 02:04 IST

तालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

निनाद देशमुख - रिसोडतालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहेत. यापैकी नेतन्सा लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात १०.९६ टक्के जलसाठा आहे. याप्रमाणे कोयाळी संग्राहक तलावात १६.५६ टक्के, मोरगव्हाण प्रकल्पात २.३१ टक्के, वाडी रायताळ प्रकल्पात ३५.६३ टक्के तर कुकसा प्रकल्पात ४७.९८ टक्के जलसाठा आहे. उर्वरित बोरखेडी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, हराळ, जवळा, करडा, कोयाळी, मांडवा, पाचंबा, वाघी, वरूड बॅरेज या प्रकल्पांनी तळ गाठला असून, जलसाठा शून्यावर आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतूमानात बदल होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली; मात्र प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, जलप्रकल्पांत पुरेसा जलसाठा नव्हता. आता तर तब्बल १२ प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आहे. केवळ पाच प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यामुळे पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. जलपातळी खालावत असल्याने आणि मोजक्याच जलाशयांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे.