शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रचाराचे ‘१२ दिवस’!

By admin | Updated: September 15, 2014 00:32 IST

वाशिम जिल्ह्यातील मतदारसंघांची व्याप्ती मोठी: उमेदवारांना ठेवावे लागणार होऊ दे खर्चाचे धोरण

वाशिम : अख्या महाराष्ट्राला उत्कंठा लागलेल्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम १२ सप्टेंबरला घोषीत झाला अन् जिल्ह्यातील मंदावलेल्या राजकीय घडामोडींनी गती पकडली. महायुती व आघाडी यापैकी कुणीच अद्याप उमेदवार जाहीर केले नसले तरी सर्वपक्षीय इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळते या तोर्‍यात कामाला लागले आहेत. मात्र निवडणयूक आयोगाने प्रचारसाठी उपलब्ध करून दिलेल्या कमी कालावधीमुळे सद्या या संभाव्य उमेदवारांनी धडकी घेतली आहे. मतदार संघाची व्याप्ती व मतदार तथा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे प्रचाराच्या १२ दिवसात शक्य करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी उमेदवारांनी रणणिती आखली असल्याचे दिसून येत आहे.सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे ४५ दिवसांचा असतो; पण गणेशोत्सव, दसरा व दिवाळी या महत्त्वाच्या सणात निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया येऊ नये याची काळजी घेत निवडणूणक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम ४0 दिवसांवर आणला आहे. १२ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या निवडणूक कार्यक्रमांची सांगता २२ ऑक्टोंबरला होणार आहे. यामध्ये १ ऑक्टोंबर नामांकन माघारीचा अखेरचा दिवस आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार तोफा शांत होत असल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. त्यापैकी वाशिम मतदार संघात वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील २६८ गावांचा समावेश आहे. कारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यातील ३0३ तर रिसोड मतदार संघात रिसोड व मालेगाव तालुक्यातील १९८ गावे समाविष्ट आहेत. काही उमेदवारांनी यापूर्वीच तयारी केली असली तरी नवख्या उमेदवारांना मात्र मतदारांपयर्ंत पोचताना कसरत करावी लागणार आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांनाही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. प्रचाराला मिळणारा अल्प वेळ व मतदार संघाची व्याप्ती पाहता काही मतदारांनी सोशल मिडीयाचा आधार घेत प्रचाराचा धुराळा उडविण्याची तयारी केली आहे. यासाठी वॉटसअप, फेसबुकव्हाईस कॉल या हायटेकप्रणालीचा वापरही होऊ शकतो. ** उमेदवारांची कसरतच वाशिम विधानसभा मतदार संघात वाशिम सह मंगरूळपीर तालुक्यातील २६८ गावांचा समावेश आहे. येथे कॉग्रेस व भाजपमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी झालेली दिसून येत आहे. मात्र, अद्याप कुणीच उमेदवारी घोषीत केली नसल्यामुळे वातावरण शांत दिसून येत आहे.वाशिम मतदार संघाची व्याप्ती पाहता येथे १२ दिवसात प्रचार करताना सर्वपक्षीय उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे** जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघकारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यातील ३0३ गावांचा समोवश आहे. कांरजा तालुका विकसनशील असला तरी मानोरा तालुक्याची ओळख दुर्गम व अविकसीत म्हणूनच आहे. तालुक्यातील काही गावे अद्यापही पक्या रस्त्यांनी जोडलेली नाहीत. त्यामुळे १२ दिवसात प्रत्येक गावात पोहोचून प्रचार करणे उमेदवारांसाठी शक्य दिसत नाही. ** सेमीफायनल संपली मात्र..मालेगाव व रिसोड तालुक्याचा समावेश असलेल्या रिसोड विधानसभा मतदार संघामध्ये दोन महिन्यापूर्वीच विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली होती. सदर निवडणूक दोन्ही पक्षासाठी सेमी फायनल होती. तेव्हापासून या मतदार संघातील राजकीय वारे शांतच झाले नाहीत. त्यामुळे यावेळी उमेदवारांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. कमी कालावधी व कसरत अधिक असेच येथील चित्र राहणार असल्याचे दिसून येणार आहे. यावर उमेदवार कसे मात करतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे