शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेतील कर्मचारी कामाच्या वेळेत गैरहजर; ग्रामविकासमंत्र्यांकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 23:59 IST

२०३ काेटींचा निधी खर्चच झाला नाही

पालघर : जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमधील कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी कामाच्या वेळेत उपस्थित राहत नसल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे २०३ कोटींचा निधी खर्च न हाेण्यामागे त्यांची उदासीनता असल्याचा आरोप करून ग्रामविकासमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 

आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यात प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना, प्रशासकीय योजना सुविधेची कामे करण्याबाबत या कर्मचाऱ्यांची मोठी जबाबदारी असली, तरी अनेक विभागांतील अधिकारी-कर्मचारी वेळेवर कार्यालयीन कामाच्या ठिकाणी हजर राहत नसल्याचे आढळले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भारती कांबळी, उपाध्यक्ष निलेश सांबरे आदींसह अनेक विभागांच्या सभापतींनी २४ फेब्रुवारीपासून २४ नोव्हेंबरदरम्यान विविध विभागांना अचानक दिलेल्या भेटी देत हा प्रकार उघड केला होता. याबाबत तक्रारीनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, अशा सूचना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागांना दिल्या होत्या. 

तक्रारी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ शासन नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी निवास करावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन होत नसल्याचे उपाध्यक्ष सांबरे यांनी पालघरमध्ये अचानक काही कार्यालयांत दिलेल्या भेटीदरम्यान दिसून आले होते. हा मुद्दा गाजत असताना सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता. तसेच हा मुद्दा स्थायी समितीकडे मांडण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनामार्फत संबंधितांना समज देण्यात येईल व अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत तसेच जिल्हा मुख्यालयी राहत नाहीत, अशांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, आजही अनेक कार्यालयांंत जैसे थे परिस्थिती आहे.