शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

होय, मी स्थलांतराचा ‘लाभार्थी’, रोजगार हमी फक्त कागदावर, उदरनिर्वाहाच्या शोधात पदरी कुपोषण, शैक्षणिक मागासलेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:42 IST

होय मी लाभार्थी, हे माझे सरकार! अशी जाहिरात बाजी शासनाकडून सुरु असताना, होय मी स्थलांतराचा लाभार्थी अस काहीस म्हणायची वेळ आती दुर्गम आदिवासी बहुल मोखाद्यातील आदिवासींवर आली आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : होय मी लाभार्थी, हे माझे सरकार! अशी जाहिरात बाजी शासनाकडून सुरु असताना, होय मी स्थलांतराचा लाभार्थी अस काहीस म्हणायची वेळ आती दुर्गम आदिवासी बहुल मोखाद्यातील आदिवासींवर आली आहे. तालुक्यात रोजगार हमी योजनेची अमलबजावणी पूर्णता बासनात गुंडाळली गेली असल्याचं चित्र समोर आहे.१५ हजार १२७ नोंदणीकृत जॉबकार्ड धारक असताना शासनाकडून ७०० मजुरानाच रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्वावर आधारलेला रोजगार हमी योजनेचा आलेख कोसळत असल्याची स्थिती आहे. या योजनेच्या अमलबजावणी चा कितीही डंका शासन पातळीवर वाजवला तरी वर्षनुवर्षे स्थलांतराच्या विळख्यातून आदिवासींची सुटका झालेली नाही हेच खरं!तालुक्यातील आदिवासी समाज बांधवाचा दिवाळी हा सण संपताच आपल्या कुटुंबानीशी स्थंलातरास सुरुवात होते. त्यांना आपले घर व गाव-पाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडुस, कल्याण, अंबाडी इत्यादी रोजगाराच्या शोधात भटकावे लागत आहे. त्यात अनेकदा त्यांची आर्थिक पिळवणूक होते. मोखाडा तालुका व गाव-पाडे दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने नेहमीच शासनांच्या विकास योजनां पासून हा भाग उपेक्षित राहिला आहे.काही ठिकाणी कागदोपत्री विकास झाला आहे. त्यामुळे आपल्या मुलांबाळांच्या शिक्षणांची तमा न बाळगता पोटाची खळगी भरण्यासाठी विटभट्टी, इमारतींचे बांधकाम आदी कामात दिवसभर कडक उन्हा - तान्हात, रिकाम्या पोटा कडे न बघता अंगावरील घामाचे पाणी सारत काबाड-कष्ट करण्यांसाठी त्यांनी वर्षानुवर्ष पायपिट सुरु आहे.पावसाळा भर शेतात व हिवाळा, उन्हाळा भर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागत असल्याने सण - उत्सवांच्या काळातील दिवस हे इतर दिवसांप्रमाणे येतात व जातात पंरतु कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक स्थिती सुुधारत नाही. आजही शासनांच्या दुर्लक्षित धोरणामुळे महागाईच्या काळात शंभर रुपये प्रतीदिन मजुरी मिळूनही आपला व आपल्या कुटूंबाचा रहाट गाडा कसा चालवायचा हा प्रश्न आहेच. शासनाने आदिवासी चे स्थंलातर थांबविण्यासाठी मनेरगा, रोजगार हमी, मजगी, घरकुल आदी योजना राबविल्या पण याही योजनांना सरकारी बाबु व ठरावीक लोकप्रतिनिधीची दृष्ट लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडाच्या मोळ्या, विटभट्टी, लहान मोठ्या इमारत बांधकामावर बिगारी म्हणूण काम करावे लागत आहे. त्यामुळे आज ही विकासाचे स्वप्न पाहणाºया राज्यामध्ये आदिवासीची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आपल्या कुटुंबा बरोबर मुलां - मुलींना सुध्दा शिक्षणावर पाणी सोडून कुटुबांच्या पालन पोषणासाठी आई वडिलांना कामामध्ये मदत करावी लागत आहे. अशा आदिवासीच्या विकासाबाबत शासन उदासिन असल्यांने आज ही हजारो आदिवासी बांधवाना विटभट्टी, इमारतींचे बांधकामावर बिगारी म्हणूण काम करण्याशिवाय पर्याय नाही.यंत्रणेच्या वनविभाग ७ कामे, १३१ मजूर सां बा विभाग १ कामे मजूर १४०, सामाजिक वनीकरण ७ कामे मजूर ६ असे एकूण १५ कामे सुरु असून २७७ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.कृषी विभागांच्या कामाना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही त्याचबरोबर पंचायत समितीकडून बेरीस्ते, सातुर्ली, साखरी, आडोशी, पोशेरा, खोच, डोल्हारा अशा सात ग्रामपंचायतींमध्ये रस्ते व घरकुलांची २८ कामे सुरु असून ४२८ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.रोजगार हमीची कामे सुरु करण्या बाबत मी यंत्रणेच्या सर्व विभागाला पत्र दिली आहेत जास्तीच जास्त कामे सुरु करण्याबत वेळोवेळो मिटिंगा घेऊन सूचना दिल्या जाणार आहेतपी जी कोरडे -प्रभारी तहसीलदार मोखाडा

टॅग्स :Governmentसरकार