शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

आधारअभावी वर्ष गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 03:04 IST

शासनाच्यावतीने आधार कार्डचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी सक्तीचा करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे

तलवाडा : शासनाच्यावतीने आधार कार्डचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी सक्तीचा करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे मात्र, त्याचा फटका विक्र मगड तालुक्यातील हातने या गावातील सूरज सुभाष कडु या विद्यार्थ्याला बसला असून सूरज कडूकडे आधारकार्ड नसल्याने २०१७-१८ चे शैक्षणिक वर्ष वाया गेले त्याने माहिती देताना सागितले.दरम्यान या विद्यार्थ्याचे १२ वी नंतर देवळाली कॅँम्प भगूर ता. सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शताब्दी इंस्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी (पोलिटेक्निकल) या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, आधार कार्ड नसल्याने त्याची शिष्यवृत्ती जमा होऊ शकली नाही. त्यातच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कॉलेजची ४० हजार रु पये एवढी फी भरण्यास तो असमर्थ ठरला. त्यामुळे त्याचे २०१७-१८ चे पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले.सूरज याने आधार कार्ड काढण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळा आॅनलाइन अ‍ॅप्लकेशन केले आहे. मात्र प्रत्येक वेळी ते अपात्र ठरविण्यात आले आहे. आधार कार्ड साठी त्यांनी मुंबईच्या कार्यालयापासून सर्वत्र धावाधाव केली आहे. येवढे प्रयत्न करुनही त्याला आतापर्यंत आधार कार्ड मिळालेले नाही. जर त्याला आधार कार्ड मिळाले नाही तर पुढील शैक्षणिक वर्ष ही वाया जाण्याची भीती त्याने वेक्त केली.केंद्र सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले असले तरी लालफितीमुळे या विद्यार्थ्याचे नुकसा झाले हेच खरे.>बंगळुरूपासून मुंबईपर्यंत सर्व ठिकाणी खटपटसूरज याने आधार कार्ड काढण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळा आॅनलाइन अ‍ॅप्लिकेशन केले आहे. मात्र प्रत्येक वेळी ते अपात्र ठरविण्यात आले. या बाबत त्याने आधारकार्डचे मुख्यकार्यालय बंगलोर येथे दुरध्वनी वरु ण संपर्क साधला असता मुंबई येथील कार्यलायात संपर्क सधानाचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्याने प्रत्यक्ष मुंबई येथे स्व:त जावून चौकशी केली असता आधारकार्ड पोस्टाद्वारे तुमचा घरी येईल असे सांगण्यात आले. चार महीने उलटुंन ही ते न आल्याने आधारकार्ड वीना पुढील शैक्षणिक वर्ष ही वाया जाईल अशी भीती सूरज कडू या विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे.मी आत्तापर्यंत जवळपास दहा वेळा आधार कार्डासाठी आॅनलाइन अ‍ॅप्लकेशन केले आहे. मात्र, प्रत्तेक वेळी ते रिजेक्ट झाले आहे. याचा फटका माझ्या शैक्षणिक आलेखावर पडला असून त्यामुळे माझे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. जर आत्तासुद्धा माझे आधार कार्ड मिळाले नाही तर पुढील माझे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधार सक्ति ही विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे असे मला तरी अनुभवावरु न वाटते.-सूरज कडु (पिडित विद्यार्थी)