शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिळाला यंदा स्वस्ताईचा गोडवा !

By admin | Updated: January 13, 2017 05:58 IST

शनिवारच्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या तिळाचा दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी उतरल्याने

हितेन नाईक /पालघरशनिवारच्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या तिळाचा दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी उतरल्याने तसेच साखर, गुळाच्या दरात ही किरकोळ वाढ झाल्याने यावर्षीची मकरसंक्रात सगळ्यांसाठी गोडगोड ठरणार आहे. ह्या सणानिमीत्त अबालवृद्ध ‘तिळगुळ घ्या गोडगोड बोला’ असे म्हणत एकमेकांची गळाभेट घेत असतात. मात्र, प्रत्येक सणासुदीला किचन कॅबिनेट सांभाळणाऱ्या गृहिणींची बजेट राखतांना तारांबळ उडत असते. परंतु यंदा तसे होणार नाही.गतवर्षी तिळाचा प्रति किलो दर १२० ते १४० असा होता तर साखर ३६ रु पये, गुळ ५०-५५ प्रति किलो होता. ह्यावर्षी मात्र तीळ प्रतिकिलो ९० ते ११० असा खाली उतरल्याने गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. साखर व गूळामध्ये ८ ते १० रुपयांचे वाढ प्रति किलो झाली आहे. त्यामुळे महिला वर्ग आतापासूनच तीळ, गुळ, साखर,तूप आदी खरेदीत मग्न झाला आहे.पालघर जिल्ह्यात शेतकरी,बागायतदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून केळवे, माहीम, शिरगाव येथील वाडवळ, भंडारी, आगरी आदी समाजात संक्र ातीच्या दिवशी आवर्जून बनविल्या जाणाऱ्या ‘उकड हंडी’चा स्वाद घेण्यासाठी इतर समाजातील मंडळी त्यांच्या आमंत्रणाची वाट पहात असतात. कंदमुळ हे एक पौष्टिक खाद्य समजले जात असल्याने कोनफळ, वांगी, शेवग्याच्या शेंगा, वाल- पापडी, रताळे, कांद्याची पात, बटाटे, वालगुळे, किसलेला नारळ आदी एकत्र करून त्याला मसाला लावून मुरवून एका मातीच्या मडक्यात भरले जाते. त्याला केळीच्या पानात गुंडाळून एका मोकळ्या जागेत ठेवून त्याच्या चोहो बाजूने आग पेटविली जाते. तास दिड तासाने मडक्यातील पदार्थ शिजल्या नंतर मित्र, नातेवाईक ह्यांच्या सोबतीने या उकड हंडीचा फडशा पाडला जातो. चवीला अत्यंत पोषक समजल्या जाणाऱ्या ह्या शाकाहारी पदार्थात आता चिकन, बोंबील, करंदी आदी मांसाहारी पदार्थ घालून उकड हंडी बनवली जात आहे. ह्यावेळी माडाच्या बियांपासून उगवलेले तरले ही वाफवून विक्रीसाठी ठेवण्यात येतात.ह्याला मोठी मागणी असते. (प्रतिनिधी)आगळी परंपरा अन् रिवाजसकाळी लवकर उठून पाणी गरम करून त्यात तीळ घालून त्याने आंघोळ केली जाते. नंतर दुधात तांदळाची खीर शिजवल्यानंतर देवाला नैवद्य दाखवला जातो. तर तिळ, तूप, गूळ ह्याचे मिश्रण एकत्र करून केलेले लाडू घरातील सर्व सदस्य एकत्र बसून खातात. आपला देश हा शेतीप्रधान असल्याने आपल्या शेतात नवीन आलेल्या धान्याचे स्वागत,पूजनही केले जाते.सकाळी सूर्य पूजेसाठी जेथे स्वच्छ ऊन पडते ती जागा स्त्रिया झाडून शेणाने सारवून घेतात. त्याच्यावर तांदळाच्या पीठाने सूर्याची प्रतिमा काढून त्याच्या दोन बाजूस संध्या आणि छाया या सूर्याच्या दोन भार्या ची चित्रे रेखाटली जातात व त्यांचे पूजन केले जाते गाई,बैलांना आंघोळ घालून त्यांचीही पूजा केली जाते.संकष्टी आली आडवीसंक्र ातीच्या दुसऱ्या दिवशी नवं दाम्पत्यास, मित्रमंडळीस तिखट जेवणासाठी आमंत्रण असते. ह्या दिवशी रविवार आल्याने कोंबडी आणि मटनाच्या मेजवानीचा सर्वांनी आखलेला बेत संकष्टी आल्याने रद्द करावा लागणार आहे.त्यामुळे हा बेत बुधवार पर्यंत पुढे ढकलावा लागणार आहे.