शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

तिळाला यंदा स्वस्ताईचा गोडवा !

By admin | Updated: January 13, 2017 05:58 IST

शनिवारच्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या तिळाचा दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी उतरल्याने

हितेन नाईक /पालघरशनिवारच्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या तिळाचा दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी उतरल्याने तसेच साखर, गुळाच्या दरात ही किरकोळ वाढ झाल्याने यावर्षीची मकरसंक्रात सगळ्यांसाठी गोडगोड ठरणार आहे. ह्या सणानिमीत्त अबालवृद्ध ‘तिळगुळ घ्या गोडगोड बोला’ असे म्हणत एकमेकांची गळाभेट घेत असतात. मात्र, प्रत्येक सणासुदीला किचन कॅबिनेट सांभाळणाऱ्या गृहिणींची बजेट राखतांना तारांबळ उडत असते. परंतु यंदा तसे होणार नाही.गतवर्षी तिळाचा प्रति किलो दर १२० ते १४० असा होता तर साखर ३६ रु पये, गुळ ५०-५५ प्रति किलो होता. ह्यावर्षी मात्र तीळ प्रतिकिलो ९० ते ११० असा खाली उतरल्याने गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. साखर व गूळामध्ये ८ ते १० रुपयांचे वाढ प्रति किलो झाली आहे. त्यामुळे महिला वर्ग आतापासूनच तीळ, गुळ, साखर,तूप आदी खरेदीत मग्न झाला आहे.पालघर जिल्ह्यात शेतकरी,बागायतदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून केळवे, माहीम, शिरगाव येथील वाडवळ, भंडारी, आगरी आदी समाजात संक्र ातीच्या दिवशी आवर्जून बनविल्या जाणाऱ्या ‘उकड हंडी’चा स्वाद घेण्यासाठी इतर समाजातील मंडळी त्यांच्या आमंत्रणाची वाट पहात असतात. कंदमुळ हे एक पौष्टिक खाद्य समजले जात असल्याने कोनफळ, वांगी, शेवग्याच्या शेंगा, वाल- पापडी, रताळे, कांद्याची पात, बटाटे, वालगुळे, किसलेला नारळ आदी एकत्र करून त्याला मसाला लावून मुरवून एका मातीच्या मडक्यात भरले जाते. त्याला केळीच्या पानात गुंडाळून एका मोकळ्या जागेत ठेवून त्याच्या चोहो बाजूने आग पेटविली जाते. तास दिड तासाने मडक्यातील पदार्थ शिजल्या नंतर मित्र, नातेवाईक ह्यांच्या सोबतीने या उकड हंडीचा फडशा पाडला जातो. चवीला अत्यंत पोषक समजल्या जाणाऱ्या ह्या शाकाहारी पदार्थात आता चिकन, बोंबील, करंदी आदी मांसाहारी पदार्थ घालून उकड हंडी बनवली जात आहे. ह्यावेळी माडाच्या बियांपासून उगवलेले तरले ही वाफवून विक्रीसाठी ठेवण्यात येतात.ह्याला मोठी मागणी असते. (प्रतिनिधी)आगळी परंपरा अन् रिवाजसकाळी लवकर उठून पाणी गरम करून त्यात तीळ घालून त्याने आंघोळ केली जाते. नंतर दुधात तांदळाची खीर शिजवल्यानंतर देवाला नैवद्य दाखवला जातो. तर तिळ, तूप, गूळ ह्याचे मिश्रण एकत्र करून केलेले लाडू घरातील सर्व सदस्य एकत्र बसून खातात. आपला देश हा शेतीप्रधान असल्याने आपल्या शेतात नवीन आलेल्या धान्याचे स्वागत,पूजनही केले जाते.सकाळी सूर्य पूजेसाठी जेथे स्वच्छ ऊन पडते ती जागा स्त्रिया झाडून शेणाने सारवून घेतात. त्याच्यावर तांदळाच्या पीठाने सूर्याची प्रतिमा काढून त्याच्या दोन बाजूस संध्या आणि छाया या सूर्याच्या दोन भार्या ची चित्रे रेखाटली जातात व त्यांचे पूजन केले जाते गाई,बैलांना आंघोळ घालून त्यांचीही पूजा केली जाते.संकष्टी आली आडवीसंक्र ातीच्या दुसऱ्या दिवशी नवं दाम्पत्यास, मित्रमंडळीस तिखट जेवणासाठी आमंत्रण असते. ह्या दिवशी रविवार आल्याने कोंबडी आणि मटनाच्या मेजवानीचा सर्वांनी आखलेला बेत संकष्टी आल्याने रद्द करावा लागणार आहे.त्यामुळे हा बेत बुधवार पर्यंत पुढे ढकलावा लागणार आहे.