शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

श्रीक्षेत्र निर्मळ येथील यात्रेला सोमवारपासून सुरूवात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:34 IST

श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला (दि.3 डिसेंबर) सुरूवात होणार आहे.

वसई : तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला (दि.3 डिसेंबर) सुरूवात होणार आहे. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस असते.निर्मळ येथील विमल तलाव हे पवित्र तिर्थ असल्याचे भावीक मानतात. देव-देवतांनी या विमल तलावात स्नान केले असल्याची आख्यायीका आहे. ख्रिस्त जन्माच्या पाच हजार वर्ष पूर्वीपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे.वसई तालुका व जिल्ह्याबाहेरूनही यात्रेकरू मोठ्या प्रमाणात समाधी दर्शनास येणार असल्याने मंदिराच्या विश्वस्त मंडळाने नियोजन केले आहे. पालिकेच्या वतीने रस्त्याची डागडुजी, यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती फिरती शौचालये, औषध फवारणी, वैद्यकीय सुवीधा केली गेली आहे. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराची रंगरंगोटी, रोषणाई, परिसराची स्वच्छता केली आहे. भाविकांना बसण्यासाठी मंदिराच्या हॉलमध्ये विश्रामगृहाची सोय असणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे मंदिराचे सचिव व नगरसेवक पंकज चोरघे यांनी सांगितले. सुळेश्वर येथे आठ फिरती शौचालये तसेच मंदिरासमोर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांनाआपत्कालीन स्थीतीत मदतीसाठी अग्निशमन दलाची गाडी तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एकादशीला सकाळी वाघोली मराठी शाळेपासून शंकराचार्य मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी शंकराचार्यांच्या प्रतिमेची वाजत -गाजत पालखी निघणार आहे. मुख्य मंदिरापासून पालखी विमल तलावाला वळसा घालून दरवर्षी येत असते. विमल तलावाच्या काठी असलेल्या सुळेश्वरमंदिराला प्रदक्षीणा घालून पालखी निर्मळ नाक्यावरून पहाटे मुख्य रस्त्यावरून मंदिरात येणार आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही यात्रेच्या कालावधीत सुरक्षेसाठी वसई पोलिस जादा बंदोबस्त मागवणार असून वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिस निर्मळ नाका व भुईगाव फाटा येथे पुरेसा बंदोबस्त ठेवणार आहेत. वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना मंदिर विश्वस्त मंडळाचे सल्लागार बबन नाईक यांनी केली आहे.>सुकेळी खास आकर्षणनिर्मळ नाक्यापासून ते भुईगाव फाट्यापर्यंत सध्या विविध प्रकारची खेळण्यांची ,मिठाई तसेच सूकामेव्यांची दूकाने लागण्यास सुरूवात झाली आहे .विविध खेळणी रस्त्याच्या दुतर्फा दाखल झाली आहेत. या यात्रेत वसईची सुप्रसिद्घ सुकेळी, खजूर, पेढे, साखर पेठा, मिठाईची तसेच शिंगाडे व शेंगदाण्यांची दुकाने उभी राहीली आहेत.>ऐतिहासिक महत्त्व...भगवान श्री परशुरामांनी विमलासुराचा वध करून श्री विमल-निर्मळ सरोवर तीर्थाची निर्मिती केली आहे. या तीर्थाचे पावित्र्य काशी-प्रयागासारखा आहे. या तीर्थाच्या परिधीत भरणाऱ्या यात्रेत तीर्थस्नान, पिंडदान, तर्पण, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, देवदर्शन वगैरे पुण्यकार्यासाठी दुरून यात्रेकरू अनेक वर्षांपासून येतात.