शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र निर्मळ येथील यात्रेला सोमवारपासून सुरूवात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:34 IST

श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला (दि.3 डिसेंबर) सुरूवात होणार आहे.

वसई : तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला (दि.3 डिसेंबर) सुरूवात होणार आहे. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस असते.निर्मळ येथील विमल तलाव हे पवित्र तिर्थ असल्याचे भावीक मानतात. देव-देवतांनी या विमल तलावात स्नान केले असल्याची आख्यायीका आहे. ख्रिस्त जन्माच्या पाच हजार वर्ष पूर्वीपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे.वसई तालुका व जिल्ह्याबाहेरूनही यात्रेकरू मोठ्या प्रमाणात समाधी दर्शनास येणार असल्याने मंदिराच्या विश्वस्त मंडळाने नियोजन केले आहे. पालिकेच्या वतीने रस्त्याची डागडुजी, यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती फिरती शौचालये, औषध फवारणी, वैद्यकीय सुवीधा केली गेली आहे. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराची रंगरंगोटी, रोषणाई, परिसराची स्वच्छता केली आहे. भाविकांना बसण्यासाठी मंदिराच्या हॉलमध्ये विश्रामगृहाची सोय असणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे मंदिराचे सचिव व नगरसेवक पंकज चोरघे यांनी सांगितले. सुळेश्वर येथे आठ फिरती शौचालये तसेच मंदिरासमोर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांनाआपत्कालीन स्थीतीत मदतीसाठी अग्निशमन दलाची गाडी तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एकादशीला सकाळी वाघोली मराठी शाळेपासून शंकराचार्य मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी शंकराचार्यांच्या प्रतिमेची वाजत -गाजत पालखी निघणार आहे. मुख्य मंदिरापासून पालखी विमल तलावाला वळसा घालून दरवर्षी येत असते. विमल तलावाच्या काठी असलेल्या सुळेश्वरमंदिराला प्रदक्षीणा घालून पालखी निर्मळ नाक्यावरून पहाटे मुख्य रस्त्यावरून मंदिरात येणार आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही यात्रेच्या कालावधीत सुरक्षेसाठी वसई पोलिस जादा बंदोबस्त मागवणार असून वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिस निर्मळ नाका व भुईगाव फाटा येथे पुरेसा बंदोबस्त ठेवणार आहेत. वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना मंदिर विश्वस्त मंडळाचे सल्लागार बबन नाईक यांनी केली आहे.>सुकेळी खास आकर्षणनिर्मळ नाक्यापासून ते भुईगाव फाट्यापर्यंत सध्या विविध प्रकारची खेळण्यांची ,मिठाई तसेच सूकामेव्यांची दूकाने लागण्यास सुरूवात झाली आहे .विविध खेळणी रस्त्याच्या दुतर्फा दाखल झाली आहेत. या यात्रेत वसईची सुप्रसिद्घ सुकेळी, खजूर, पेढे, साखर पेठा, मिठाईची तसेच शिंगाडे व शेंगदाण्यांची दुकाने उभी राहीली आहेत.>ऐतिहासिक महत्त्व...भगवान श्री परशुरामांनी विमलासुराचा वध करून श्री विमल-निर्मळ सरोवर तीर्थाची निर्मिती केली आहे. या तीर्थाचे पावित्र्य काशी-प्रयागासारखा आहे. या तीर्थाच्या परिधीत भरणाऱ्या यात्रेत तीर्थस्नान, पिंडदान, तर्पण, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, देवदर्शन वगैरे पुण्यकार्यासाठी दुरून यात्रेकरू अनेक वर्षांपासून येतात.