शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोविडच्या बंदिशाळेतून लवकरच जगाची सुटका व्हावी; शांततामय क्रांतीचा आग्रह धरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:58 IST

कोविडच्या या बंदिशाळेतून नवीन वर्षात जगाची सुटका व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

आशीष राणेवसई : जग आपल्या गतीने, आपल्या पद्धतीने आणि किंबहुना आपल्या मस्तीने चालले असताना अचानक कोविड-१९ महामारीने जगाला खिंडीमध्ये पकडले, हे चिंताजनक आहे. आज जगाची अवस्था बंदिशाळेसारखी झालेली आहे. कोविडच्या या बंदिशाळेतून नवीन वर्षात जगाची सुटका व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

फादर दिब्रिटो म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासीय मित्रांनो, एका अर्थाने गेली तीनचार दशके आपण या साथीची जणू तयारी करीत होतो की काय, असेच वाटायला लागले आहे. कोविड-१९ चे संकट विनाशकारी आहे. ज्या पद्धतीने जल, जंगल आणि जमीन यांचे शोषण होत आहेत, पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्या अर्थाने कुठल्या तरी महान संकटाची आपण सर्वजण तयारी करीत होतो, हे सांगण्यासाठी ग्रेटा थुलबर्ग नावाची एक चिमुरडी मुलगी जगाच्या व्यासपीठावर आली.  आज प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्रापेक्षा शक्तिशाली किंबहुना मोठे होण्याचा प्रयत्न करत आहे. मिलिटरी, लष्कर वाढवले जातेय, तर युद्धनौका व युद्धासाठी लागणारी विमाने याची खरेदी होत आहे.

कशासाठी हे सर्व? जणू माणसाला माणूस आपला शत्रू वाटू लागला आहे. समोरची व्यक्ती माझा मित्र नाही तर माझे भक्ष्य आहे, शिकार आहे, त्यादृष्टीने राष्ट्रे एकमेकांकडे पाहत आहेत आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व होत असताना चिंतन करणे आवश्यक आहे. कोविडमध्ये गरिबांचे शोषण झाले. या महामारीच्या वेळी सगळ्यात जास्त शोषण झालेला वर्ग म्हणजे गरीबवर्ग, ज्यांच्याकडे काहीही नाही आहे. स्थलांतरितांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. या महामारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण स्थलांतरितांचा प्रश्न पाहिला, अगदी मुक्या जनावरांप्रमाणे ते रस्त्यावरून चालत होते. त्यांना कुणी वाली उरलेला नव्हता. शासनदेखील तोकडे पडले व आपली सर्व व्यवस्था पांगळी झाली, असे ते म्हणाले. 

टॅग्स :New Yearनववर्षVasai Virarवसई विरार