शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पृथ्वी शॉने जगभरात पुन्हा एकदा गाजविले विरारचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:34 IST

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक पटकावल्यानंतर विरार का छोरा हे वाक्य पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेत आले आहे.

वसई : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक पटकावल्यानंतर विरार का छोरा हे वाक्य पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेत आले आहे. पृथ्वीच्या रुपाने आणखी एका छोराने विरारचे नाव सगळ्या जगात रोशन केले आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरडुपर हिरो झाल्यानंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत करणाºया गोविंदाची ओळख विरार का छोरा अशीच होती. यशाच्या शिखरावर असतानाच गोविंदाने राजकारणात उडी घेतली होती. गोविंदाची राजकीय कारकिर्द अल्पजीवी ठरली असली तरी त्याने त्याकाळी राम नाईक यांचा पराभव करुन जायंट किलर अशी प्रतिमा प्राप्त केली होती. या विजयानंतरही गोविंदा जसा निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होऊ शकला नाही तसेच राम नाईक यांनाही पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात यश मिळाले नाही. विरारमध्ये चिची या नावाने प्रचलित असलेला गोविंदा चित्रपटसृष्टीत आणि राजकारणात विरार का छोरा म्हणूनच ओळखला जायचा.गोविंदाप्रमाणेच पृथ्वी शॉचा जन्मही विरारचा. बालपणही विरारमध्ये गेले. नारंगी येथील परांजपे नगरात राहणाºया पृथ्वीचे तिसरीपर्यंतचे शिक्षण विरारच्या नॅशनल स्कूलमध्ये झाले.वयाच्या तिसºया वर्षापासून त्याला क्रिकेटने झपाटले होते. त्याला घडवण्याची महत्वपूर्ण कामगिरी गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी पार पाडली होती. विरारमध्येच पाया रचलेला पृथ्वी शॉ मुंबईच्या रिझवी स्प्रिंगफिल्ड स्कूलमध्ये दाखल झाला. तिथे १६ वर्षाखालील आंतरशालेय स्पर्धेत त्याने कर्णधारपद यशस्वीरित्या सांभाळले. त्यानंतर पृथ्वीची क्रिकेटमधील घोडदौड खºया अर्थाने सुरु झाली.एमआयजी क्लबकडून खेळतांना त्याला प्रशिक्षक राजीव पाठक यांच्याकडून मोलाच्या टिप्स मिळाल्या. नोव्हेंबर २०१३ मध्ये हॅरीश शिल्ड स्पर्धेत ५४८ धावांचा वैयक्तिक विक्रम करून पृथ्वीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. पुढे रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून थेट उपांत्य फेरीत खेळण्याची संधी त्याला मिळाली. रणजीत चमकलेल्या पृथ्वीला १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम फेरीपर्यंतचे सर्वच सामने एकतर्फी जिंकून विश्वचषकावर मोहोर उमटवली.कर्णधार म्हणून खेळतांना येणारे दडपण झुगारून त्याने भारतीय संघाचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी लीलया पेलली. त्यामुळे सामना जिंकण्याचे दडपण सहकाºयांवर आले नाही.भारतीय संघात खेळण्याचे पृथ्वीचे स्वप्न आहे. भारतीय संघात येण्यासाठी असलेली मोठ्या खेळाडूंशी असलेल्या स्पर्धेची त्याला जाण आहे. पण, पृथ्वीने अगदी लहान वयात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. याच अफाट गुणवत्तेच्या जोरावर तो भारताचे नेतृत्व नक्कीच करील, असा विश्वास त्याचे विरारमधील प्रशिक्षक संतोष पिंगुळकर व्यक्त करतात.>आता लक्ष्य भारतीय संघातून खेळण्याचेभारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर विरार के छोरेने और एक कमाल किया या वाक्याची भर पडली. रिझवी स्कूल, हॅरीस शिल्ड, रणजी ट्रॉफी आणि १९ वर्षाखालील विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाºया पृथ्वी शॉला दिल्ली संघाने आयपीएलसाठी बुक केले आहे.

टॅग्स :Cricketक्रिकेट