शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाची पुनर्बांधणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:27 IST

वर्षभरापूर्वी झाले होते भूमिपूजन

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत झाले. पण अद्याप कामाला सुरूवातही झालेली नसून हे रूग्णालय सध्या धोकादायक इमारतीमध्येच सुरू आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी पवई चौकातील एका खाजगी जागेत रूग्णालय स्थलांतरीत केले जाणार आहे. शस्त्रक्रिया सोडून सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली. तीन वर्षात १२० च्या निधीतून १०० बेडचे आधुनिक रुग्णालय बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे कामगार रूग्णालय असून हजारो कामगार येथे तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी उचारासाठी येत असतात. त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जातात. ठाणे जिल्ह्यात फक्त दोनच कामगार रूग्णालय असून दोन्ही रूग्णालयांना अवकळा आली आहे. रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ५ वर्षापूर्वी शस्त्रक्रीया विभाग बंद करण्यात आला. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसूती तेथे केली जाते. रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी लावून धरल्यावर दोन वर्षापूर्वीच पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी १२० कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार शिंदे यांच्या हस्ते झाला होता.

इमारतीच्या पुनर्बांधणीपूर्वी रूग्णालय खाजगी जागेत हलविणे गरजेचे आहे. कॅम्प नं-३ पवई चौकातील एका खाजगी जागेत कामगार रूग्णालय स्थलांतरीत करण्यात येणार असून तेथे बाह्यरूग्ण विभाग सुरू राहणार आहे. रूग्णावर उपचार, शस्त्रक्रिया व इतर कामे खाजगी रूग्णालयाकडून करण्यात येणार असून त्यांचा सर्व खर्च राष्ट्रीय कामगार विमा सोसायटीच्या वतीने केला जाणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी रूग्णालय खाजगी जागेत स्थलांतरीत केले नाहीतर, रूग्णालय बंद करण्याचे संकेतही त्यांनी दिले. धोकादायक झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीत डॉक्टरांसह १५० जणांचा कामगार वर्ग तसेच रूग्ण व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक जीव मुठीत घेऊन राहतात. सरकारकडे पाठपुरावा होत नसल्याने भूमिपूजनाला एक वर्ष उलटून कामाला सुरूवात झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.३२ रूग्णांसाठी १५० डॉक्टर१०० खाटाच्या कामगार रूग्णालयात फक्त ३२ रूग्ण उपचार घेत असून बाह्यरूग्ण विभागात १०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद आहे. धोकादायक इमारत झाल्याने, रूग्ण येथे उपचार करण्यासाठी येत नसून रूग्णांपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.