शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाची पुनर्बांधणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:27 IST

वर्षभरापूर्वी झाले होते भूमिपूजन

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत झाले. पण अद्याप कामाला सुरूवातही झालेली नसून हे रूग्णालय सध्या धोकादायक इमारतीमध्येच सुरू आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी पवई चौकातील एका खाजगी जागेत रूग्णालय स्थलांतरीत केले जाणार आहे. शस्त्रक्रिया सोडून सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली. तीन वर्षात १२० च्या निधीतून १०० बेडचे आधुनिक रुग्णालय बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे कामगार रूग्णालय असून हजारो कामगार येथे तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी उचारासाठी येत असतात. त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जातात. ठाणे जिल्ह्यात फक्त दोनच कामगार रूग्णालय असून दोन्ही रूग्णालयांना अवकळा आली आहे. रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ५ वर्षापूर्वी शस्त्रक्रीया विभाग बंद करण्यात आला. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसूती तेथे केली जाते. रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी लावून धरल्यावर दोन वर्षापूर्वीच पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी १२० कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार शिंदे यांच्या हस्ते झाला होता.

इमारतीच्या पुनर्बांधणीपूर्वी रूग्णालय खाजगी जागेत हलविणे गरजेचे आहे. कॅम्प नं-३ पवई चौकातील एका खाजगी जागेत कामगार रूग्णालय स्थलांतरीत करण्यात येणार असून तेथे बाह्यरूग्ण विभाग सुरू राहणार आहे. रूग्णावर उपचार, शस्त्रक्रिया व इतर कामे खाजगी रूग्णालयाकडून करण्यात येणार असून त्यांचा सर्व खर्च राष्ट्रीय कामगार विमा सोसायटीच्या वतीने केला जाणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी रूग्णालय खाजगी जागेत स्थलांतरीत केले नाहीतर, रूग्णालय बंद करण्याचे संकेतही त्यांनी दिले. धोकादायक झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीत डॉक्टरांसह १५० जणांचा कामगार वर्ग तसेच रूग्ण व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक जीव मुठीत घेऊन राहतात. सरकारकडे पाठपुरावा होत नसल्याने भूमिपूजनाला एक वर्ष उलटून कामाला सुरूवात झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.३२ रूग्णांसाठी १५० डॉक्टर१०० खाटाच्या कामगार रूग्णालयात फक्त ३२ रूग्ण उपचार घेत असून बाह्यरूग्ण विभागात १०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद आहे. धोकादायक इमारत झाल्याने, रूग्ण येथे उपचार करण्यासाठी येत नसून रूग्णांपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.