शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाची पुनर्बांधणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:27 IST

वर्षभरापूर्वी झाले होते भूमिपूजन

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत झाले. पण अद्याप कामाला सुरूवातही झालेली नसून हे रूग्णालय सध्या धोकादायक इमारतीमध्येच सुरू आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी पवई चौकातील एका खाजगी जागेत रूग्णालय स्थलांतरीत केले जाणार आहे. शस्त्रक्रिया सोडून सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली. तीन वर्षात १२० च्या निधीतून १०० बेडचे आधुनिक रुग्णालय बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे कामगार रूग्णालय असून हजारो कामगार येथे तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी उचारासाठी येत असतात. त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जातात. ठाणे जिल्ह्यात फक्त दोनच कामगार रूग्णालय असून दोन्ही रूग्णालयांना अवकळा आली आहे. रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ५ वर्षापूर्वी शस्त्रक्रीया विभाग बंद करण्यात आला. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसूती तेथे केली जाते. रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी लावून धरल्यावर दोन वर्षापूर्वीच पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी १२० कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार शिंदे यांच्या हस्ते झाला होता.

इमारतीच्या पुनर्बांधणीपूर्वी रूग्णालय खाजगी जागेत हलविणे गरजेचे आहे. कॅम्प नं-३ पवई चौकातील एका खाजगी जागेत कामगार रूग्णालय स्थलांतरीत करण्यात येणार असून तेथे बाह्यरूग्ण विभाग सुरू राहणार आहे. रूग्णावर उपचार, शस्त्रक्रिया व इतर कामे खाजगी रूग्णालयाकडून करण्यात येणार असून त्यांचा सर्व खर्च राष्ट्रीय कामगार विमा सोसायटीच्या वतीने केला जाणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी रूग्णालय खाजगी जागेत स्थलांतरीत केले नाहीतर, रूग्णालय बंद करण्याचे संकेतही त्यांनी दिले. धोकादायक झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीत डॉक्टरांसह १५० जणांचा कामगार वर्ग तसेच रूग्ण व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक जीव मुठीत घेऊन राहतात. सरकारकडे पाठपुरावा होत नसल्याने भूमिपूजनाला एक वर्ष उलटून कामाला सुरूवात झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.३२ रूग्णांसाठी १५० डॉक्टर१०० खाटाच्या कामगार रूग्णालयात फक्त ३२ रूग्ण उपचार घेत असून बाह्यरूग्ण विभागात १०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद आहे. धोकादायक इमारत झाल्याने, रूग्ण येथे उपचार करण्यासाठी येत नसून रूग्णांपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.