शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटी बंधारा बांधणार श्रमदानातून

By admin | Updated: July 7, 2016 03:04 IST

सातपाटी गावाला स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाबरोबरच हौतात्म्य पत्करण्याचा इतिहास आहे. मच्छिमारी व्यवसायावर संकटे आल्यास ती दूर करण्यासाठी एकजूट दाखवून १९८० साली खाडीत बॅक वॉटर

- हितेन नाईक,  पालघर

सातपाटी गावाला स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाबरोबरच हौतात्म्य पत्करण्याचा इतिहास आहे. मच्छिमारी व्यवसायावर संकटे आल्यास ती दूर करण्यासाठी एकजूट दाखवून १९८० साली खाडीत बॅक वॉटर बंधारा श्रमदानातून उभारण्याचा गौरवशाली इतिहासही त्याला आहे. अशावेळी आपण मागील दहा वर्षापासून आपला संरक्षक बंधारा फुटल्याने शासन आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडून निधीची भीक मागण्यापेक्षा तो श्रमदानातून व लोकवर्गणीतून उभारण्याचा निर्णय येथील श्रीराम मंदिरात बुधवारी झालेल्या निर्धार बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात होणार आहे. ताडी माडी संस्था, कांचन पाटील हे या कामी दोन जेसीबी देणार असून रेती वाहतूक संघटनेने फावडे, घमेले तर गणपती सार्वजनिक मंडळाकडून तसेच सहकारी संस्थाकडून वैयक्तिक देणग्या देण्याचे एकमताने ठरविले आहे.सर्वात जास्त स्वातंत्र्यसैनिक असलेले गाव म्हणूनही सातपाटीची नोंद असून स्वांतत्र्यसंग्रामाची ज्वाला धगधगती ठेवण्याचे कार्यही गावाने केले आहे. सातपाटी हे एक प्रगतीशील बंदर असून चारशे ते पाचशे लहान मोठया बोटी व्दारे येथे मासेमारी केली जाते. लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून सातपाटीची ओळख असून १८ ते २० हजार इतकी कागदोपत्री लोकसंख्या नोंद असली तरी मासेमारी व्यवसायाशी निगडीत लोक पहाता २५ ते ३० हजार लोक गावात रहात आहेत.सन १९८० दरम्यान मासेमारी चांगली होत असताना अचानक खाडी मधील नौकामन मार्गात गाळ साचून मासेमारी पुढे संकट उभे राहीले होते. हे बंदर बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर व्यवसायावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करूनही हाती काही पडत नसल्याने गावातील दोन्ही सहकारी संस्था, ग्रामपंचायत विविध सामाजिक संघानी एकत्र येत एकजुटीने श्रमदानातून बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला होता. पर्यावरणाचा समतोल बिघडू लागल्यानंतर व समुद्राच्या पातळीत सतत वाढ होवू लागल्याने समुद्री लाटांचे जोरदार तडाखे सन २००३ साली बांधलेल्या बंधाऱ्याला बसू लागले. परिणामी बंधाऱ्यातील दगड लाटांच्या तडाख्याने बाहेर फेकले जावून बंधाऱ्याला भगदाडे पडली. तर काही दगड किनाऱ्यावरील रहाणाऱ्या लोकांनी खाजगी वापरायला सुरूवात केली. त्यात सर्व गाळ बंधाऱ्यालगत येऊन साठू लागल्याने बंधाऱ्याची उंची कमी झाली. परिणामी समुद्राच्या लाटा बंधारा ओलांडून किनाऱ्यावरील घरांचा वेध घेऊ लागल्या. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी महिला वर्ग, सहकारीसंस्था मागील दहा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु ठोस कारवाई होत नसल्याने अजून किती वर्षे मागण्या, आंदोलने, चर्चा, भेटी घेत बसायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.१९८० साली उभारला होता ‘सेतू’शासन व ग्रामस्थांच्या निधीतून गावामध्ये ट्रकच्या ट्रक पडलेल्या दगडांचा वापर करुन ते बंधाऱ्यावर रचण्यासाठी उपयोगात आणले गेले. याकामी महिला, पुरूष वर्गासह लहान लहान मुलेही जीव तोडून कामाला लागली होती. काही मच्छिमारांनी आपल्या होडीव्दारे लहान मोठे दगड समुद्रातून आणुन या बंधाऱ्यामध्ये ्नरचले होते. त्यामुळे शंकराच्या देवळाजवळ उत्तर-दक्षिण बंधारा उभारल्याने (सेतूच) त्याचा सकारात्मक बदल दिसून येत मच्छिमारांची गाळापासून सुटका झाली होती.चला उठा, जागे व्हा... : सातपाटी गावामध्ये श्रीराम मंदीरांच्या यात्रेमध्ये सर्वगाव एकत्र येतो. गावकरी सलग तीन दिवस सण साजरा करतात. साईबाबांच्या भंडाऱ्यासाठी १५ ते २० हजाराचा जमाव जमून बाबांचे गुणगान करतात. स्वाध्यायी गृप, समर्थ परीवाराच्या बैठकीतील सदस्य, स्वाध्यायी इ. सह अनेक पंथाचे अनुयायी हजारोच्या संख्येने एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी प्रयत्न करीत असतात. मग आज समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छिमारांच्या घरावर संकट आले असतांना शासन, आमदार, खासदार, ग्रामपंचायत यांच्या नावाने बोटेच काय मोडत बसलोय, आपलीही काही सामाजिक जबाबदारी नाही का? त्यामुळे चला उठा, जागे व्हा. सन १९८० साली आपल्या बाबांनी वरिष्ठांनी आपल्या गावाला दिलेला श्रमदानाचा वारसा आपण पुढे चालविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांच्या कानी या गोष्टी घालून अपात्कालीन फंडातून काही निधी मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. - राजन मेहेर, अध्यक्ष,महाराष्ट्र मच्छिमार सेल.श्रमदानातून बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रस्तावही स्वागतार्ह बाब असून गावातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करणार. - रमेश दवणे, अध्यक्ष-तंटामुक्त समिती.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून श्रमदानाचा मिळालला वारसा पुढे नेण्यासाठी तरूणवर्ग नक्कीच उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवतील असा मला विश्वास आहे. - संजय तरे, माजी चेअरमन, सर्वोदय सहकारी संस्था.