शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

विक्रमगडमधील महिला बनवताहेत बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 02:19 IST

ऑनलाइन पद्धतीने करणार ५० हजार राख्यांची विक्री

राहुल वाडेकर  

विक्रमगड : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊ न लागू झाल्यापासून सर्वच क्षेत्रांत आर्थिक संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ३०० आदिवासी महिलांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बांबूपासून ५० हजार पर्यावरणपूरक राख्या बनवण्याचे लक्ष्य ठेवले असून यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून त्यांना बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून या महिलांनी बनवलेल्या राख्यांना आॅनलाइन बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन व सध्या चीनसोबतच्या बिघडत्या संबंधांमुळे स्वदेशी वस्तूंची पर्यायी बाजारपेठ निर्माण करून चिनी वस्तूंना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी ग्रामीण भागातील महिला एकवटल्या आहेत. आगामी रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत विक्र ीसाठी येणाऱ्या चिनी राख्यांना टक्कर देण्यासाठी या महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा ५० हजार स्वदेशी राख्या बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करून या महिला दिवसरात्र झटत आहेत. तसेच आगामी काळात येणाºया गणपती-नवरात्र आणि दिवाळी सणांसाठी लागणारी आकर्षक मखरे आणि आकाशकंदीलही बांबूपासून साकारण्याचा त्यांचा निर्धार आहे.महिला सक्षमीकरणवाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील दुर्गम आदिवासी भागात विविध सेवाभावी प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, सेंद्रिय शेती ही ध्येये समोर ठेवण्यात आली आहेत. याकामी प्रकल्पाचे प्रमुख विमल केडिया, संयोजक अरविंद मारडीकर, गौरव श्रीवास्तव, संतोष गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.