शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

विक्रमगडमधील महिला बनवताहेत बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 02:19 IST

ऑनलाइन पद्धतीने करणार ५० हजार राख्यांची विक्री

राहुल वाडेकर  

विक्रमगड : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊ न लागू झाल्यापासून सर्वच क्षेत्रांत आर्थिक संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ३०० आदिवासी महिलांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बांबूपासून ५० हजार पर्यावरणपूरक राख्या बनवण्याचे लक्ष्य ठेवले असून यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून त्यांना बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून या महिलांनी बनवलेल्या राख्यांना आॅनलाइन बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन व सध्या चीनसोबतच्या बिघडत्या संबंधांमुळे स्वदेशी वस्तूंची पर्यायी बाजारपेठ निर्माण करून चिनी वस्तूंना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी ग्रामीण भागातील महिला एकवटल्या आहेत. आगामी रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत विक्र ीसाठी येणाऱ्या चिनी राख्यांना टक्कर देण्यासाठी या महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा ५० हजार स्वदेशी राख्या बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करून या महिला दिवसरात्र झटत आहेत. तसेच आगामी काळात येणाºया गणपती-नवरात्र आणि दिवाळी सणांसाठी लागणारी आकर्षक मखरे आणि आकाशकंदीलही बांबूपासून साकारण्याचा त्यांचा निर्धार आहे.महिला सक्षमीकरणवाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील दुर्गम आदिवासी भागात विविध सेवाभावी प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, सेंद्रिय शेती ही ध्येये समोर ठेवण्यात आली आहेत. याकामी प्रकल्पाचे प्रमुख विमल केडिया, संयोजक अरविंद मारडीकर, गौरव श्रीवास्तव, संतोष गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.