शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

विक्रमगडमधील महिला बनवताहेत बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 02:19 IST

ऑनलाइन पद्धतीने करणार ५० हजार राख्यांची विक्री

राहुल वाडेकर  

विक्रमगड : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊ न लागू झाल्यापासून सर्वच क्षेत्रांत आर्थिक संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ३०० आदिवासी महिलांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बांबूपासून ५० हजार पर्यावरणपूरक राख्या बनवण्याचे लक्ष्य ठेवले असून यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून त्यांना बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून या महिलांनी बनवलेल्या राख्यांना आॅनलाइन बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन व सध्या चीनसोबतच्या बिघडत्या संबंधांमुळे स्वदेशी वस्तूंची पर्यायी बाजारपेठ निर्माण करून चिनी वस्तूंना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी ग्रामीण भागातील महिला एकवटल्या आहेत. आगामी रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत विक्र ीसाठी येणाऱ्या चिनी राख्यांना टक्कर देण्यासाठी या महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा ५० हजार स्वदेशी राख्या बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करून या महिला दिवसरात्र झटत आहेत. तसेच आगामी काळात येणाºया गणपती-नवरात्र आणि दिवाळी सणांसाठी लागणारी आकर्षक मखरे आणि आकाशकंदीलही बांबूपासून साकारण्याचा त्यांचा निर्धार आहे.महिला सक्षमीकरणवाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील दुर्गम आदिवासी भागात विविध सेवाभावी प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, सेंद्रिय शेती ही ध्येये समोर ठेवण्यात आली आहेत. याकामी प्रकल्पाचे प्रमुख विमल केडिया, संयोजक अरविंद मारडीकर, गौरव श्रीवास्तव, संतोष गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.