शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

‘मागासलेपणाचा ठपका महिलांनीच पुसून काढावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 04:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : शेतकरी मेळाव्यात हजारोे शेतकरी

पालघर : मुलीच्या जन्माने आमच्या घरात दु:खाचे वातावरण निर्माण होत नाही, त्यावरुन आम्ही घरातील महिलांना त्रास देत नाही हे आमचे मानिसक पुढारलेपण असून जिल्ह्यावर लावण्यात येत असलेल्या मागासलेपणाच्या ठपक्याला त्यामुळे काही अर्थ उरत नाही. हा जिल्ह्याला लागलेला ठपका सर्व महिलांनी एकत्र आल्यास तात्काळ पुसून काढू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी झडपोली येथे शेतकरी मेळाव्यात काढले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाडा आणि गोवर्धन इको व्हिलेज गालतरे यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या मेळाव्यात हजारो शेतकरी कुटुंबीयांसह उपस्थित होते. यात मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा कृषी अधीक्षक तरकसे, पशुधन अधिकारी अजित हिरवे, उपयुक्त कांबळी, डॉ.हेमंत सवरा, ब्राह्मकुमार राजुभाई, मनमोहन दास, सभापती खुताडे, आयोजक भगवान सांबरे उपस्थित होते.आपण कितीही चांगले उत्पादन घेतले, पावसाने कितीही चांगली साथ दिली तरी शेतकºयांच्या उत्पादनाचा भाव आपल्या हातात नसल्याने शेती परवडत नसल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्यातील शेतकºयांना एकत्र आणण्याचे मोठे काम निलेश सांबरे यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले आहे. या कार्यात शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिला.शेतकºयांच्या सुशिक्षित मुलांनी आपल्या शिक्षणाचा खºया अर्थाने उपयोग करण्यासाठी आपल्या शेतातील उत्पादनाचे ब्रँडिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग स्वत: करण्यासाठी पुढे यावे, त्यासाठी सुरु वातीपासून ते शेवटपर्यंत शासन आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. जिल्ह्यात साडेचार हजार शेतकºयांनाचे गट तयार करण्यात आले असून ५८ खाजगी कंपन्या तयार करण्यात आल्या आहेत. मोखाडा, माकूणसार येथून कामाला सुरु वात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोरीकर यांनी सांबरे यांनी उभ्या केलेल्या शेती चळवळीचे कौतुक करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीतून चांगले पैसे हातात पडू लागल्यास शेती पासून दूर चाललेला तरु ण पुन्हा वळू शकतो. हा त्यांना मिळालेला विश्वास म्हणजेच या कार्यक्र माचे फलित ठरणार आहे असे डॉ. सवरा यांनी सांगितले. कार्यक्र माचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर,निलेश सांबरे, राजुभाई, दास आदी मान्यवर. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार