शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘मागासलेपणाचा ठपका महिलांनीच पुसून काढावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 04:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : शेतकरी मेळाव्यात हजारोे शेतकरी

पालघर : मुलीच्या जन्माने आमच्या घरात दु:खाचे वातावरण निर्माण होत नाही, त्यावरुन आम्ही घरातील महिलांना त्रास देत नाही हे आमचे मानिसक पुढारलेपण असून जिल्ह्यावर लावण्यात येत असलेल्या मागासलेपणाच्या ठपक्याला त्यामुळे काही अर्थ उरत नाही. हा जिल्ह्याला लागलेला ठपका सर्व महिलांनी एकत्र आल्यास तात्काळ पुसून काढू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी झडपोली येथे शेतकरी मेळाव्यात काढले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाडा आणि गोवर्धन इको व्हिलेज गालतरे यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या मेळाव्यात हजारो शेतकरी कुटुंबीयांसह उपस्थित होते. यात मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा कृषी अधीक्षक तरकसे, पशुधन अधिकारी अजित हिरवे, उपयुक्त कांबळी, डॉ.हेमंत सवरा, ब्राह्मकुमार राजुभाई, मनमोहन दास, सभापती खुताडे, आयोजक भगवान सांबरे उपस्थित होते.आपण कितीही चांगले उत्पादन घेतले, पावसाने कितीही चांगली साथ दिली तरी शेतकºयांच्या उत्पादनाचा भाव आपल्या हातात नसल्याने शेती परवडत नसल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्यातील शेतकºयांना एकत्र आणण्याचे मोठे काम निलेश सांबरे यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले आहे. या कार्यात शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिला.शेतकºयांच्या सुशिक्षित मुलांनी आपल्या शिक्षणाचा खºया अर्थाने उपयोग करण्यासाठी आपल्या शेतातील उत्पादनाचे ब्रँडिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग स्वत: करण्यासाठी पुढे यावे, त्यासाठी सुरु वातीपासून ते शेवटपर्यंत शासन आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. जिल्ह्यात साडेचार हजार शेतकºयांनाचे गट तयार करण्यात आले असून ५८ खाजगी कंपन्या तयार करण्यात आल्या आहेत. मोखाडा, माकूणसार येथून कामाला सुरु वात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोरीकर यांनी सांबरे यांनी उभ्या केलेल्या शेती चळवळीचे कौतुक करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीतून चांगले पैसे हातात पडू लागल्यास शेती पासून दूर चाललेला तरु ण पुन्हा वळू शकतो. हा त्यांना मिळालेला विश्वास म्हणजेच या कार्यक्र माचे फलित ठरणार आहे असे डॉ. सवरा यांनी सांगितले. कार्यक्र माचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर,निलेश सांबरे, राजुभाई, दास आदी मान्यवर. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार