शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
4
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
5
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
6
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
7
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
8
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
9
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
10
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
11
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
12
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
13
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
14
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
15
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
16
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
17
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
18
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
19
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
20
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मशिनमध्ये सापडून महिलेची बोटे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:40 IST

पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.

निखिल मेस्त्रीनंडोरे: पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.पती भूपेशसह भावना गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीत काम करीत आहेत. दुपारचे जेवण झाल्यानंतर भावना पाटील प्रेस मशीनवर काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करत असताना अचानक प्रेस (उच्च दबाव यंत्र) दाबली गेली त्यात त्यांच्या उजव्या हाताचा तळवा या मशीनमध्ये सापडला व त्यात त्यांच्या तिन्ही बोटं निकामी झाली.या घटनेनंतर कंपनीच्या निरीक्षक आनंद सिंग यांनी त्यांना पालघर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताच्या बोटाना बरेच फ्रॅक्चर आल्याचे सांगितले. जखमा बºया झाल्यानंतरच त्यावर शस्त्रक्रीया करता येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जखमी भावना यांना नातेवाईकांच्या हवाली करुन निरिक्षक निघुन गेला.वास्तविक तिच्या संपुर्ण जबाबदारी कंपनी प्रशासनाने स्विकारणे अपेक्षित असतांना त्यापासून पळणाºया प्रशासनाला चहाडे गावचे सरपंच अजय पाटील यांनी जाब विचारल्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे एचआर मॅनेजर तरे यांनी पिडीतेची भेट घेतली व कंपनी प्रशासन संपुर्ण खर्चाची जबाबदारी स्विकारेल असे गावकºयांना सांगितले.>अशी होते पिळवणूकप्राईम इंडस्ट्रीज ही कंपनी कर्मचाºयांना रोखीने पगार देत असल्याचे या घटनेनंतर समोर येत आहे. भावना पाटील यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता कंपनीने जोखमीच्या मशीनवर कामावर ठेवले. तिला आठ ते दहा तास काम करून ताशी २२ रु पये ५० पैसे प्रमाणे अत्याल्प रोजगार मिळत होता.त्यातून तीन मुलांचा सांभाळ करणाºया पाटील कुटुंबाचा विचार कंपनी करणार का ? भावना यांचे होणारे नुकसान कंपनी भरून देणार का असा सवाल नातेवकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सलग काम करूनही कंपनीने नियमांप्रमाणे भावना पाटील यांना कायम केले नाही. त्यांचा हक्काचा भविष्य निर्वाह भत्ता कापलेला नाही.>कंपनीने कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांना यंत्रावर कामास ठेवले हे चुकीचे आहे. भावना बरी होईपर्यंत कंपनीने त्यांचा औषधोपचारासाठी खर्च करावा तसेच त्यांना कंपनीने कायमस्वरूपी काम द्यावे.- अजय पाटील,प्रभारी सरपंच, चहाडे