शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

जिंकणार की जिंकून देणार?

By admin | Updated: February 15, 2016 02:55 IST

पारंपारिक दुरंगी लढतीत एकाला विजयी करणाऱ्या या मतदारासंघात अनेक वर्षानंतर बविआच्या रुपाने तिरंगी लढत झाली.

पालघर : पारंपारिक दुरंगी लढतीत एकाला विजयी करणाऱ्या या मतदारासंघात अनेक वर्षानंतर बविआच्या रुपाने तिरंगी लढत झाली. त्यामुळे बविआ जिंकणार की तिची उमेदवारी युती अथवा आघाडीच्या विजयाला हातभार लावणार या प्रश्नाची चर्चा सध्या पालघरमध्ये होते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांची मतदानाची आकडेवारी असे सांगते की, गत विजेत्याचा विजय हा अगदी थोड्या मताधिक्क्याने झाला आहे. व तोही एकास एक लढत असल्याने परंतु या वेळी तिघाही मातब्बर उमेदवारांची तिरंगी लढत झाल्याने नवख्या असलेल्या बविआची उमेदवारी विजयी होते की घोडा किंवा गावितांच्या विजयाला हातभार लावते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तिसऱ्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील सर्व पारंपारिक समीकरणं बदलून गेलीत हे सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते मान्य करतात. त्यातच मतदानाची टक्केवारी गतवेळेच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे तिसरी उमेदवारी आणि घटलेले मतदान याचा फायदा ज्या उमेदवाराला होईल त्याच्या गळ्यात विजश्री माळ घालेल, अशी चिन्हे आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांना ४६१४२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांना ४५६२७ मते मिळाली होती. म्हणजे घोडा यांनी अवघ्या ५१५ मतांच्या अधिक्याने विजय मिळविला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गावीत यांना ५५६६५ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना ३४६९४ मते प्राप्त झाली होती. त्यामुळे गावितांचे मताधिक्य २०९७१ इतके होते. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना ५८६२७ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या गावीत यांना ५०१८६ मते मिळाली होती. निमकर यांनी गावितांचा ८४४१ मतांनी पराभव केला होता. तर १९९९ मध्ये निमकर यांनी ४६०१५ मते मिळवून जनता दल सेक्युलरच्या गीता पागी यांचा २४३४२ मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसला येथे तुल्यबळ उमेदवारही लाभला नव्हता. १९९५ मध्ये सेनेच्या निमकर यांनी ५५३९९ मते मिळवून काँग्रेसच्या जगन्नाथ रहाणे यांना पराभूत केले होते. यावेळी निमकरांचे मताधिक्य २०१४९ होते. यावेळीही काँग्रेसला तगडा उमेदवार न मिळाल्यामुळे निमकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. १९९० मध्ये सेनेच्या अविनाश सुतार यांनी ३६१४१ मते मिळवून जनता दलाच्या काळूराम धोदडे यांचा पराभव केला होता. त्यांना २८४२४ मते मिळाली होती. त्यांचे मताधिक्य ७७१७ होते. तर १९८५ मध्ये काँग्रेसच्या विष्णू वळवी यांनी जनता पक्षाच्या अर्जुन शिंगाडे यांचा पराभव केला होता. वळवी यांना २२४९५ तर काकडे यांना १६७२९ मते मिळाली होती. वळवी यांचे मताधिक्य ५५६६ इतके होते. १९७८ मध्ये जनता पक्षाच्या अर्जुन शिंगाडे यांनी ३२६३५ मते मिळवून काँग्रेसच्या जनार्दन शेलार यांचा पराभव केला होता. त्यांना १६९३४ मते मिळाली होती. शिंगाडे यांचे मताधिक्य १५७०१ इतके होते. १९७२ मध्ये पालघर हा मतदारसंघ खुला होता. त्यातून काँग्रेसच्या विनायक पाटील यांनी ३२४४१ मते मिळवून समाजवादी पक्षाच्या मोरेश्वर मिस्त्री यांचा पराभव केला होता. त्यांना १७२८५ मते मिळाली होती. पाटील यांचे मताधिक्य १५१५६ इतके होते. (विशेष प्रतिनिधी)