शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिंकणार की जिंकून देणार?

By admin | Updated: February 15, 2016 02:55 IST

पारंपारिक दुरंगी लढतीत एकाला विजयी करणाऱ्या या मतदारासंघात अनेक वर्षानंतर बविआच्या रुपाने तिरंगी लढत झाली.

पालघर : पारंपारिक दुरंगी लढतीत एकाला विजयी करणाऱ्या या मतदारासंघात अनेक वर्षानंतर बविआच्या रुपाने तिरंगी लढत झाली. त्यामुळे बविआ जिंकणार की तिची उमेदवारी युती अथवा आघाडीच्या विजयाला हातभार लावणार या प्रश्नाची चर्चा सध्या पालघरमध्ये होते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांची मतदानाची आकडेवारी असे सांगते की, गत विजेत्याचा विजय हा अगदी थोड्या मताधिक्क्याने झाला आहे. व तोही एकास एक लढत असल्याने परंतु या वेळी तिघाही मातब्बर उमेदवारांची तिरंगी लढत झाल्याने नवख्या असलेल्या बविआची उमेदवारी विजयी होते की घोडा किंवा गावितांच्या विजयाला हातभार लावते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तिसऱ्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील सर्व पारंपारिक समीकरणं बदलून गेलीत हे सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते मान्य करतात. त्यातच मतदानाची टक्केवारी गतवेळेच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे तिसरी उमेदवारी आणि घटलेले मतदान याचा फायदा ज्या उमेदवाराला होईल त्याच्या गळ्यात विजश्री माळ घालेल, अशी चिन्हे आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांना ४६१४२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांना ४५६२७ मते मिळाली होती. म्हणजे घोडा यांनी अवघ्या ५१५ मतांच्या अधिक्याने विजय मिळविला होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गावीत यांना ५५६६५ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना ३४६९४ मते प्राप्त झाली होती. त्यामुळे गावितांचे मताधिक्य २०९७१ इतके होते. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना ५८६२७ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या गावीत यांना ५०१८६ मते मिळाली होती. निमकर यांनी गावितांचा ८४४१ मतांनी पराभव केला होता. तर १९९९ मध्ये निमकर यांनी ४६०१५ मते मिळवून जनता दल सेक्युलरच्या गीता पागी यांचा २४३४२ मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसला येथे तुल्यबळ उमेदवारही लाभला नव्हता. १९९५ मध्ये सेनेच्या निमकर यांनी ५५३९९ मते मिळवून काँग्रेसच्या जगन्नाथ रहाणे यांना पराभूत केले होते. यावेळी निमकरांचे मताधिक्य २०१४९ होते. यावेळीही काँग्रेसला तगडा उमेदवार न मिळाल्यामुळे निमकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. १९९० मध्ये सेनेच्या अविनाश सुतार यांनी ३६१४१ मते मिळवून जनता दलाच्या काळूराम धोदडे यांचा पराभव केला होता. त्यांना २८४२४ मते मिळाली होती. त्यांचे मताधिक्य ७७१७ होते. तर १९८५ मध्ये काँग्रेसच्या विष्णू वळवी यांनी जनता पक्षाच्या अर्जुन शिंगाडे यांचा पराभव केला होता. वळवी यांना २२४९५ तर काकडे यांना १६७२९ मते मिळाली होती. वळवी यांचे मताधिक्य ५५६६ इतके होते. १९७८ मध्ये जनता पक्षाच्या अर्जुन शिंगाडे यांनी ३२६३५ मते मिळवून काँग्रेसच्या जनार्दन शेलार यांचा पराभव केला होता. त्यांना १६९३४ मते मिळाली होती. शिंगाडे यांचे मताधिक्य १५७०१ इतके होते. १९७२ मध्ये पालघर हा मतदारसंघ खुला होता. त्यातून काँग्रेसच्या विनायक पाटील यांनी ३२४४१ मते मिळवून समाजवादी पक्षाच्या मोरेश्वर मिस्त्री यांचा पराभव केला होता. त्यांना १७२८५ मते मिळाली होती. पाटील यांचे मताधिक्य १५१५६ इतके होते. (विशेष प्रतिनिधी)