शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

सफाळे वैतरणा पूल खचणार?

By admin | Updated: June 1, 2016 02:22 IST

सफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने

हितेन नाईक,  पालघरसफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अत्यंत धोकादायक अवस्थेतील हे रेती उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच रोखले नाही तर रेल्वे पूल खचून एखाद्या रेल्वेला अपघात घडल्यास मोठी प्राणहानी घडू शकते.पालघर जिल्हयात अनेक नदीपात्राच्या खाडीमध्ये रेती उत्खननाला बंदी असून फार कमी ठिकाणी रेती परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे रेतीची टंचाई भासत असुन असल्याने मोठया प्रमाणात चोरटया पध्दतीने रेती उत्खनन वाहतूक सुरू आहे. सतत रेतीच्या मागणी वाढत असल्याने अत्यंत धोकादायक पध्दतीने बेकायदेशीररित्या नदी, नाले, खाडी, समुद्रातून रेती उत्खनन सुरू आहे.सफाळे वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवरील पुलावरून मुंबईकडे गुजरात, दिल्ली इ. ठिकाणी पश्चिम मध्य व उत्तर रेल्वेच्या २५० ट्रेन्स रोज जातात. हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षापूर्वी बांधण्यात आला असून सुमारे ४५० ते ५०० गाडयांच्या फेऱ्यामुळे व समुद्राच्या खारट हवा,पाणी हयामुळे तो काही प्रमाणात कमकुवत बनल्याने नुकतीच त्याच्या व रुळांच्या दुरूस्तीसाठी जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. वैतरणा खाडीवर दोन पूल असून हया पुलाच्या दोनशे ते तीनशे मिटरच्या अंतरावर दिवसा ढवळया रेती उत्खनन चालू असून हा पूल खचल्यास त्यावरून जाणाऱ्या एखाद्या प्रवासी ट्रेनला अपघात झाल्यास मोठया प्रमाणात जीवीतहानीला सामोरे जाण्याची भीती वाढीव - सरावली, वैतीपाडातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाढीव-वैतीपाडा हे वैतरणा खाडीमध्ये वसलेले एक बेट असून या बेटावर दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. चोही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटाला भरतीचा मोठा धोका असून पाणी गावात व शेतात शिरू नये म्हणून गावांच्या बाजूने खारभूमी विभागाने एक संरक्षक बंधारा बांधून दिला आहे.परंतु, हया बंधाऱ्या लगतच वाढीव वैतीपाडा इ. भागातील काही मूठभर स्वार्थी लोक रेती उत्खनन करतात तर काही रेती उत्खनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. यामुळे खारभूमीच्या बंधाऱ्याची झीज होउन काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. परिणामी गावातील सुमारे २०० एकर शेतजमीन नापीक बनली आहे. विहीर, बोअरवेलचे पाणी खारट बनले आहे.