शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

सफाळे वैतरणा पूल खचणार?

By admin | Updated: June 1, 2016 02:22 IST

सफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने

हितेन नाईक,  पालघरसफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अत्यंत धोकादायक अवस्थेतील हे रेती उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच रोखले नाही तर रेल्वे पूल खचून एखाद्या रेल्वेला अपघात घडल्यास मोठी प्राणहानी घडू शकते.पालघर जिल्हयात अनेक नदीपात्राच्या खाडीमध्ये रेती उत्खननाला बंदी असून फार कमी ठिकाणी रेती परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे रेतीची टंचाई भासत असुन असल्याने मोठया प्रमाणात चोरटया पध्दतीने रेती उत्खनन वाहतूक सुरू आहे. सतत रेतीच्या मागणी वाढत असल्याने अत्यंत धोकादायक पध्दतीने बेकायदेशीररित्या नदी, नाले, खाडी, समुद्रातून रेती उत्खनन सुरू आहे.सफाळे वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवरील पुलावरून मुंबईकडे गुजरात, दिल्ली इ. ठिकाणी पश्चिम मध्य व उत्तर रेल्वेच्या २५० ट्रेन्स रोज जातात. हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षापूर्वी बांधण्यात आला असून सुमारे ४५० ते ५०० गाडयांच्या फेऱ्यामुळे व समुद्राच्या खारट हवा,पाणी हयामुळे तो काही प्रमाणात कमकुवत बनल्याने नुकतीच त्याच्या व रुळांच्या दुरूस्तीसाठी जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. वैतरणा खाडीवर दोन पूल असून हया पुलाच्या दोनशे ते तीनशे मिटरच्या अंतरावर दिवसा ढवळया रेती उत्खनन चालू असून हा पूल खचल्यास त्यावरून जाणाऱ्या एखाद्या प्रवासी ट्रेनला अपघात झाल्यास मोठया प्रमाणात जीवीतहानीला सामोरे जाण्याची भीती वाढीव - सरावली, वैतीपाडातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाढीव-वैतीपाडा हे वैतरणा खाडीमध्ये वसलेले एक बेट असून या बेटावर दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. चोही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटाला भरतीचा मोठा धोका असून पाणी गावात व शेतात शिरू नये म्हणून गावांच्या बाजूने खारभूमी विभागाने एक संरक्षक बंधारा बांधून दिला आहे.परंतु, हया बंधाऱ्या लगतच वाढीव वैतीपाडा इ. भागातील काही मूठभर स्वार्थी लोक रेती उत्खनन करतात तर काही रेती उत्खनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. यामुळे खारभूमीच्या बंधाऱ्याची झीज होउन काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. परिणामी गावातील सुमारे २०० एकर शेतजमीन नापीक बनली आहे. विहीर, बोअरवेलचे पाणी खारट बनले आहे.