शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सफाळे वैतरणा पूल खचणार?

By admin | Updated: June 1, 2016 02:22 IST

सफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने

हितेन नाईक,  पालघरसफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अत्यंत धोकादायक अवस्थेतील हे रेती उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच रोखले नाही तर रेल्वे पूल खचून एखाद्या रेल्वेला अपघात घडल्यास मोठी प्राणहानी घडू शकते.पालघर जिल्हयात अनेक नदीपात्राच्या खाडीमध्ये रेती उत्खननाला बंदी असून फार कमी ठिकाणी रेती परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे रेतीची टंचाई भासत असुन असल्याने मोठया प्रमाणात चोरटया पध्दतीने रेती उत्खनन वाहतूक सुरू आहे. सतत रेतीच्या मागणी वाढत असल्याने अत्यंत धोकादायक पध्दतीने बेकायदेशीररित्या नदी, नाले, खाडी, समुद्रातून रेती उत्खनन सुरू आहे.सफाळे वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवरील पुलावरून मुंबईकडे गुजरात, दिल्ली इ. ठिकाणी पश्चिम मध्य व उत्तर रेल्वेच्या २५० ट्रेन्स रोज जातात. हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षापूर्वी बांधण्यात आला असून सुमारे ४५० ते ५०० गाडयांच्या फेऱ्यामुळे व समुद्राच्या खारट हवा,पाणी हयामुळे तो काही प्रमाणात कमकुवत बनल्याने नुकतीच त्याच्या व रुळांच्या दुरूस्तीसाठी जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. वैतरणा खाडीवर दोन पूल असून हया पुलाच्या दोनशे ते तीनशे मिटरच्या अंतरावर दिवसा ढवळया रेती उत्खनन चालू असून हा पूल खचल्यास त्यावरून जाणाऱ्या एखाद्या प्रवासी ट्रेनला अपघात झाल्यास मोठया प्रमाणात जीवीतहानीला सामोरे जाण्याची भीती वाढीव - सरावली, वैतीपाडातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाढीव-वैतीपाडा हे वैतरणा खाडीमध्ये वसलेले एक बेट असून या बेटावर दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. चोही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटाला भरतीचा मोठा धोका असून पाणी गावात व शेतात शिरू नये म्हणून गावांच्या बाजूने खारभूमी विभागाने एक संरक्षक बंधारा बांधून दिला आहे.परंतु, हया बंधाऱ्या लगतच वाढीव वैतीपाडा इ. भागातील काही मूठभर स्वार्थी लोक रेती उत्खनन करतात तर काही रेती उत्खनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. यामुळे खारभूमीच्या बंधाऱ्याची झीज होउन काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. परिणामी गावातील सुमारे २०० एकर शेतजमीन नापीक बनली आहे. विहीर, बोअरवेलचे पाणी खारट बनले आहे.