शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सफाळे वैतरणा पूल खचणार?

By admin | Updated: June 1, 2016 02:22 IST

सफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने

हितेन नाईक,  पालघरसफाळे वैतरणा दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या पुलालगतच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वैतरणा खाडीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अत्यंत धोकादायक अवस्थेतील हे रेती उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच रोखले नाही तर रेल्वे पूल खचून एखाद्या रेल्वेला अपघात घडल्यास मोठी प्राणहानी घडू शकते.पालघर जिल्हयात अनेक नदीपात्राच्या खाडीमध्ये रेती उत्खननाला बंदी असून फार कमी ठिकाणी रेती परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे रेतीची टंचाई भासत असुन असल्याने मोठया प्रमाणात चोरटया पध्दतीने रेती उत्खनन वाहतूक सुरू आहे. सतत रेतीच्या मागणी वाढत असल्याने अत्यंत धोकादायक पध्दतीने बेकायदेशीररित्या नदी, नाले, खाडी, समुद्रातून रेती उत्खनन सुरू आहे.सफाळे वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवरील पुलावरून मुंबईकडे गुजरात, दिल्ली इ. ठिकाणी पश्चिम मध्य व उत्तर रेल्वेच्या २५० ट्रेन्स रोज जातात. हा पूल सुमारे ४० ते ४५ वर्षापूर्वी बांधण्यात आला असून सुमारे ४५० ते ५०० गाडयांच्या फेऱ्यामुळे व समुद्राच्या खारट हवा,पाणी हयामुळे तो काही प्रमाणात कमकुवत बनल्याने नुकतीच त्याच्या व रुळांच्या दुरूस्तीसाठी जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. वैतरणा खाडीवर दोन पूल असून हया पुलाच्या दोनशे ते तीनशे मिटरच्या अंतरावर दिवसा ढवळया रेती उत्खनन चालू असून हा पूल खचल्यास त्यावरून जाणाऱ्या एखाद्या प्रवासी ट्रेनला अपघात झाल्यास मोठया प्रमाणात जीवीतहानीला सामोरे जाण्याची भीती वाढीव - सरावली, वैतीपाडातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाढीव-वैतीपाडा हे वैतरणा खाडीमध्ये वसलेले एक बेट असून या बेटावर दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. चोही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटाला भरतीचा मोठा धोका असून पाणी गावात व शेतात शिरू नये म्हणून गावांच्या बाजूने खारभूमी विभागाने एक संरक्षक बंधारा बांधून दिला आहे.परंतु, हया बंधाऱ्या लगतच वाढीव वैतीपाडा इ. भागातील काही मूठभर स्वार्थी लोक रेती उत्खनन करतात तर काही रेती उत्खनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. यामुळे खारभूमीच्या बंधाऱ्याची झीज होउन काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. परिणामी गावातील सुमारे २०० एकर शेतजमीन नापीक बनली आहे. विहीर, बोअरवेलचे पाणी खारट बनले आहे.