शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

ताडी व्यवसाय इतिहासजमा होणार?; शासकीय परवाना वितरण प्रक्रियेत जाचक अटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:08 IST

भंडारी समाजाचा व्यवसाय, २० वर्षांपूर्वी या व्यवसायात ठाणे, पालघर जिल्ह्यांत साधारणत: ५०० पेक्षा जास्त अधिकृत परवानाधारक होते

सुरेश काटेतलासरी : किनारपट्टीवर राहणाऱ्या भंडारी समाजाचा ताडी-माडी-विक्री हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, शासकीय परवाना वितरण प्रक्रियेच्या जाचक अटीत अडकल्याने या व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यामुळे या व्यवसायाशी निगडित भूमिपुत्रांच्या बेकारीत वाढ होऊन पारंपरिक व्यवसायापासून व्यावसायिक दुरावत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ताडी-माडी व्यवसाय तेजीत असतो. तलासरी, डहाणू तालुक्यांतील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात या व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने ताडी निर्यातीचे बंधन घातल्याने, मुंबई व ठाणे शहरांत जाणारी ताडीनिर्यात ठप्प झाली. त्यामुळे दिवसाकाठी हजारो लीटर ताडीपासून मिळणारे लाखो रुपयांच्या उत्पन्नाला कात्री बसली आहे. त्यामुळे ताडी व्यवसाय आता इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आला आहे. पूर्वीच्या ताडी व्यावसायिकांची मुलेही आता अन्य क्षेत्रांकडे वळू लागली आहेत. डहाणू, बोर्डी, चिंचणी, झाई, बोरीगाव या किनारपट्टीलगत बीअर दुकानामुळेही ताडीची दुकाने बंद पडत आहेत. सरकारचा नाकर्तेपणा आणि दिशाहीन धोरणांमुळे या व्यवसायावर संकट आल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

२० वर्षांपूर्वी या व्यवसायात ठाणे, पालघर जिल्ह्यांत साधारणत: ५०० पेक्षा जास्त अधिकृत परवानाधारक होते. फक्त डहाणू तालुक्यात हा आकडा १५० पर्यंत असे. मात्र, आजमितीला डहाणूत केवळ १६ अधिकृत दुकाने असून डहाणू शहरात पाच दुकाने आहेत. सुरुवातीला सुमारे २५ ते ३० हजार लोकांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून होती. परंतु, सध्याच्या घडीला हा व्यवसाय डबघाईला आल्याने बेकारी वाढली आहे. दरवर्षी शासनाकडून १० टक्के रक्कम वाढवली जात असल्याने भंडारी व आदिवासी समाज या व्यवसायापासून दूर होत आहे. शासनाकडून या व्यवसायाला संरक्षण मिळायला हवे.

एका खजुरीच्या झाडाचा वार्षिक दर सुमारे ४०० ते ५०० आहे. लिलाव पद्धतीने परवाना मिळवणे अत्यंत अवघड झाले आहे. काही जण परवान्याशिवाय घरातच गुपचूप ताडी विक्री करतात. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक करून पदरी अपयश येत आहे. जीव मुठीत धरून व उंच झाडावर चढून ताडी काढणाऱ्यांना दर निम्मा मिळतो. शासनाने या व्यवसायासाठी असलेल्या अटी शिथिल करून कर्जाची व्यवस्था करावी, अशी मागणी ताडीविक्रेत्यांनी केली आहे. - ताडी व्यावसायिक