शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

ताडी व्यवसाय इतिहासजमा होणार?; शासकीय परवाना वितरण प्रक्रियेत जाचक अटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:08 IST

भंडारी समाजाचा व्यवसाय, २० वर्षांपूर्वी या व्यवसायात ठाणे, पालघर जिल्ह्यांत साधारणत: ५०० पेक्षा जास्त अधिकृत परवानाधारक होते

सुरेश काटेतलासरी : किनारपट्टीवर राहणाऱ्या भंडारी समाजाचा ताडी-माडी-विक्री हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, शासकीय परवाना वितरण प्रक्रियेच्या जाचक अटीत अडकल्याने या व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यामुळे या व्यवसायाशी निगडित भूमिपुत्रांच्या बेकारीत वाढ होऊन पारंपरिक व्यवसायापासून व्यावसायिक दुरावत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ताडी-माडी व्यवसाय तेजीत असतो. तलासरी, डहाणू तालुक्यांतील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात या व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने ताडी निर्यातीचे बंधन घातल्याने, मुंबई व ठाणे शहरांत जाणारी ताडीनिर्यात ठप्प झाली. त्यामुळे दिवसाकाठी हजारो लीटर ताडीपासून मिळणारे लाखो रुपयांच्या उत्पन्नाला कात्री बसली आहे. त्यामुळे ताडी व्यवसाय आता इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आला आहे. पूर्वीच्या ताडी व्यावसायिकांची मुलेही आता अन्य क्षेत्रांकडे वळू लागली आहेत. डहाणू, बोर्डी, चिंचणी, झाई, बोरीगाव या किनारपट्टीलगत बीअर दुकानामुळेही ताडीची दुकाने बंद पडत आहेत. सरकारचा नाकर्तेपणा आणि दिशाहीन धोरणांमुळे या व्यवसायावर संकट आल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

२० वर्षांपूर्वी या व्यवसायात ठाणे, पालघर जिल्ह्यांत साधारणत: ५०० पेक्षा जास्त अधिकृत परवानाधारक होते. फक्त डहाणू तालुक्यात हा आकडा १५० पर्यंत असे. मात्र, आजमितीला डहाणूत केवळ १६ अधिकृत दुकाने असून डहाणू शहरात पाच दुकाने आहेत. सुरुवातीला सुमारे २५ ते ३० हजार लोकांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून होती. परंतु, सध्याच्या घडीला हा व्यवसाय डबघाईला आल्याने बेकारी वाढली आहे. दरवर्षी शासनाकडून १० टक्के रक्कम वाढवली जात असल्याने भंडारी व आदिवासी समाज या व्यवसायापासून दूर होत आहे. शासनाकडून या व्यवसायाला संरक्षण मिळायला हवे.

एका खजुरीच्या झाडाचा वार्षिक दर सुमारे ४०० ते ५०० आहे. लिलाव पद्धतीने परवाना मिळवणे अत्यंत अवघड झाले आहे. काही जण परवान्याशिवाय घरातच गुपचूप ताडी विक्री करतात. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक करून पदरी अपयश येत आहे. जीव मुठीत धरून व उंच झाडावर चढून ताडी काढणाऱ्यांना दर निम्मा मिळतो. शासनाने या व्यवसायासाठी असलेल्या अटी शिथिल करून कर्जाची व्यवस्था करावी, अशी मागणी ताडीविक्रेत्यांनी केली आहे. - ताडी व्यावसायिक