शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

गोखिवरेतील डम्पिंग ग्राउंडचे वायुप्रदूषण थांबणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:07 IST

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या बंद आहे,

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील डंपिंग ग्राउंडमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या बाबतीतील त्रास सुरू झालेले आहेत. या ठिकाणी होणारे वायुप्रदूषण थांबावे, यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करीत आहेत. आता केंद्र सरकारने वसई-विरार शहर महानगरपालिकेला वायुप्रदूषण रोखण्यासाठी १६ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानाचा वापर गोखिवरेतील डम्पिंग ग्राउंडमुळे होणारे वायुप्रदुषण रोखण्यासाठी करावा, अशी मागणी केली जात आहे.

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या बंद आहे, मात्र येथे साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरांमुळे वायुप्रदूषण अद्यापही सुरूच आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. धुरामुळे हवा प्रदूषित झाल्याने कित्येक लोक दमा, घसा खवखवणे, चक्कर येणे, उलटी होणे, बेशुद्ध पडणे, ताप येणे अशा रोगांनी त्रस्त झाले आहेत. अशा बाबींना अनुसरून २०१४ पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आोग्य धोक्यात आले असून गोखिवरे व आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे.वाढते प्रदूषण पाहता दि. २ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी (वायुप्रदूषण रोखण्यासाठी) वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६ कोटी अनुदान दिले आहे. त्याचा उपयोग या प्रकल्पातील प्रदूषण रोखण्यासाठी करावा, अशी मागणी माजी नगरसेवक किरण भोईर यांनी केली आहे. 

किरण भोईर यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे ४ नगरपालिका मिळून (वसई, नवघर-माणिकपूर, नालासोपारा, विरार) येथील डम्पिंग ग्राउंडसाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांनी परवानगी दिली होती. त्यानंतर २००९ मध्ये महापालिका झाल्यानंतर संपूर्ण महापलिकेचा कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये आण्ण्यास चालू केले. प्रथम कचरा हा २०० टन प्रतिदिन होता. पण वाढत्या लोकसंख्येनुसार आता तो ६५० टन प्रतिदिन इतका आहे. गेल्या पाच वर्षात या डम्पिंग ग्राउंडमध्ये साधारणतः ११ लाख ७० हजार टन इतका कचरा बिनाप्रक्रिया पडलेला आहे. 

नागरिकांच्या आरोग्यास धोका 

  •  पावसाळ्यात कचऱ्यापासून दुर्गंधीयुक्त चिखल निघून आजूबाजूच्या तलाव, विहीर, कूपनलिका यातील पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  
  • धुरामुळे हवा प्रदूषित झाल्याने परिसरातील कित्येक लोक दमा, घसा खवखवणे, चक्कर येणे, उलटी होणे, बेशुद्ध पडणे, ताप येणे अशा रोगांनी त्रस्त झाले आहेत.