शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

गोखिवरेतील डम्पिंग ग्राउंडचे वायुप्रदूषण थांबणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:07 IST

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या बंद आहे,

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील डंपिंग ग्राउंडमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या बाबतीतील त्रास सुरू झालेले आहेत. या ठिकाणी होणारे वायुप्रदूषण थांबावे, यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करीत आहेत. आता केंद्र सरकारने वसई-विरार शहर महानगरपालिकेला वायुप्रदूषण रोखण्यासाठी १६ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानाचा वापर गोखिवरेतील डम्पिंग ग्राउंडमुळे होणारे वायुप्रदुषण रोखण्यासाठी करावा, अशी मागणी केली जात आहे.

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या बंद आहे, मात्र येथे साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरांमुळे वायुप्रदूषण अद्यापही सुरूच आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. धुरामुळे हवा प्रदूषित झाल्याने कित्येक लोक दमा, घसा खवखवणे, चक्कर येणे, उलटी होणे, बेशुद्ध पडणे, ताप येणे अशा रोगांनी त्रस्त झाले आहेत. अशा बाबींना अनुसरून २०१४ पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आोग्य धोक्यात आले असून गोखिवरे व आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे.वाढते प्रदूषण पाहता दि. २ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी (वायुप्रदूषण रोखण्यासाठी) वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६ कोटी अनुदान दिले आहे. त्याचा उपयोग या प्रकल्पातील प्रदूषण रोखण्यासाठी करावा, अशी मागणी माजी नगरसेवक किरण भोईर यांनी केली आहे. 

किरण भोईर यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे ४ नगरपालिका मिळून (वसई, नवघर-माणिकपूर, नालासोपारा, विरार) येथील डम्पिंग ग्राउंडसाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांनी परवानगी दिली होती. त्यानंतर २००९ मध्ये महापालिका झाल्यानंतर संपूर्ण महापलिकेचा कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये आण्ण्यास चालू केले. प्रथम कचरा हा २०० टन प्रतिदिन होता. पण वाढत्या लोकसंख्येनुसार आता तो ६५० टन प्रतिदिन इतका आहे. गेल्या पाच वर्षात या डम्पिंग ग्राउंडमध्ये साधारणतः ११ लाख ७० हजार टन इतका कचरा बिनाप्रक्रिया पडलेला आहे. 

नागरिकांच्या आरोग्यास धोका 

  •  पावसाळ्यात कचऱ्यापासून दुर्गंधीयुक्त चिखल निघून आजूबाजूच्या तलाव, विहीर, कूपनलिका यातील पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  
  • धुरामुळे हवा प्रदूषित झाल्याने परिसरातील कित्येक लोक दमा, घसा खवखवणे, चक्कर येणे, उलटी होणे, बेशुद्ध पडणे, ताप येणे अशा रोगांनी त्रस्त झाले आहेत.