शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

बविआच्या गोटात सन्नाटा ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:18 IST

वसई तालुक्यातील सर्वच सत्ताकेंद्रे केवळ बविआ पक्षांच्या ताब्यात असताना या दारुण पराभवामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ या संवादाची जणू आठवण यावी, असे काहीसे शुकशुकाटाचे वातावरण गुरु वारी दुपारनंतर वसई-विरारमध्ये पाहायला मिळाले.

वसई : पालघर लोकसभेची महत्वाची जागा गमावल्याचे समजल्यानंतर पालघर सहित वसई- विरार तालुक्यातील आ. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडी व त्यांचा मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी सन्नाटा पसरला.

वसई तालुक्यातील सर्वच सत्ताकेंद्रे केवळ बविआ पक्षांच्या ताब्यात असताना या दारुण पराभवामुळे ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ या संवादाची जणू आठवण यावी, असे काहीसे शुकशुकाटाचे वातावरण गुरु वारी दुपारनंतर वसई-विरारमध्ये पाहायला मिळाले. गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाठिकाणी निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच बविआचे बळीराम जाधव व महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यातील चुरशीच्या लढतींविषयी केवळ पालघर जिल्ह्यालाच नाही तर या लढतींकडे उभ्या देश व राज्याचे लक्ष होतेच मात्र तशी एक मोठी उत्सुकता हि दोन्ही युती व आघाडी च्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र सकाळी १० नंतर गावित यांच्या बाजूने विजयाच्या आघाडीचा कल दिसू लागताच बविआ सहित मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांची धाकधुक बºयापैकी वाढली. नंतर पुढे निकाल स्पष्ट दिसू लागताच बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी व काँग्रेस समर्थकांचे चेहरे मात्र उतरले. एकूणच त्यावेळी देशभरात मोठं मोठ्या दिग्गजांच्या पराभवानंतर देशात व राज्यात सर्वत्र मोदी व सेनेची लाटच दिसत होती आणि आता केंद्रात सरकार येत असल्याच्या खुशीत महायुतीचे कार्यकर्ते चौकाचौकात गर्दी करू लागले.

यामध्ये मात्र बोईसर सहित वसई-विरार, नालासोपारा वसई गाव ,नवघर माणिकपूर शहर, वसई पूर्व पश्चिम आदी ठिकाणची बविआ कार्यालयात बºयापैकी कार्यकर्ते व नेते मंडळी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, महायुतीने वाटले लाडू पेढेएकीकडं बविआ च्या मुख्यालयापासून ते वसई विरार आणि नालासोपारा येथील विविध पक्ष कार्यालयात सन्नाटा पाहायला मिळाला तर दुसरीकडे देशात व राज्यात फक्त आणि केवळ मोदी लाट आल्याची आकडेवारी पाहिल्यावर याच पराभूत झालेल्या बविआच्या विविध कार्यालयाबाहेर वसई विरार नालासोपाराच्या चौका चौकात ‘नमो चहा’ असो किंवा पेढे व लाडू यांचे वाटप केले. अगदी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश करीत भाजप व सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरील नागरिकांचे तोंड गोड करण्यात मश्गुल झाले होते. यावेळी पोलिसांनी विजय मिरवणूकांना जरी बंदी घातली असली तरी महायुतीच्या हौशी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी बविआ, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या व त्यांच्या पदाधिकारी व नेत्यांची कार्यालये व यांच्या निवासस्थानी शुकशुकाट दिसला तर संध्याकाळी सुद्धा या पक्ष कार्यालयाकडे कुणी फिरकले नाही.महायुतीचे आता पुढचे लक्ष्य विधानसभालोकसभेची निवडणूक जिंकून आता भाजप-शिवसेना महायुतीने पालघरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र आता खरी लढत विधानसभेत पहायला मिळेल. सध्या बविआची वसई, बोईसर व नालासोपारा असे तीन आमदार आहेत. त्यामुळे आता आमचे मुख्य उद्दिष्ट विधानसभा असून या तिन्ही मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते सक्रि य होत आहेत, अशा ही प्रतिक्रि या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून येत होत्या.

टॅग्स :palghar-pcपालघर