शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

सिग्नल यंत्रणांचा वाली कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:29 IST

पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. तसेच ठेकेदारांवर देखील कारवाई होत नसल्याने ते ही मोकाट आहेत. यातून जनतेच्या पैैशाची नासाडी मात्र वर्षानुवर्षे सुरू आहे.

विरार : वसई विरार शहरात नवीन सिग्नल बसवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, एका बाजूला पालिकेतर्फे सिग्नल बांधणाऱ्या ठेकेदारांवर अद्यापही कारवाई करण्यात येत नाही. तर दुसरीकडे वाहतूक विभाग पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खराब सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीबाबत पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे जबाबदारी घेत नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे.वसईमध्ये नवीन सिग्नल बसविण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. तर यासाठी पालिकेने काम देखील सुरु केले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून आधीपासून असलेल्या सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड होत असतांना अजूनही त्यात सुधारणा करण्यात आलेली नाही.

महापालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे चौकशी करण्यात दिवस वाया घालवत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याच प्रमाणे सिग्नल बांधण्याचे काम महापालिकेचे होते तर यासाठी पालिकेतर्फे ठेकेदार नेमण्यात आले होते. तर ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे सिग्नल यंत्रणांमध्ये सतत बिघाड होत आहे. तरी देखील ठेकेदरांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सिग्नल यंत्रणा महापालिकेने बांधली असली तरी याची देखरेख वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून होत असते, परंतु महापालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. यामुळे यंत्रणे दुरु स्त होण्यास विलंब होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वसई तालुक्यात लावण्यात आलेले सिग्नल मधेच बंद पडते आहे. तर यामुळे वाहन चालक गडबडून थांबतात व यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विरारमधील जकात नाक्यावरील सिग्नल बंद पडत होता. मात्र आता नालासोपारा, आर.जे. नगर, मनवेल पाडा याठिकाणी देखील सिग्नल बंद पडत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस अधिकाºयांनी सिग्नल यंत्रणात बिघाड होत असल्याने त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही त्याची तपासणी देखील न झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सिग्नल यंत्रणा महापालिकेच्या हातात आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम ती बघते. तरी आम्ही लवकरच त्याची दुरुस्ती करू.’’ - संपत पाटील, वाहतूक विभाग पोलीस अधिकारी,

सिग्नल महापालिकेतर्फे बांधण्यात आले तरी त्याची देखरेख वाहतूक विभागाने करणे गरजेचे आहे. याची माहिती घेऊन लगेच काम सुरु करू.’’ - बी.जी.पवार, आयुक्त