शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

रस्त्यावरील झाडे कापण्याची जबाबदारी कुणाची?

By admin | Updated: July 30, 2015 22:32 IST

पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या

डहाणू : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर येत आहेत. वादळ तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने या फांद्या तुटून नागरिकांचा बळी जातो. अशा दुर्घटना वारंवार होऊनही झाडे छाटण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना पावसाळ्यात बाहेर पडणे भीतिदायक वाटते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यासाठी जिल्ह्यात विशेष शासकीय यंत्रणा उभी करण्याची मागणी ग्रामस्थ तसेच वाहनचालकांकडून होत आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी, जव्हार, सूर्यानगर, चारोटी, कासा, वानगाव, धा. डहाणू या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला हजारो झाडे १०० वर्षांपूर्वीपासूनची आहेत. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटल्यास याचा धोका वाढतो. जून, जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसात हजारो झाडे तुटून तसेच जमिनीतून उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, डहाणू, मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर झाड पडून ते जागीच ठार झाले. तर पालघर, शिरगाव येथे जुने झाड कोसळून प्रकाश माळी (५०) या तरुणाचा बळी गेला. अशा अनेक घटना रस्त्यावरील झाडांमुळे घडत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या सडून, कुजून, अचानक तुटून विजेच्या तारांवर पडून अनेक वेळा मोठा अपघात होता-होता वाचला आहे. तरी, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे कापण्याची जबाबदारी सक्षम शासकीय यंत्रणेवर सोपविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)