शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

रस्त्यावरील झाडे कापण्याची जबाबदारी कुणाची?

By admin | Updated: July 30, 2015 22:32 IST

पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या

डहाणू : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर येत आहेत. वादळ तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने या फांद्या तुटून नागरिकांचा बळी जातो. अशा दुर्घटना वारंवार होऊनही झाडे छाटण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना पावसाळ्यात बाहेर पडणे भीतिदायक वाटते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यासाठी जिल्ह्यात विशेष शासकीय यंत्रणा उभी करण्याची मागणी ग्रामस्थ तसेच वाहनचालकांकडून होत आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी, जव्हार, सूर्यानगर, चारोटी, कासा, वानगाव, धा. डहाणू या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला हजारो झाडे १०० वर्षांपूर्वीपासूनची आहेत. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटल्यास याचा धोका वाढतो. जून, जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसात हजारो झाडे तुटून तसेच जमिनीतून उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, डहाणू, मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर झाड पडून ते जागीच ठार झाले. तर पालघर, शिरगाव येथे जुने झाड कोसळून प्रकाश माळी (५०) या तरुणाचा बळी गेला. अशा अनेक घटना रस्त्यावरील झाडांमुळे घडत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या सडून, कुजून, अचानक तुटून विजेच्या तारांवर पडून अनेक वेळा मोठा अपघात होता-होता वाचला आहे. तरी, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे कापण्याची जबाबदारी सक्षम शासकीय यंत्रणेवर सोपविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)