शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

राम नाईकांची तळमळ आता कुठे गेली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:29 IST

मासेमारीवरून संघर्ष : विरोधी पक्षात असतांना केलेले प्रयत्न सत्तेत आल्यानंतर थांबले

पालघर : पालघर-डहाणू आणि वसई-उत्तन असा समुद्रातील कव हद्दीच्या वादावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना टार्गेट करणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक साडेचार वर्षांपासून आपले भाजपचे सरकार सत्तेत असल्यापासून या वादावर अजूनही का बरे यशस्वी तोडगा काढू शकले नाहीत? असा प्रश्न आता समस्त मच्छीमारांच्या मनात खदखदू लागला आहे.

केंद्रात २००९ मध्ये एनडीए काँग्रेसचे सरकार असताना राम नाईक यांनी कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांना पत्र लिहून सातपाटी-डहाणू आणि वसई भागातील मच्छीमारामध्ये कवींच्या अतिक्र मणाच्या मुद्यावरून समुद्रात निर्माण होणारा तणाव दूर करण्यासाठी तात्काळ पावले उचिलत नियम बनवावेत, डिझेल वर प्रती लिटर्स ४ रुपये अनुदान द्यावे, एनसीडीसी योजनेतर्गत कर्जावर शेतकऱ्यां प्रमाणे अत्यल्प व्याज आकारणी करावी, आदी मागण्या केल्या होत्या.

त्या मागण्यांवर शरद पवारांनी त्यांना उत्तर देत महाराष्ट्र शासनाला आपण १२ नॉटिकल क्षेत्रात या वादा मुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तात्काळ नियमावली बनविण्याचे आदेश दिल्याचे लेखी उत्तर दिले होते. परंतु सतत पत्रव्यवहार करूनही शरद पवारांनी कुठल्याही मागणी सोडविण्याबाबत सकारात्मक पावले न उचलल्याने राम नाईकांनी पुन्हा १ जुलै २०१२ ला त्यांना पत्र लिहीत महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ लि. चे चेअरमन राजन मेहेर यांच्या मागणी पत्राचा संदर्भ देत २६ एप्रिल २०१२ रोजी आपल्या प्रत्यक्षात भेटीत मच्छीमारांच्या महत्वपूर्ण प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा झाली.

त्यावेळी मच्छीमारांचे प्रश्न तातडीने सोडविण्या बाबत आपण मला आश्वासित केल्याचे राज्यपाल नाईक यानी सांगित आता तरी जलदगतीने निर्णय घेऊन मच्छीमाराना दिलासा मिळवून देण्याबाबत खरमरीत पत्र लिहिले होते. परंतु शरद पवारांकडून मच्छीमारांच्या प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने २०१४ च्या निवडणुकीत मच्छीमारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवीत आपला इंगा दाखिवला होता.

सातपाटी मच्छिमार सहकारी संस्थेत सत्कार स्विकारण्यासाठी आलेल्या राम नाईकांना मच्छिमार नेते सुभाष तामोरे नी पालघर-डहाणू आणि वसई च्या वादा संदर्भात उपाय योजनेच्या प्रश्नाबाबत छेडले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळीत आपली सुटका करून घेतल्याचे पहावयास मिळाले. सातपाटीत बांधलेल्या बंधाºयाचे उपकार सातपाटी ग्रामस्थ कधीच विसरले नसून ग्रामस्थांनी राम नाईकांना देवतुल्य मानले आहे. परंतु आता तो बंधाराही फुटला असून कवींच्या अतिक्र मणाचा फटका, डिझेलची वेळीच न मिळणारी सबसिडी, एनसीडीसीच्या कर्जामुळे मच्छिमार मेटाकुटीस आला आहे. 

काँग्रेस आघाडीचे सरकार असताना प्रलंबित प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्यात मच्छीमारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राम नाईकांनी केले होते. ते प्रश्न सुटलेले नसताना आता साडेचार वर्षांपासून त्यांचे सरकार सत्तेत असताना एकही प्रश्न सुटलेला नाही.- सुभाष तामोरे, उपाध्यक्ष मच्छिमार धंदा संरक्षण समिती.

टॅग्स :fishermanमच्छीमारRam Naikराम नाईक