शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

राम नाईकांची तळमळ आता कुठे गेली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:29 IST

मासेमारीवरून संघर्ष : विरोधी पक्षात असतांना केलेले प्रयत्न सत्तेत आल्यानंतर थांबले

पालघर : पालघर-डहाणू आणि वसई-उत्तन असा समुद्रातील कव हद्दीच्या वादावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना टार्गेट करणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक साडेचार वर्षांपासून आपले भाजपचे सरकार सत्तेत असल्यापासून या वादावर अजूनही का बरे यशस्वी तोडगा काढू शकले नाहीत? असा प्रश्न आता समस्त मच्छीमारांच्या मनात खदखदू लागला आहे.

केंद्रात २००९ मध्ये एनडीए काँग्रेसचे सरकार असताना राम नाईक यांनी कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांना पत्र लिहून सातपाटी-डहाणू आणि वसई भागातील मच्छीमारामध्ये कवींच्या अतिक्र मणाच्या मुद्यावरून समुद्रात निर्माण होणारा तणाव दूर करण्यासाठी तात्काळ पावले उचिलत नियम बनवावेत, डिझेल वर प्रती लिटर्स ४ रुपये अनुदान द्यावे, एनसीडीसी योजनेतर्गत कर्जावर शेतकऱ्यां प्रमाणे अत्यल्प व्याज आकारणी करावी, आदी मागण्या केल्या होत्या.

त्या मागण्यांवर शरद पवारांनी त्यांना उत्तर देत महाराष्ट्र शासनाला आपण १२ नॉटिकल क्षेत्रात या वादा मुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तात्काळ नियमावली बनविण्याचे आदेश दिल्याचे लेखी उत्तर दिले होते. परंतु सतत पत्रव्यवहार करूनही शरद पवारांनी कुठल्याही मागणी सोडविण्याबाबत सकारात्मक पावले न उचलल्याने राम नाईकांनी पुन्हा १ जुलै २०१२ ला त्यांना पत्र लिहीत महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ लि. चे चेअरमन राजन मेहेर यांच्या मागणी पत्राचा संदर्भ देत २६ एप्रिल २०१२ रोजी आपल्या प्रत्यक्षात भेटीत मच्छीमारांच्या महत्वपूर्ण प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा झाली.

त्यावेळी मच्छीमारांचे प्रश्न तातडीने सोडविण्या बाबत आपण मला आश्वासित केल्याचे राज्यपाल नाईक यानी सांगित आता तरी जलदगतीने निर्णय घेऊन मच्छीमाराना दिलासा मिळवून देण्याबाबत खरमरीत पत्र लिहिले होते. परंतु शरद पवारांकडून मच्छीमारांच्या प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने २०१४ च्या निवडणुकीत मच्छीमारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवीत आपला इंगा दाखिवला होता.

सातपाटी मच्छिमार सहकारी संस्थेत सत्कार स्विकारण्यासाठी आलेल्या राम नाईकांना मच्छिमार नेते सुभाष तामोरे नी पालघर-डहाणू आणि वसई च्या वादा संदर्भात उपाय योजनेच्या प्रश्नाबाबत छेडले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळीत आपली सुटका करून घेतल्याचे पहावयास मिळाले. सातपाटीत बांधलेल्या बंधाºयाचे उपकार सातपाटी ग्रामस्थ कधीच विसरले नसून ग्रामस्थांनी राम नाईकांना देवतुल्य मानले आहे. परंतु आता तो बंधाराही फुटला असून कवींच्या अतिक्र मणाचा फटका, डिझेलची वेळीच न मिळणारी सबसिडी, एनसीडीसीच्या कर्जामुळे मच्छिमार मेटाकुटीस आला आहे. 

काँग्रेस आघाडीचे सरकार असताना प्रलंबित प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्यात मच्छीमारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राम नाईकांनी केले होते. ते प्रश्न सुटलेले नसताना आता साडेचार वर्षांपासून त्यांचे सरकार सत्तेत असताना एकही प्रश्न सुटलेला नाही.- सुभाष तामोरे, उपाध्यक्ष मच्छिमार धंदा संरक्षण समिती.

टॅग्स :fishermanमच्छीमारRam Naikराम नाईक