शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

उपचाराविना रुग्णांचे मृत्यू होत असताना पालकमंत्री कुठेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:05 IST

नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न : आज येणार जिल्हा दौऱ्यावर

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या अनुषंगाने उपचार व्यवस्थेची कमतरता पाहता रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत असताना पालकमंत्री आहेत कुठे? असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जाऊ लागल्याने आज, सोमवारी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे. ऑक्सिजन पुरवठा, बेडची उपलब्धता आणि रेमडिसिविर, आदी औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

१ एप्रिलपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, उपलब्ध उपचार व्यवस्था अपुरी पडत असल्याने पालकमंत्री दादाजी भुसे आहेत कुठे? ते जिल्ह्याच्या पालकत्वपदाची जबाबदारी विसरले असल्यापासून अनेक टीकास्त्र त्यांच्याविरोधात सोशल मीडियावरून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३९ डीसीएच आणि डीसीएचसी रुग्णालयाची व्यवस्था आणि त्यात उभारलेली आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सुमारे २० लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येच्या मानाने खूपच अपुरी असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेला लोकप्रतिनिधींची भक्कमपणे साथ असल्याचे कुठेही दिसून न आल्याने जिल्ह्यात अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी दाहीदिशा फिरावे लागणारे शेकडो नातेवाईक लोकप्रतिनिधींसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उंबरठे झिजवत असल्याचे वेदनादायक चित्र दिसते आहे. अशावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येत सक्षम यंत्रणा उभारणीसाठी काही ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, असे चित्र नसल्याने पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

कोविड हॉस्पिटलला भेट देऊन घेणार आढावा बैठकपालकमंत्री आज सकाळी मालेगावहून वाडा येथील आयडियल हॉस्पिटल येथे भेट देणार आहेत. तेथून विरारच्या जीवदानी कोविड हॉस्पिटलला भेट देत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आयएमए डॉक्टर असोसिएशन, सिटीस्कॅन प्रतिनिधी, खासगी लॅब प्रतिनिधी यांची बैठक घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याचा दौरा कार्यक्रम आला आहे. पालकमंत्री आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारासाठी एक दिलासादायक आरोग्य व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देऊन जिल्हावासियांची सुरू असलेली फरफट थांबवून पालकत्व सिद्ध करतील, असा विश्वास जिल्हावासियांकडून व्यक्त केला जात आहे.