शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराविना रुग्णांचे मृत्यू होत असताना पालकमंत्री कुठेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:05 IST

नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न : आज येणार जिल्हा दौऱ्यावर

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या अनुषंगाने उपचार व्यवस्थेची कमतरता पाहता रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत असताना पालकमंत्री आहेत कुठे? असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जाऊ लागल्याने आज, सोमवारी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे. ऑक्सिजन पुरवठा, बेडची उपलब्धता आणि रेमडिसिविर, आदी औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

१ एप्रिलपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, उपलब्ध उपचार व्यवस्था अपुरी पडत असल्याने पालकमंत्री दादाजी भुसे आहेत कुठे? ते जिल्ह्याच्या पालकत्वपदाची जबाबदारी विसरले असल्यापासून अनेक टीकास्त्र त्यांच्याविरोधात सोशल मीडियावरून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३९ डीसीएच आणि डीसीएचसी रुग्णालयाची व्यवस्था आणि त्यात उभारलेली आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सुमारे २० लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येच्या मानाने खूपच अपुरी असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेला लोकप्रतिनिधींची भक्कमपणे साथ असल्याचे कुठेही दिसून न आल्याने जिल्ह्यात अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी दाहीदिशा फिरावे लागणारे शेकडो नातेवाईक लोकप्रतिनिधींसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उंबरठे झिजवत असल्याचे वेदनादायक चित्र दिसते आहे. अशावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येत सक्षम यंत्रणा उभारणीसाठी काही ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, असे चित्र नसल्याने पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

कोविड हॉस्पिटलला भेट देऊन घेणार आढावा बैठकपालकमंत्री आज सकाळी मालेगावहून वाडा येथील आयडियल हॉस्पिटल येथे भेट देणार आहेत. तेथून विरारच्या जीवदानी कोविड हॉस्पिटलला भेट देत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आयएमए डॉक्टर असोसिएशन, सिटीस्कॅन प्रतिनिधी, खासगी लॅब प्रतिनिधी यांची बैठक घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याचा दौरा कार्यक्रम आला आहे. पालकमंत्री आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारासाठी एक दिलासादायक आरोग्य व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देऊन जिल्हावासियांची सुरू असलेली फरफट थांबवून पालकत्व सिद्ध करतील, असा विश्वास जिल्हावासियांकडून व्यक्त केला जात आहे.