शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

उपचाराविना रुग्णांचे मृत्यू होत असताना पालकमंत्री कुठेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:05 IST

नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न : आज येणार जिल्हा दौऱ्यावर

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या अनुषंगाने उपचार व्यवस्थेची कमतरता पाहता रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत असताना पालकमंत्री आहेत कुठे? असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जाऊ लागल्याने आज, सोमवारी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे. ऑक्सिजन पुरवठा, बेडची उपलब्धता आणि रेमडिसिविर, आदी औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

१ एप्रिलपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, उपलब्ध उपचार व्यवस्था अपुरी पडत असल्याने पालकमंत्री दादाजी भुसे आहेत कुठे? ते जिल्ह्याच्या पालकत्वपदाची जबाबदारी विसरले असल्यापासून अनेक टीकास्त्र त्यांच्याविरोधात सोशल मीडियावरून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३९ डीसीएच आणि डीसीएचसी रुग्णालयाची व्यवस्था आणि त्यात उभारलेली आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सुमारे २० लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येच्या मानाने खूपच अपुरी असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेला लोकप्रतिनिधींची भक्कमपणे साथ असल्याचे कुठेही दिसून न आल्याने जिल्ह्यात अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी दाहीदिशा फिरावे लागणारे शेकडो नातेवाईक लोकप्रतिनिधींसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उंबरठे झिजवत असल्याचे वेदनादायक चित्र दिसते आहे. अशावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येत सक्षम यंत्रणा उभारणीसाठी काही ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, असे चित्र नसल्याने पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

कोविड हॉस्पिटलला भेट देऊन घेणार आढावा बैठकपालकमंत्री आज सकाळी मालेगावहून वाडा येथील आयडियल हॉस्पिटल येथे भेट देणार आहेत. तेथून विरारच्या जीवदानी कोविड हॉस्पिटलला भेट देत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आयएमए डॉक्टर असोसिएशन, सिटीस्कॅन प्रतिनिधी, खासगी लॅब प्रतिनिधी यांची बैठक घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याचा दौरा कार्यक्रम आला आहे. पालकमंत्री आढावा बैठकीत रुग्णांच्या उपचारासाठी एक दिलासादायक आरोग्य व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देऊन जिल्हावासियांची सुरू असलेली फरफट थांबवून पालकत्व सिद्ध करतील, असा विश्वास जिल्हावासियांकडून व्यक्त केला जात आहे.